शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

‘चंदगड’मध्ये विधानसभेचे ‘पडघम’!

By admin | Updated: June 11, 2016 00:53 IST

सामना बहुरंगीच होणार : सारेच लागले तयारीला; पक्ष-गटांची मोर्चेबांधणी गतिमान

राम मगदूम -- गडहिंग्लज आगामी विधानसभा निवडणुकीला अजून साडेतीन वर्षांचा अवकाश आहे. तरीदेखील चंदगड विधानसभा मतदारसंघात आतापासूनच ‘विधानसभे’चे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सर्व मंडळी तयारीला लागली आहेत. किंबहुना, राजकीय पक्षांसह सर्व गटांची मोर्चेबांधणी गतिमान झाली आहे. त्यामुळे गतवेळच्या निवडणुकीप्रमाणेच आगामी निवडणूकदेखील बहुरंगीच होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीत ‘स्वाभिमानी’ व ‘शिवसेना’ वगळता चंदगड, गडहिंंग्लज व आजरा तालुक्यांतील सर्वच नेतेमंडळींनी संध्यादेवी कुपेकरांना साथ दिली. मात्र, त्यानंतरची सार्वत्रिक निवडणूक बहुरंगी आणि चुरशीची झाली. जिल्ह्यात गाजलेली ती निवडणूक आणि त्यानंतर जिल्ह्यासह गडहिंग्लज विभागातील बदललेली राजकीय समीकरणे लक्षात घेतल्यास आगामी निवडणुकीतील लढतीचे चित्रदेखील स्पष्ट होते.गतवेळी ‘राष्ट्रवादी’च्या विद्यमान आमदार संध्यादेवी यांच्याविरोधात त्यांचे सख्खे पुतणे संग्रामसिंह यांनी ‘जनसुराज्य’तर्फे, तर त्यांचे सहकारी अप्पी पाटील यांनी ‘अपक्ष’ निवडणूक लढविली. ‘स्वाभिमानी’चे राजेंद्र गड्यान्नावरही ताकदीने रिंगणात उतरले होते. मात्र, त्यांचेच तत्कालीन सहकारी नितीन पाटील यांनी बंडखोरी केली. माजी आमदार नरसिंगराव पाटील यांना शिवसेनेतर्फे, तर माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांना काँगे्रसतर्फे नशीब आजमावावे लागले. अंतिम टप्प्यात गोपाळराव पाटील यांनी मेहुणे नरसिंगराव यांना पाठिंबा दिला. तथापि, बहुरंगी लढतीचा फायदा संध्यादेवी यांनाच झाला. आगामी निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’तर्फे लढण्यासाठी स्व. कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्यावेळी ‘जनसुराज्य’तर्फे लढलेल्या संग्रामसिंह कुपेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीतर्फे बाभूळकर, तर सेनेतर्फे संग्रामसिंंह यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. ‘स्वाभिमानी’चे गड्यान्नावरही पुन्हा रिंगणात असतील. ‘भाजप’वासी झालेले गोपाळरावदेखील पुन्हा नशीब आजमावतील. नरसिंगराव यांच्या ‘भूमिके’ची प्रतीक्षा असली तरी त्यांचा निर्णय संजय मंडलिक यांच्या ‘भूमिकेवर’ अवलंबून राहील. भरमूअण्णादेखील अखेरचा डाव म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता असली तरी ते कुठल्या पक्षातर्फे लढणार यासाठी वाट पहावी लागेल.अप्पींना ‘ताकद’ मिळणार ? केवळ संघटन कौशल्य आणि ‘गोकाक’चे पाहुणे ‘जारकीहोळी बंधू’च्या पाठबळावर अप्पी पाटील यांनी पहिल्याच प्रयत्नात गतवेळी तिसऱ्या क्रमांकाची तब्बल २८ हजार मते घेतली. तेदेखील येत्या निवडणुकीत ताकदीने उतरण्याची शक्यता आहे. जारकीहोळींच्या कंपनीलाच दौलत चालवायला देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला असून, ‘दौलत’ला सहकार्य करण्याची ग्वाही सहकारमंत्री चंद्रकांतदादांनी चंदगडच्या मेळाव्यात केली आहे. त्यामुळे नवीन चेहरा आणि इलेटिव्ह मेरीट म्हणून येत्या निवडणुकीत अप्पींनाच ताकद मिळण्याची शक्यता आहे.ताई आणि अण्णांचीही तयारी !कुणाही मोठ्या नेत्याचा सहभाग नसतानाही केवळ जनतेच्या पाठबळावर एकहाती संघर्ष करून एव्हीएचसारखी बलाढ्य कंपनी हद्दपार केल्यानंतर विजयोत्सव साजरा करून नंदातार्इंनी तर आपल्या प्रयत्नामुळेच चंदगड तालुका सुजलाम्-सुफलाम् झाल्याचा दावा करीत भरमूअण्णांनीही कृतज्ञता मेळावा घेऊन आगामी निवडणुकीतील उमेदवारीची झलक दाखविली. त्यापाठोपाठ झालेल्या ‘विकास पर्व’ मेळाव्यात गोपाळरावांनीही ताकद दाखवली आहे. अन्य छावण्यांमध्ये शांतता असली तरी आगामी निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.