शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

चकोते ग्रुपचा स्वच्छता अभियानात पुढाकार

By admin | Updated: March 19, 2015 23:50 IST

३०० बसस्थानके करणार चकाचक : अण्णासाहेब चकोते यांचा संकल्प

जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील यशस्वी उद्योजक चकोते ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अण्णासाहेब चकोते यांनी उद्योगाबरोबर सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम केले आहे. प्रत्येकवर्षी अनोखा उपक्रम राबवून आजपर्यंत त्यांनी समाजासाठी कार्य केले आहे. त्याचप्रमाणे यावर्षीही आपल्या वाढदिनी २४ मार्चला एक अनोखा उपक्रम राबविण्याचा संकल्प चकोते यांनी केला असून, ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत ३०० बसस्थानकांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. उद्योजक अण्णासाहेब चकोते यांनी गेली २५ वर्षे बेकरी उद्योगात आपला नावलौकिक मिळविला आहे. उद्योगातील यशस्वी वाटचालीबरोबर सामाजिक बांधीलकी जपण्याचे कार्य ते मोठ्या जोमाने करीत आहेत. विविध सामाजिक कार्य करीत असताना प्रत्येक वाढदिनी एक नवीन विधायक व समाजाला दिशा देणारा उपक्रम राबविण्याची परंपरा त्यांनी निर्माण केली आहे. वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, दुष्काळग्रस्त भागात पाणी व चारा वाटप, रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, अपंग व गतिमंद मुलांना दत्तक घेणे, असे उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. २०१३ साली डफळापूर (ता. जत) हे गाव दत्तक घेऊन तब्बल पाच महिने दररोज सव्वा लाख लिटर पाणीपुरवठा व चारा वाटप त्यांनी केले होते. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेला ‘स्वच्छ भारत अभियान’ हा उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. अण्णासाहेब चकोते यांचा ४१ वा वाढदिवस २४ मार्च २०१५ रोजी साजरा होत असून, यानिमित्त महाराष्ट्रातील व सीमाभागातील २४ जिल्ह्यांतील ३०० बसस्थानकांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये चकोते ग्रुपचे सर्व कर्मचारी, वितरक, रिटेलर्स, हितचिंतक असे जळपास दहा हजार लोक सहभागी होणार आहेत.स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी ३०० स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्य झाडू, टोपली, कॅप, मास्क, आदी साहित्य पुरविले जाणार आहे. याचबरोबर वाढदिनी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, फळवाटप, आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. एक यशस्वी मराठी उद्योजक म्हणून चकोते यांनी नावलौकिक तर मिळविला आहेच. चकोते ग्रुपच्या नांदणी, लातूर युनिटमधून उत्पादनाची कीर्तीची पताकाही उंचावत आहेत. (प्रतिनिधी)वयाच्या १६ व्या वर्षी व्यावसायिक जीवनाची सुरुवात केली होती. येत्या जूनपासून रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू होत असून, वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबविणार आहोत. स्वच्छता अभियान हा राज्यातील पहिला विधायक उपक्रम असून, या अभियानातून लोकांना स्वच्छतेची सवय लागावी, हा हेतू आहे. सामाजिक उपक्रमातून समाधान मिळते.- अण्णासाहेब चकोते,अध्यक्ष, चकोते ग्रुप आॅफ इंडस्ट्रीज.