शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

कुरुंदवाड पालिकेत रंगतोय खुर्चीचा खेळ

By admin | Updated: July 18, 2014 00:22 IST

६३ वर्षांत ६८ नगराध्यक्ष : विकासापेक्षा खुर्चीचे राजकारण

गणपती कोळी - कुरुंदवाडयेथील पालिकेतील नेत्यांचे टोकाचे राजकारण, दल बदलू नगरसेवक, प्रत्येकवेळी त्रिशंकू परिस्थिती, आदी कारणांमुळे या पालिकेला गेल्या ६३ वर्षांत ६८ नगराध्यक्ष लाभले आहेत. ना. बा. गायकवाड, रावसाहेब पाटील, जयराम पाटील वगळता कोणत्याही नगराध्यक्षाला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करता आलेला नाही. खुर्चीसाठी राजकारण या धोरणामुळे शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाही.शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड हे निमशहर आहे. २५ हजार लोकवस्ती असलेली ‘क’ दर्जाची नगरपालिका आहे. मात्र, येथील राजकीय नेत्यांची महत्त्वाकांक्षा, ईर्षा आणि सत्तेसाठी वाट्टेल ते अशा भूमिकेमुळे पालिका ‘क’ दर्जाची असली, तरी राजकारण मात्र ‘अ’ दर्जाचेच राहिले आहे. येथील राजकारण अनेकवेळा जिल्हा नव्हे, तर मुंबईच्या नेत्यांचीही डोकेदुखी ठरली आहे.संस्थानकालीन असलेल्या शहरात १९५१ ला नगरपालिका अस्तित्वात आली. मात्र, नेत्यांचे टोकाचे व सोयीचे राजकारण, सत्तेसाठी दल बदलू नगरसेवक व पालिकेत त्रिशंकू परिस्थिती यामुळे पालिकेला ६३ वर्षांत ६८ नगराध्यक्ष लाभले आहेत. त्यापैकी २० वेळा प्रशासक व तहसीलदार यांना कार्यभार सांभाळावा लागला आहे. पहिले नगराध्यक्ष ना. बा. गायकवाड, रावसाहेब पाटील, जयराम पाटील वगळता कोणत्याही नगराध्यक्षांना पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करता आलेला नाही, तर शं. रा. शिंदे, बाबासाहेब देसाई, भा. चि. निटवे यांच्याव्यतिरिक्त इतर नगराध्यक्षांना फार काळ खुर्ची टिकविता आली नाही.शहरात रावसाहेब पाटील, रामचंद्र डांगे व जयराम पाटील हे तीन प्रमुख राजकीय गट असून, प्रत्येक गट आपआपल्या प्रभागात अस्तित्व राखून आहे. त्यामुळे पालिकेच्या बहुतेक निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होते. निवडणुकीनंतर नेत्यांबरोबर नगरसेवकही सोयीचे राजकारण करीत असल्याने पालिकेला वारंवार राजकीय भूकंप बसत असतो. शिवाय अलीकडच्या काळात सत्तेतील सर्वांना पदाची संधी यामुळे नगराध्यक्षपदाची यादी वाढतच आहे. परिणामी, अल्प कालावधी, वारंवार राजकीय सत्तांतर यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसत आहे.अशी मिळाली संधी-ाालिकेच्या इतिहासात आ. कृ. माने, जयराम पाटील, कविता जोंग यांना दोनवेळा नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. -जयराम पाटील १९८५ ते १९९१ व २००१ ते २००६ असे दोनवेळा एकूण ११ वर्षे नगराध्यक्ष पदावर राहणारे एकमेव नगराध्यक्ष ठरले आहेत.