शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

स्वाभिमानीसमोर गड राखण्याचे आव्हान

By admin | Updated: February 17, 2017 00:51 IST

शिरोळ तालुका : वर्चस्वासाठी चुरशीच्या लढती; काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना, भाजपमुळे रंगत

संदीप बावचे --- जयसिंगपूर --शिरोळ तालुक्यातील सात जिल्हा परिषदा व चौदा पंचायत समितींसाठी निवडणूक होत आहे. तालुक्यात जि.प. व पं.स.च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे हा तालुका स्वाभिमानीचा गड मानला जातो. गत निवडणुकीत दुरंगी लढत झाली होती. यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढतीमुळे मत विभाजनाचा धोका स्वाभिमानीसमोर आहे. त्यामुळे गड राखण्याचे स्वाभिमानीसमोर मोठे आव्हान असणार आहे. आमदारकीनंतर शिरोळ तालुक्यात विधानसभेचा गड जिंकण्यात खासदार राजू शेट्टी यांना यश आलेले नाही. सन १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत पैरा फेडण्याच्या निमित्ताने खा. शेट्टी रिडालोसो सोबत गेल्याने घरचे मैदान नांगरायचे राहूल गेले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचा मित्र पक्ष म्हणून स्वाभिमानीने काम केले. या निवडणुकीतही शिरोळ विधानसभा स्वाभिमानीला जिंकता आली नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले राजू शेट्टी यांच्या शिरोळ तालुक्यात गतवेळी जिल्हा परिषदेच्या आठ पैकी पाच जागा स्वाभिमानीने जिंकल्या. दोन काँग्रेसला, तर एक राष्ट्रवादीला जागा मिळाली. पंचायत समितीच्या सोळा जागांपैकी स्वाभिमानीला आठ, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सहा व दोन अपक्ष असे पक्षीय बलाबल होते. अपक्षांच्या मदतीने इतिहासात पहिल्यांदाच पंचायत समितीवर स्वाभिमानीने झेंडा लावला. दुरंगी, तिरंगी लढतीत गतवेळी स्वाभिमानीला तालुक्यात यश मिळाले होते. यंदा स्वाभिमानीसमोर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व सेना-भाजपचे आव्हान आहे. अनेक गट, गणात तिरंगी, चौरंगी व बहुरंगी लढतीचे चित्र आहे. यामुळे गड राखण्याचे स्वाभिमानीसमोर मोठे आव्हान बनले आहे. या ठिकाणी काँटे की टक्करशिरोळ तालुक्यातील सात जिल्हा परिषद मतदारसंघापैकी दत्तवाड, नांदणी, दानोळी, आलास या चार मतदारसंघात काँटे की टक्कर अशी निवडणूक होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेना-भाजपने तगडे उमेवार दिल्यामुळे येथे तिरंगी लढत होत आहे. पंचायत समितीच्या कोथळी, गणेशवाडी, अकिवाट व अब्दुललाट या खुल्या मतदारसंघातून निवडून येणारा सदस्य सभापती होणार असल्याने याठिकाणी ईर्षा पेटली आहे. विजयासाठी सर्व काहीजि.प. व पं.स. निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. घोडामैदान जवळ आले असून, केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत. परिणामी, प्रत्येक उमेदवार प्रचाराचा फड रंगविण्यात व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे. बैठका, प्रचार रॅली, गृहभेटी, कोपरा सभा यांसह अन्य फंडे आत्मसात करीत उमदेवार व कार्यकर्ते जिवाचे रान करीत आहेत. यात साम, दाम, दंड, भेद या चतु:सुत्रीचा वापर करीत विजयासाठी सर्वकाहीची प्रचिती मतदारसंघात उमेदवार व नेत्यांकडून दिसून येत आहे.वर्चस्वाच्या लढाईत कोण जिंकणार : शिरोळ तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेतृत्व दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, शरदचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर करीत आहेत. तर स्वाभिमानीचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी, सावकर मादनाईक, तसेच भाजपकडून अनिल यादव, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर व शिवसेनेकडून आमदार उल्हास पाटील नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे वर्चस्वाच्या लढाईत कोण जिंकणार, हे मतदारांवर अवलंबून आहे.