शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:24 IST

कोल्हापूर : केंद्र शासनाकडून जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे शिक्षण संस्थांसमोर आव्हान असेल, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज ...

कोल्हापूर : केंद्र शासनाकडून जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे शिक्षण संस्थांसमोर आव्हान असेल, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. यातील उणिवा आणि चांगल्या गोष्टी यांचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी अभ्यास गट नेमून एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिी अधीक्षक कार्यालय ते धैर्यप्रसाद मंगल कार्यालय या मार्गाला शुक्रवारी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे पथ असे नामकरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, आत्तापर्यंत या देशातील शैक्षणिक धोरण सर्वधर्मसमभाव या भावनेवर आधारित होते. नवे शैक्षणिक धोरणही तसेच आहे का? हे तपासले पाहिजे. जीडीपीच्या साडेचार टक्के निधी आपण शिक्षणावर खर्च करतो. तो सहा टक्क्‍यांवर न्यायचा आहे. म्हणजे सुमारे अडीच लाख कोटी रुपये खर्च करावे लागतील. दोन कोटी विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार या धोरणात केला गेला आहे. भविष्यात सर्व शिक्षण संस्था या स्वायत्त असतील. विद्यापीठांचे अस्तित्वच संपेल.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीराम साळुंखे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. अशोक पाटील यांनी केले. यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा प्राचार्या शुभांगी गावडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, सरिता मोरे, माजी नगरसेवक अर्जुन माने, स्वाती यवलुजे, अशोक जाधव, नंदकुमार मोरे, नीलेश देसाई, प्राचार्य डॉ. युवराज भोसले, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार आदी उपस्थित होते.

चौकट

डॉ. बापूजी साळुंखे यांचे योगदान प्रेरणादायी

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षण प्रसाराचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांचे कार्य बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे. राज्यातील शैक्षणिक जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

फोटो : ०१०१२०२० काेल पालकमंत्री न्यूज

ओळी : कोल्हापुरातील धैर्यप्रसाद हॉल ते एस.पी. ऑफिस चौक या मार्गाचे शुक्रवारी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे पथ असे नामकरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, सरिता मोरे, स्वाती यवलुजे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, नंदकुमार मोरे, अर्जुन माने उपस्थित होते.