शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

एकरकमी ‘एफआरपी’चे आव्हान

By admin | Updated: November 8, 2015 23:34 IST

‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद यशस्वी : ५ डिसेंबरनंतर शेतकऱ्यांची लढाई ठरणार

संदीप बावचे- जयसिंगपूर -ऊस परिषद यशस्वी करून खासदार राजू शेट्टी यांनी पहिला टप्पा पार केला आहे. विनाकपात एकरकमी पहिली उचल या मागणीच्या निर्णयाचा चेंडू शासन व कारखानदारांच्या कोर्टात टाकल्यामुळे आता एकरकमी एफआरपीची कोंडी होणार आहे. ५ डिसेंबरपर्यंत शासन व कारखानदारांना एफआरपीचा प्रश्न मिटविण्याचे आव्हान ‘स्वाभिमानी’ने दिले आहे.यंदाच्या चौदाव्या ऊस परिषदेकडे महाराष्ट्रातील साखर कारखानदार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर शुक्रवारी स्वाभिमानीने ऊस परिषद यशस्वी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलूखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे सदाभाऊ खोत यांनी ‘एफआरपी’ ही शेतकऱ्यांच्या हक्काची असून, ती घेतल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून कॉँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांतील शेतकऱ्यांवरील अन्यायाचा पाढा वाचून दाखविला. मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांना साखर कारखानदारीतील कळत नसल्याचेही ते म्हणाले. स्वाभिमानी दूध संघाप्रमाणे साखर कारखानाही चालवून दाखवू. यासाठी दोन कारखान्यांमधील अंतराची अट काढून टाकावी, अशी त्यांनी मागणी केली.खासदार राजू शेट्टी यांनी साखर उद्योगाचा लेखाजोखा परिषदेत मांडून शेतकऱ्यांना याबाबतची सद्य:परिस्थिती समजावून सांगितली. दुष्काळामुळे जेमतेम साखरेचे उत्पादन होणार असल्यामुळे एकरकमी एफआरपी निश्चितच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. यंदाच्या गळीत हंगामात विनाकपात एकरकमी एफआरपी १४ दिवसांच्या आत न देणारे कारखाने बंद पाडण्याचा इशारा देऊन ५ डिसेंबरपर्यंत डेडलाईन त्यांनी दिली आहे. एफआरपीचा प्रश्न शासन व कारखानदारांनी आपल्या पातळीवर चर्चा करून तोडगा काढावा व कारखाने सुरू करावेत, अशी भूमिका घेऊन खा. शेट्टी यांनी शासन व कारखानदारांच्या कोर्टातच एफआरपीचा चेंडू टाकला आहे. एफआरपी एकरकमी देण्याबाबत शासनाची भूमिका ठाम असल्याचे पत्र सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खा. शेट्टी यांना दिल्यामुळे एकरकमी एफआरपीचा तोडगा कारखानदारांना घेऊनच शासनाला सोडवावा लागेल.ऊस परिषद विश्लेषणसीमाभागातील शेतकऱ्यांची उत्स्फूर्त हजेरीमहाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांनी १४ व्या ऊस परिषदेला उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. जाताना एकरकमी विनाकपात पहिल्या उचलीच्या निर्णयाचा बोनस शेतकरी घेऊन गेले आहेत. ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांच्या आत विनाकपात एकरकमी पहिला हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही तर ५ डिसेंबरनंतर कारखाने बंद पाडण्यासाठी आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी तयार राहावे, असेही खा. शेट्टी यांनी सांगितले आहे.शासन कोंडी फोडणार का?एफआरपीचे तीन तुकडे होणार हा मुद्दा उचलून स्वाभिमानीने यंदाच्या हंगामात एफआरपीचे तुकडे करू देणार नाही, एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय कारखानदारांना सुटी देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. शिवाय निर्णयाचा तोडगाही शासन व कारखानदार यांच्या बाजूला ढकलल्यामुळे कारखानदारांची झालेली कोंडी शासन कशी फोडणार याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.