शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

अंबाबाई आराखडा राबविण्याचे आव्हान

By admin | Updated: June 10, 2017 20:17 IST

महापालिकेच्या प्रकल्पांना नकार घंटेचे ग्रहण

 कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेने हाती घेतलेल्या प्रकल्पांना नकार घंटेचे ग्रहण लागले आहे. या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा दिलेल्या वेळेत प्रभावीपणे राबविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्यांना कोल्हापूरकरांची साथ आवश्यक आहे. अंबाबाई मंदिर विकास आराखड्यावर मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीत मुख्य सचिव सुमित मलिक यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना किती वर्षांत पहिला टप्पा पूर्ण करणार हे विचारल्यावर महापालिकेने दोन वर्षांचे अल्टिमेटम दिले. त्यावर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कोल्हापूरचा अत्यंत वाईट अनुभव आहे. येथे कोणतेही प्रकल्प मार्गी लागत नाहीत. दहा वर्षांपासून नगरोत्थान प्रकल्प महापालिकेने पूर्ण केलेला नाही. त्यामुळे दोन वर्षांत खरेच तुम्ही हे काम करणार, असा उपरोधिक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर महापालिका अधिकारी निरुत्तर झाले आणि मंदिराचा आराखडा नक्की पूर्ण करू, असे आश्वासन दिले आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत महापालिकेच्या प्रकल्पांचा इतिहास पाहता अनुभव अतिशय वाईट आहे. नगरोत्थान, थेट पाईपलाईन, सांडपाणी व्यवस्थापनाचा एसटीपी प्लॅन, पंचगंगा नदी शुद्धिकरण यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प अजूनही रखडले आहेत. ते पूर्ण व्हायला आणखी किती कालावधी लागेल, हेदेखील सांगता येत नाही. ‘आयआरबी’च्या रस्ते प्रकल्पाने अनेकांचा जीव घेतला आणि टोल आंदोलनामुळे शासनाला भुर्दंड बसला. कधी ठेकेदार चुकीची कामे करतात, तर कधी नागरिक आंदोलने करतात. त्यामुळे कोल्हापुरात कोणताही नवा प्रकल्प राबवायला कंपन्या आणि अधिकारी तयार होत नाहीत, अशी बदनामी झाली आहे. याचेच प्रत्यंतर शुक्रवारच्या बैठकीत आले. त्यामुळे अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यालाही अशी आडकाठी न बसता दिलेल्या वेळेत काम पूर्ण करणे हे महापालिकेपुढील आव्हान आहे. त्यासाठी कोल्हापूरच्या नागरिकांकडूनही सहकार्य अपेक्षित आहे. ---------------- बदलांचा आताच अंतर्भाव व्हावा आराखड्याला मुख्य सचिवांची मान्यता मिळाल्याने केवळ मुख्यमंत्र्यांच्या लेखी परवानगीची औपचारिकता बाकी आहे. पुढील पंधरा दिवसांत ते देखील पूर्ण होईल. त्यामुळे नागरिकांनी किंवा नगरसेवकांनी सुचविलेल्या मात्र आराखाड्यानुरूप संयुक्तिक असलेल्या सूचनांचा आताच अंतर्भाव करावा लागणार आहे. विद्यापीठ गेटसमोरील दर्शन मंडपाला सर्वांचाच विरोध आहे. त्यासाठी फरासखान्याची वास्तूच योग्य असल्याचे अमरजा निंबाळकर यांनी बैठकीत मांडले आहे. याशिवाय महाद्वारमधून प्रवेश बंदी, बिंदू चौक सबजेलमुळे मल्टिलेव्हल पार्किंग होणार का, अशा सर्व बाबींचा तातडीने विचार होऊन फेरबदल करणे आवश्यक आहे. ----------------- राज्यात संरक्षित स्मारकाच्या नियमांचा विचार पूरातत्त्व खात्याच्यावतीने अंबाबाई मंदिराला राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्याची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आली आहे. केवळ पुजाऱ्यांनी हरकत घेतलेल्या करवीर आणि अंबाबाईची मालकी या शब्दांमुळे विलंब झाला आहे. ही त्रुटी दूर झाली की काही दिवसांतच मंदिर पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित जाईल. त्यामुळे हेरिटेज वास्तूंच्या नियमांना अनुसरून विकासकामे करावी लागणार आहेत. ----------------- अंबाबाई मंदिराचा फोटो वापरावा ----------------