शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

अंबाबाई आराखडा राबविण्याचे आव्हान

By admin | Updated: June 10, 2017 20:17 IST

महापालिकेच्या प्रकल्पांना नकार घंटेचे ग्रहण

 कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेने हाती घेतलेल्या प्रकल्पांना नकार घंटेचे ग्रहण लागले आहे. या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा दिलेल्या वेळेत प्रभावीपणे राबविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्यांना कोल्हापूरकरांची साथ आवश्यक आहे. अंबाबाई मंदिर विकास आराखड्यावर मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीत मुख्य सचिव सुमित मलिक यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना किती वर्षांत पहिला टप्पा पूर्ण करणार हे विचारल्यावर महापालिकेने दोन वर्षांचे अल्टिमेटम दिले. त्यावर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कोल्हापूरचा अत्यंत वाईट अनुभव आहे. येथे कोणतेही प्रकल्प मार्गी लागत नाहीत. दहा वर्षांपासून नगरोत्थान प्रकल्प महापालिकेने पूर्ण केलेला नाही. त्यामुळे दोन वर्षांत खरेच तुम्ही हे काम करणार, असा उपरोधिक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर महापालिका अधिकारी निरुत्तर झाले आणि मंदिराचा आराखडा नक्की पूर्ण करू, असे आश्वासन दिले आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत महापालिकेच्या प्रकल्पांचा इतिहास पाहता अनुभव अतिशय वाईट आहे. नगरोत्थान, थेट पाईपलाईन, सांडपाणी व्यवस्थापनाचा एसटीपी प्लॅन, पंचगंगा नदी शुद्धिकरण यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प अजूनही रखडले आहेत. ते पूर्ण व्हायला आणखी किती कालावधी लागेल, हेदेखील सांगता येत नाही. ‘आयआरबी’च्या रस्ते प्रकल्पाने अनेकांचा जीव घेतला आणि टोल आंदोलनामुळे शासनाला भुर्दंड बसला. कधी ठेकेदार चुकीची कामे करतात, तर कधी नागरिक आंदोलने करतात. त्यामुळे कोल्हापुरात कोणताही नवा प्रकल्प राबवायला कंपन्या आणि अधिकारी तयार होत नाहीत, अशी बदनामी झाली आहे. याचेच प्रत्यंतर शुक्रवारच्या बैठकीत आले. त्यामुळे अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यालाही अशी आडकाठी न बसता दिलेल्या वेळेत काम पूर्ण करणे हे महापालिकेपुढील आव्हान आहे. त्यासाठी कोल्हापूरच्या नागरिकांकडूनही सहकार्य अपेक्षित आहे. ---------------- बदलांचा आताच अंतर्भाव व्हावा आराखड्याला मुख्य सचिवांची मान्यता मिळाल्याने केवळ मुख्यमंत्र्यांच्या लेखी परवानगीची औपचारिकता बाकी आहे. पुढील पंधरा दिवसांत ते देखील पूर्ण होईल. त्यामुळे नागरिकांनी किंवा नगरसेवकांनी सुचविलेल्या मात्र आराखाड्यानुरूप संयुक्तिक असलेल्या सूचनांचा आताच अंतर्भाव करावा लागणार आहे. विद्यापीठ गेटसमोरील दर्शन मंडपाला सर्वांचाच विरोध आहे. त्यासाठी फरासखान्याची वास्तूच योग्य असल्याचे अमरजा निंबाळकर यांनी बैठकीत मांडले आहे. याशिवाय महाद्वारमधून प्रवेश बंदी, बिंदू चौक सबजेलमुळे मल्टिलेव्हल पार्किंग होणार का, अशा सर्व बाबींचा तातडीने विचार होऊन फेरबदल करणे आवश्यक आहे. ----------------- राज्यात संरक्षित स्मारकाच्या नियमांचा विचार पूरातत्त्व खात्याच्यावतीने अंबाबाई मंदिराला राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्याची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आली आहे. केवळ पुजाऱ्यांनी हरकत घेतलेल्या करवीर आणि अंबाबाईची मालकी या शब्दांमुळे विलंब झाला आहे. ही त्रुटी दूर झाली की काही दिवसांतच मंदिर पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित जाईल. त्यामुळे हेरिटेज वास्तूंच्या नियमांना अनुसरून विकासकामे करावी लागणार आहेत. ----------------- अंबाबाई मंदिराचा फोटो वापरावा ----------------