शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

‘चंदगड’मध्ये विधानसभेचे ‘पडघम’!

By admin | Updated: June 11, 2016 00:53 IST

सामना बहुरंगीच होणार : सारेच लागले तयारीला; पक्ष-गटांची मोर्चेबांधणी गतिमान

राम मगदूम -- गडहिंग्लज आगामी विधानसभा निवडणुकीला अजून साडेतीन वर्षांचा अवकाश आहे. तरीदेखील चंदगड विधानसभा मतदारसंघात आतापासूनच ‘विधानसभे’चे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सर्व मंडळी तयारीला लागली आहेत. किंबहुना, राजकीय पक्षांसह सर्व गटांची मोर्चेबांधणी गतिमान झाली आहे. त्यामुळे गतवेळच्या निवडणुकीप्रमाणेच आगामी निवडणूकदेखील बहुरंगीच होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीत ‘स्वाभिमानी’ व ‘शिवसेना’ वगळता चंदगड, गडहिंंग्लज व आजरा तालुक्यांतील सर्वच नेतेमंडळींनी संध्यादेवी कुपेकरांना साथ दिली. मात्र, त्यानंतरची सार्वत्रिक निवडणूक बहुरंगी आणि चुरशीची झाली. जिल्ह्यात गाजलेली ती निवडणूक आणि त्यानंतर जिल्ह्यासह गडहिंग्लज विभागातील बदललेली राजकीय समीकरणे लक्षात घेतल्यास आगामी निवडणुकीतील लढतीचे चित्रदेखील स्पष्ट होते.गतवेळी ‘राष्ट्रवादी’च्या विद्यमान आमदार संध्यादेवी यांच्याविरोधात त्यांचे सख्खे पुतणे संग्रामसिंह यांनी ‘जनसुराज्य’तर्फे, तर त्यांचे सहकारी अप्पी पाटील यांनी ‘अपक्ष’ निवडणूक लढविली. ‘स्वाभिमानी’चे राजेंद्र गड्यान्नावरही ताकदीने रिंगणात उतरले होते. मात्र, त्यांचेच तत्कालीन सहकारी नितीन पाटील यांनी बंडखोरी केली. माजी आमदार नरसिंगराव पाटील यांना शिवसेनेतर्फे, तर माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांना काँगे्रसतर्फे नशीब आजमावावे लागले. अंतिम टप्प्यात गोपाळराव पाटील यांनी मेहुणे नरसिंगराव यांना पाठिंबा दिला. तथापि, बहुरंगी लढतीचा फायदा संध्यादेवी यांनाच झाला. आगामी निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’तर्फे लढण्यासाठी स्व. कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्यावेळी ‘जनसुराज्य’तर्फे लढलेल्या संग्रामसिंह कुपेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीतर्फे बाभूळकर, तर सेनेतर्फे संग्रामसिंंह यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. ‘स्वाभिमानी’चे गड्यान्नावरही पुन्हा रिंगणात असतील. ‘भाजप’वासी झालेले गोपाळरावदेखील पुन्हा नशीब आजमावतील. नरसिंगराव यांच्या ‘भूमिके’ची प्रतीक्षा असली तरी त्यांचा निर्णय संजय मंडलिक यांच्या ‘भूमिकेवर’ अवलंबून राहील. भरमूअण्णादेखील अखेरचा डाव म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता असली तरी ते कुठल्या पक्षातर्फे लढणार यासाठी वाट पहावी लागेल.अप्पींना ‘ताकद’ मिळणार ? केवळ संघटन कौशल्य आणि ‘गोकाक’चे पाहुणे ‘जारकीहोळी बंधू’च्या पाठबळावर अप्पी पाटील यांनी पहिल्याच प्रयत्नात गतवेळी तिसऱ्या क्रमांकाची तब्बल २८ हजार मते घेतली. तेदेखील येत्या निवडणुकीत ताकदीने उतरण्याची शक्यता आहे. जारकीहोळींच्या कंपनीलाच दौलत चालवायला देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला असून, ‘दौलत’ला सहकार्य करण्याची ग्वाही सहकारमंत्री चंद्रकांतदादांनी चंदगडच्या मेळाव्यात केली आहे. त्यामुळे नवीन चेहरा आणि इलेटिव्ह मेरीट म्हणून येत्या निवडणुकीत अप्पींनाच ताकद मिळण्याची शक्यता आहे.ताई आणि अण्णांचीही तयारी !कुणाही मोठ्या नेत्याचा सहभाग नसतानाही केवळ जनतेच्या पाठबळावर एकहाती संघर्ष करून एव्हीएचसारखी बलाढ्य कंपनी हद्दपार केल्यानंतर विजयोत्सव साजरा करून नंदातार्इंनी तर आपल्या प्रयत्नामुळेच चंदगड तालुका सुजलाम्-सुफलाम् झाल्याचा दावा करीत भरमूअण्णांनीही कृतज्ञता मेळावा घेऊन आगामी निवडणुकीतील उमेदवारीची झलक दाखविली. त्यापाठोपाठ झालेल्या ‘विकास पर्व’ मेळाव्यात गोपाळरावांनीही ताकद दाखवली आहे. अन्य छावण्यांमध्ये शांतता असली तरी आगामी निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.