शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

महापालिका क्षेत्रात साखळी तोडण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाची साखळी तोडण्याचे महापालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासन जरी प्रयत्न ...

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाची साखळी तोडण्याचे महापालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासन जरी प्रयत्न करीत असले तरी नागरिकांमधील बेशिस्तपणा नडत असल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारपेठेत होणारी गर्दी, सामाजिक अंतर राखण्याकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे गेल्या दहा दिवसांपासून सरासरी २७० नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे.

कोल्हापूर शहराची लोकसंख्या सहा लाखांच्या आसपास आहे, तसेच बाहेरील गावातून रोज शहरात येणाऱ्यांची संख्या ही सव्वालाखाच्या घरात आहे. बारा ते पंधरा गावे ही शहरालगत असल्याने रोज तेथील नागरिक नोकरी, व्यवसाय करण्याच्या निमित्ताने शहरात येतात. त्यामुळे शहरात रस्त्यावर नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळते. सकाळी सात ते अकरा यावेळेत भाजी विक्रीसह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, फळगाड्यांना परवानगी देण्यात आली असल्याने मर्यादित वेळेत प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण राखण्यास महापालिका प्रशासनास अजूनही यश मिळालेले नाही.

या गर्दीत कोरोना वाहक फिरत असल्याने संसर्ग वाढत चालला आहे. गेल्या दहा दिवसांत रोज सरासरी २७२ ते २७९ नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे. मागच्या मंगळवारी व बुधवारी तर ही रुग्णसंख्या अनुक्रमे ३४० व ३५८ इतकी होती. यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातील, राज्यातील रुग्णांचाही समावेश आहे. कोल्हापूर शहरात सध्या २७५३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यावरूनच बाधितांचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे.