शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

चंदगड तालुक्यात शेतकरी गुंतले वैरणीचे साठे सुरक्षिततेच्या कामात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:26 IST

चंदगड : उंदीर पेटती वात पळवतील. यामुळे गवताच्या गजींना आगी लागून पशुधनाची उपासमार होईल. हे कटू प्रसंग टाळण्यासाठी वैरणीचे ...

चंदगड : उंदीर पेटती वात पळवतील. यामुळे गवताच्या गजींना आगी लागून पशुधनाची उपासमार होईल. हे कटू प्रसंग टाळण्यासाठी वैरणीचे साठे जिवापाड जपा, अशा आशयाची पत्रे छत्रपती शिवाजी महाराजांनी गड-किल्यावरील किल्लेदारांना पाठविल्याचे पुरावे आजही सापडतात. या दूरदृष्टीच्या राजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वीही वैरण व वृक्षांचे महत्त्व जाणले होते. सद्य:स्थितीत चंदगड तालुक्यात वैरणीचे गगनाला भिडलेले दर पाहता शेतकरी व पशुपालक पशुधनाची वर्षभराची बेगमी सुरक्षित करण्यात मग्न असल्याचे चित्र दिसत आहे.

काही वर्षांपूर्वी एखाद्या टाकाऊ वस्तूला पिंजराची उपमा दिली जायची. मात्र, त्याच एका ट्रॉलीभर पिंजराची किंमत ४ ते ६ हजार रुपयांच्या घरात गेली आहे, तर शाळूच्या एका कडबा पेंडीची किंमत दोन-तीन रुपयांवरून १५ ते २० रुपयांवर गेली आहे. पेंडीचा आकार मात्र पहिल्यापेक्षा निम्मा झाल्याचे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांचे नगदी व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यातूनच मिळणारे शेणखत पिकांसाठी महत्त्वाचे असल्याने वैरणीला सोन्याचा भाव आला आहे. यात पिंजर, कराड, शाळू, मका, आदींचा कडबा याची काडी-काडी जमा करून शेतकरी पावसाळ्यापूर्वी गवत गंजीत सुरक्षित करत आहेत. बऱ्याच ठिकाणी गवत गंजीत पाणी उतरू नये म्हणून प्लास्टिक ताडपत्रीचा वापर वाढला आहे. दुसरीकडे गवत गजींना आगी लावण्याचे खेदजनक प्रकारही घडताना दिसत आहेत. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

-------------------------

* फोटो ओळी : डुक्करवाडीपैकी रामपूर (ता. चंदगड) येथे जनावरांना वर्षभरासाठी बेगमी करून ठेवलेल्या गवताची गंजी रचताना शेतकरी बांधव.

क्रमांक : २७०४२०२१-गड-०७