शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानीसमोर गड राखण्याचे आव्हान

By admin | Updated: February 17, 2017 00:51 IST

शिरोळ तालुका : वर्चस्वासाठी चुरशीच्या लढती; काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना, भाजपमुळे रंगत

संदीप बावचे --- जयसिंगपूर --शिरोळ तालुक्यातील सात जिल्हा परिषदा व चौदा पंचायत समितींसाठी निवडणूक होत आहे. तालुक्यात जि.प. व पं.स.च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे हा तालुका स्वाभिमानीचा गड मानला जातो. गत निवडणुकीत दुरंगी लढत झाली होती. यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढतीमुळे मत विभाजनाचा धोका स्वाभिमानीसमोर आहे. त्यामुळे गड राखण्याचे स्वाभिमानीसमोर मोठे आव्हान असणार आहे. आमदारकीनंतर शिरोळ तालुक्यात विधानसभेचा गड जिंकण्यात खासदार राजू शेट्टी यांना यश आलेले नाही. सन १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत पैरा फेडण्याच्या निमित्ताने खा. शेट्टी रिडालोसो सोबत गेल्याने घरचे मैदान नांगरायचे राहूल गेले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचा मित्र पक्ष म्हणून स्वाभिमानीने काम केले. या निवडणुकीतही शिरोळ विधानसभा स्वाभिमानीला जिंकता आली नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले राजू शेट्टी यांच्या शिरोळ तालुक्यात गतवेळी जिल्हा परिषदेच्या आठ पैकी पाच जागा स्वाभिमानीने जिंकल्या. दोन काँग्रेसला, तर एक राष्ट्रवादीला जागा मिळाली. पंचायत समितीच्या सोळा जागांपैकी स्वाभिमानीला आठ, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सहा व दोन अपक्ष असे पक्षीय बलाबल होते. अपक्षांच्या मदतीने इतिहासात पहिल्यांदाच पंचायत समितीवर स्वाभिमानीने झेंडा लावला. दुरंगी, तिरंगी लढतीत गतवेळी स्वाभिमानीला तालुक्यात यश मिळाले होते. यंदा स्वाभिमानीसमोर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व सेना-भाजपचे आव्हान आहे. अनेक गट, गणात तिरंगी, चौरंगी व बहुरंगी लढतीचे चित्र आहे. यामुळे गड राखण्याचे स्वाभिमानीसमोर मोठे आव्हान बनले आहे. या ठिकाणी काँटे की टक्करशिरोळ तालुक्यातील सात जिल्हा परिषद मतदारसंघापैकी दत्तवाड, नांदणी, दानोळी, आलास या चार मतदारसंघात काँटे की टक्कर अशी निवडणूक होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेना-भाजपने तगडे उमेवार दिल्यामुळे येथे तिरंगी लढत होत आहे. पंचायत समितीच्या कोथळी, गणेशवाडी, अकिवाट व अब्दुललाट या खुल्या मतदारसंघातून निवडून येणारा सदस्य सभापती होणार असल्याने याठिकाणी ईर्षा पेटली आहे. विजयासाठी सर्व काहीजि.प. व पं.स. निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. घोडामैदान जवळ आले असून, केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत. परिणामी, प्रत्येक उमेदवार प्रचाराचा फड रंगविण्यात व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे. बैठका, प्रचार रॅली, गृहभेटी, कोपरा सभा यांसह अन्य फंडे आत्मसात करीत उमदेवार व कार्यकर्ते जिवाचे रान करीत आहेत. यात साम, दाम, दंड, भेद या चतु:सुत्रीचा वापर करीत विजयासाठी सर्वकाहीची प्रचिती मतदारसंघात उमेदवार व नेत्यांकडून दिसून येत आहे.वर्चस्वाच्या लढाईत कोण जिंकणार : शिरोळ तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेतृत्व दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, शरदचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर करीत आहेत. तर स्वाभिमानीचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी, सावकर मादनाईक, तसेच भाजपकडून अनिल यादव, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर व शिवसेनेकडून आमदार उल्हास पाटील नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे वर्चस्वाच्या लढाईत कोण जिंकणार, हे मतदारांवर अवलंबून आहे.