शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

चंदवाणी यांचा तडकाफडकी राजीनामा

By admin | Updated: September 24, 2016 00:07 IST

करवीर पंचायत समिती सभा : निवेदन, विनंती करूनही कामे होत नसल्याची नाराजी

कसबा बावडा : वारंवार तक्रारी करून, निवेदन देऊन, विनंती करूनही आपली कामे होत नसल्याच्या नाराजीतून गांधीनगरच्या जया प्रताबराय चंदवाणी यांनी करवीर पंचायत समिती सदस्य पदाचा शुक्रवारी तडकाफडकी राजीनामा दिला. पती प्रताबराय चंदवाणी यांनी तो राजीनामा पंचायतच्या सुरू असलेल्या मासिक सभेतच सभापती स्मिता युवराज गवळी यांच्याकडे दिला. चंदवाणी यांच्या अचानकपणे आलेल्या राजीनाम्यामुळे सभागृहात काही काळ शांतता पसरली. गांधीनगर येथील सि.स.नं. २७३५ व २७३६ या भूखंडावरील बेकायदेशीर बांधकाम वेळोवेळी तक्रारी, निवेदन देऊनही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. ग्रामविकास अधिकाऱ्यांपासून जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत व तहसीलदारांपासून थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व स्तरांवर बांधकामाबाबत तक्रारी केल्या; परंतु मला न्याय मिळाला नाही. माझे पती प्रताबराय चंदवाणी यांनीही पंचायतचे पद भूषविले आहे. तरीही आमच्या कामाला महत्त्व दिले जात नाही. जर कामेच होत नसतील, तर पंचायत सदस्यत्वाचा उपयोग काय, म्हणून राजीनामा देत असल्याचे चंदवाणी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, नेहमी दोन वाजता सुरू होणारी सभा शुक्रवारी अर्धातास उशिरा सुरू झाली. सभेला तुलनेने पुरुष सदस्यांची उपस्थिती फारच कमी होती. गटनेते भुजगोंडा पाटील यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषय अवघ्या काही मिनिटांतच मंजूर केले. गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने सहायक गटविकास अधिकारी एस. व्ही केळकर यांनी प्रश्नांना उत्तरे दिली. सभेस पंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना प्रशासनाने सदस्यांना विचारात घ्यायला हवे, अशी सूचना भुजगोंडा पाटील यांनी मांडली. सध्या डेंग्यूची साथ सर्वत्र आहे. त्यावर प्रशासनाने उपाययोजना केली आहे का? असा प्रश्न अरुणिमा माने यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी १५ आॅक्टोबरच्या क्रांती मोर्चाला पाठिंबा जाहीर केला. सभेत शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर शेती अवजारे पुरविल्याबद्दल व्यंकटेश्वरा फौंडेशनचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते युवराज गवळी यांच्या उपस्थित करण्यात आला. सोमवारी आत्मदहन करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य जया चंदवाणी यांनी दिलेल्या राजीनाम्यासोबत एका निवेदनाची प्रत जोडली असून, त्यात माझे पती प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी (दि. २६) आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे. सभा शांततेत सभेत दिलीप टिपुगडे, तानाजी आंग्रे, राजेंद्र सूर्यवंशी, सरदार मिसाळ हे नेहमी विविध प्रश्न विचारून सभेत प्रशासनाला चांगलेच कोंडीत पकडत असत; परंतु आजच्या सभेला वरील सर्व सदस्य गैरहजर राहिल्याने सभा एकदम शांततेत आणि कमी वेळेतच झाली.