शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बरखास्त बँकेच्या वटहुकुमास न्यायालयात आव्हान

By admin | Updated: January 28, 2016 01:08 IST

म्हणणे मांडण्याचे सरकारला आदेश : कायदा ‘मागच्या तारखे’ने कसा लागू करणार..?

विश्वास पाटील --कोल्हापूर -रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार राज्य शासनाने बरखास्त सहकारी बँकांच्या संचालक मंडळास अपात्र ठरविणारा वटहुकूम दि. २१ जानेवारीस काढला आहे. त्यास धुळे-नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी बुधवारी उच्च न्यायालयात आव्हान दिले. याप्रकरणी म्हणणे मांडण्यासाठी राज्य सरकारने पंधरा दिवसांची मुदत मागून घेतली. त्यामुळे पुढील सुनावणीवेळी या तरतुदीस स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसह बरखास्त बँकांतील अपात्र होऊ शकणाऱ्या संचालकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. कोणताही कायदा लागू करताना तो मागच्या तारखेने कसा लागू करता येईल, अशी विचारणा न्यायालयाने सरकारला केली.गैरकारभारामुळे रिझर्व्ह बँकेने ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका व नागरी सहकारी बँकांवर बरखास्तीची कारवाई केली, त्या बँकांच्या संचालकांना दहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविणाऱ्या अध्यादेशावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दि. २१ जानेवारीस सही केली. त्यामुळे दि. २१ जानेवारी २००६ नंतर अशी कारवाई ज्या बँकांवर झाली आहे, त्या बँकांचे सर्व संचालक अपात्र ठरले आहेत. त्या बँकेवर कधी कारवाई झाली तेव्हापासून पुढील दहा वर्षे ते संचालक अपात्र असतील. राज्य बँकेसह पाच जिल्हा मध्यवर्ती बँका आणि ६० नागरी सहकारी बँकांच्या संचालकांवर या अध्यादेशान्वये कारवाई होणार आहे. त्याची प्रक्रिया सहकार खात्यातर्फे सुरू असतानाच या निर्णयास न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. राज्य सरकारने अगोदरच कॅव्हेट दाखल केले होते, त्यामुळे या निर्णयास बुधवारीच स्थगिती मिळू शकली नाही. सहकार खात्याच्या पातळीवर संचालकांना अपात्र करण्याची प्रक्रिया राबवितानाही पेच तयार झाला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३ (सीए) मध्ये फेब्रुवारी २०१३ मध्ये दुरुस्ती करण्यात आली. हे कलम संचालकांची अपात्रता निश्चित करणारे आहे व कलम ७८(ए) हे प्रत्यक्षात संबंधित संचालकांवर कारवाई करणारे आहे; परंतु घटना दुरुस्ती होऊन तीन वर्षे होत आली तरी अजून राज्य सरकारने त्याचे अधिकारच कुणाला प्रदान केलेले नाहीत. त्यामुळे विभागीय सहनिबंधक यांनाही या संचालकांवर अपात्रतेची कारवाई करण्यास मर्यादा आल्या आहेत. राज्य सरकारने त्यांना फक्त तोंडी सूचना दिल्या आहेत. लेखी आदेश त्यामुळेच देता आलेले नाहीत. हे अधिकार प्रदान करण्यात येत असल्याचे आदेश काढल्यानंतरच विभागीय सहनिबंधकांना ही प्रक्रिया राबविता येऊ शकेल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.कोणत्या बँकांवर परिणाम..?कोणत्या बँकांवर परिणाम..?महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक धुळे-नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती बँक नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक बीड जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राज्यातील ६० नागरी बँका