शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

महापालिका क्षेत्रात साखळी तोडण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाची साखळी तोडण्याचे महापालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासन जरी प्रयत्न ...

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाची साखळी तोडण्याचे महापालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासन जरी प्रयत्न करीत असले तरी नागरिकांमधील बेशिस्तपणा नडत असल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारपेठेत होणारी गर्दी, सामाजिक अंतर राखण्याकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे गेल्या दहा दिवसांपासून सरासरी २७० नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे.

कोल्हापूर शहराची लोकसंख्या सहा लाखांच्या आसपास आहे, तसेच बाहेरील गावातून रोज शहरात येणाऱ्यांची संख्या ही सव्वालाखाच्या घरात आहे. बारा ते पंधरा गावे ही शहरालगत असल्याने रोज तेथील नागरिक नोकरी, व्यवसाय करण्याच्या निमित्ताने शहरात येतात. त्यामुळे शहरात रस्त्यावर नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळते. सकाळी सात ते अकरा यावेळेत भाजी विक्रीसह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, फळगाड्यांना परवानगी देण्यात आली असल्याने मर्यादित वेळेत प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण राखण्यास महापालिका प्रशासनास अजूनही यश मिळालेले नाही.

या गर्दीत कोरोना वाहक फिरत असल्याने संसर्ग वाढत चालला आहे. गेल्या दहा दिवसांत रोज सरासरी २७२ ते २७९ नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे. मागच्या मंगळवारी व बुधवारी तर ही रुग्णसंख्या अनुक्रमे ३४० व ३५८ इतकी होती. यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातील, राज्यातील रुग्णांचाही समावेश आहे. कोल्हापूर शहरात सध्या २७५३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यावरूनच बाधितांचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे.