शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

चंदवाणी यांचा तडकाफडकी राजीनामा

By admin | Updated: September 24, 2016 00:07 IST

करवीर पंचायत समिती सभा : निवेदन, विनंती करूनही कामे होत नसल्याची नाराजी

कसबा बावडा : वारंवार तक्रारी करून, निवेदन देऊन, विनंती करूनही आपली कामे होत नसल्याच्या नाराजीतून गांधीनगरच्या जया प्रताबराय चंदवाणी यांनी करवीर पंचायत समिती सदस्य पदाचा शुक्रवारी तडकाफडकी राजीनामा दिला. पती प्रताबराय चंदवाणी यांनी तो राजीनामा पंचायतच्या सुरू असलेल्या मासिक सभेतच सभापती स्मिता युवराज गवळी यांच्याकडे दिला. चंदवाणी यांच्या अचानकपणे आलेल्या राजीनाम्यामुळे सभागृहात काही काळ शांतता पसरली. गांधीनगर येथील सि.स.नं. २७३५ व २७३६ या भूखंडावरील बेकायदेशीर बांधकाम वेळोवेळी तक्रारी, निवेदन देऊनही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. ग्रामविकास अधिकाऱ्यांपासून जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत व तहसीलदारांपासून थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व स्तरांवर बांधकामाबाबत तक्रारी केल्या; परंतु मला न्याय मिळाला नाही. माझे पती प्रताबराय चंदवाणी यांनीही पंचायतचे पद भूषविले आहे. तरीही आमच्या कामाला महत्त्व दिले जात नाही. जर कामेच होत नसतील, तर पंचायत सदस्यत्वाचा उपयोग काय, म्हणून राजीनामा देत असल्याचे चंदवाणी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, नेहमी दोन वाजता सुरू होणारी सभा शुक्रवारी अर्धातास उशिरा सुरू झाली. सभेला तुलनेने पुरुष सदस्यांची उपस्थिती फारच कमी होती. गटनेते भुजगोंडा पाटील यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषय अवघ्या काही मिनिटांतच मंजूर केले. गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने सहायक गटविकास अधिकारी एस. व्ही केळकर यांनी प्रश्नांना उत्तरे दिली. सभेस पंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना प्रशासनाने सदस्यांना विचारात घ्यायला हवे, अशी सूचना भुजगोंडा पाटील यांनी मांडली. सध्या डेंग्यूची साथ सर्वत्र आहे. त्यावर प्रशासनाने उपाययोजना केली आहे का? असा प्रश्न अरुणिमा माने यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी १५ आॅक्टोबरच्या क्रांती मोर्चाला पाठिंबा जाहीर केला. सभेत शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर शेती अवजारे पुरविल्याबद्दल व्यंकटेश्वरा फौंडेशनचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते युवराज गवळी यांच्या उपस्थित करण्यात आला. सोमवारी आत्मदहन करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य जया चंदवाणी यांनी दिलेल्या राजीनाम्यासोबत एका निवेदनाची प्रत जोडली असून, त्यात माझे पती प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी (दि. २६) आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे. सभा शांततेत सभेत दिलीप टिपुगडे, तानाजी आंग्रे, राजेंद्र सूर्यवंशी, सरदार मिसाळ हे नेहमी विविध प्रश्न विचारून सभेत प्रशासनाला चांगलेच कोंडीत पकडत असत; परंतु आजच्या सभेला वरील सर्व सदस्य गैरहजर राहिल्याने सभा एकदम शांततेत आणि कमी वेळेतच झाली.