शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानीसमोर गड राखण्याचे आव्हान

By admin | Updated: February 17, 2017 00:51 IST

शिरोळ तालुका : वर्चस्वासाठी चुरशीच्या लढती; काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना, भाजपमुळे रंगत

संदीप बावचे --- जयसिंगपूर --शिरोळ तालुक्यातील सात जिल्हा परिषदा व चौदा पंचायत समितींसाठी निवडणूक होत आहे. तालुक्यात जि.प. व पं.स.च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे हा तालुका स्वाभिमानीचा गड मानला जातो. गत निवडणुकीत दुरंगी लढत झाली होती. यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढतीमुळे मत विभाजनाचा धोका स्वाभिमानीसमोर आहे. त्यामुळे गड राखण्याचे स्वाभिमानीसमोर मोठे आव्हान असणार आहे. आमदारकीनंतर शिरोळ तालुक्यात विधानसभेचा गड जिंकण्यात खासदार राजू शेट्टी यांना यश आलेले नाही. सन १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत पैरा फेडण्याच्या निमित्ताने खा. शेट्टी रिडालोसो सोबत गेल्याने घरचे मैदान नांगरायचे राहूल गेले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचा मित्र पक्ष म्हणून स्वाभिमानीने काम केले. या निवडणुकीतही शिरोळ विधानसभा स्वाभिमानीला जिंकता आली नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले राजू शेट्टी यांच्या शिरोळ तालुक्यात गतवेळी जिल्हा परिषदेच्या आठ पैकी पाच जागा स्वाभिमानीने जिंकल्या. दोन काँग्रेसला, तर एक राष्ट्रवादीला जागा मिळाली. पंचायत समितीच्या सोळा जागांपैकी स्वाभिमानीला आठ, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सहा व दोन अपक्ष असे पक्षीय बलाबल होते. अपक्षांच्या मदतीने इतिहासात पहिल्यांदाच पंचायत समितीवर स्वाभिमानीने झेंडा लावला. दुरंगी, तिरंगी लढतीत गतवेळी स्वाभिमानीला तालुक्यात यश मिळाले होते. यंदा स्वाभिमानीसमोर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व सेना-भाजपचे आव्हान आहे. अनेक गट, गणात तिरंगी, चौरंगी व बहुरंगी लढतीचे चित्र आहे. यामुळे गड राखण्याचे स्वाभिमानीसमोर मोठे आव्हान बनले आहे. या ठिकाणी काँटे की टक्करशिरोळ तालुक्यातील सात जिल्हा परिषद मतदारसंघापैकी दत्तवाड, नांदणी, दानोळी, आलास या चार मतदारसंघात काँटे की टक्कर अशी निवडणूक होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेना-भाजपने तगडे उमेवार दिल्यामुळे येथे तिरंगी लढत होत आहे. पंचायत समितीच्या कोथळी, गणेशवाडी, अकिवाट व अब्दुललाट या खुल्या मतदारसंघातून निवडून येणारा सदस्य सभापती होणार असल्याने याठिकाणी ईर्षा पेटली आहे. विजयासाठी सर्व काहीजि.प. व पं.स. निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. घोडामैदान जवळ आले असून, केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत. परिणामी, प्रत्येक उमेदवार प्रचाराचा फड रंगविण्यात व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे. बैठका, प्रचार रॅली, गृहभेटी, कोपरा सभा यांसह अन्य फंडे आत्मसात करीत उमदेवार व कार्यकर्ते जिवाचे रान करीत आहेत. यात साम, दाम, दंड, भेद या चतु:सुत्रीचा वापर करीत विजयासाठी सर्वकाहीची प्रचिती मतदारसंघात उमेदवार व नेत्यांकडून दिसून येत आहे.वर्चस्वाच्या लढाईत कोण जिंकणार : शिरोळ तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेतृत्व दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, शरदचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर करीत आहेत. तर स्वाभिमानीचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी, सावकर मादनाईक, तसेच भाजपकडून अनिल यादव, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर व शिवसेनेकडून आमदार उल्हास पाटील नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे वर्चस्वाच्या लढाईत कोण जिंकणार, हे मतदारांवर अवलंबून आहे.