शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

उद्योगासाठी वापराच्या साखरेवर सेस बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:24 IST

कोल्हापूर : शीतपेये, आइस्क्रीमपासून तत्सम खाद्य उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे ६५ टक्के साखरेवर सेस बसवून त्याचा केंद्र सरकारने स्वतंत्र फंड तयार करावा व त्याचा वापर अडचणीच्या काळात शेतकºयांची ऊस बिले देण्यासाठीच करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली.शरद ...

कोल्हापूर : शीतपेये, आइस्क्रीमपासून तत्सम खाद्य उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे ६५ टक्के साखरेवर सेस बसवून त्याचा केंद्र सरकारने स्वतंत्र फंड तयार करावा व त्याचा वापर अडचणीच्या काळात शेतकºयांची ऊस बिले देण्यासाठीच करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली.शरद पवार यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. सुरुवातीलाच त्यांनी साखर उद्योगातील अडचणी सोडविण्यासाठी केंद्र सरकारने मदत न केल्यास पुढील हंगाम घेणे कारखान्यांना अडचणीचे ठरेल, अशी भीती व्यक्त केली. पवार म्हणाले, ‘साखर उद्योगाच्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनीच बैठक घ्यावी, असा आमचा प्रयत्न होता; परंतु त्यांनी त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची समिती नियुक्त केली आहे. त्यामध्ये रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री राधामोहन सिंह व पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे. या समितीची बैठक सोमवारी सायंकाळी दिल्लीत आहे. या बैठकीत मुख्यत: कोणत्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, यासंबंधीच्या सूचना मी गडकरी यांना पाठविल्या आहेत. सध्या देशात गरजेपेक्षा जास्त साखर उत्पादन झाल्यामुळे हा दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बाजारभाव सुधारायचा असेल, तर केंद्राने साखर निर्यातीसाठी थेट मदत केली पाहिजे. मी कृषिमंत्री असताना तशी मदत केली होती, अशी आठवण पवार यांनी करून दिली.पवार यांनी केलेल्या सूचना१) आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे दर कमी आहेत. त्यामुळे आपली साखर तिथे स्पर्धेत टिकाव धरत नाही. म्हणून केंद्राने कारखाना ते बंदर व पुन्हा बंदर ते ती ज्या देशात विकली जाणार आहे तेथेपर्यंतचा वाहतुकीचा खर्च द्यावा.२) कारखान्यांवर ऊस बिले देण्यासाठी साखर विक्री करण्याचा दबाव आहे. त्यामुळेही बाजारात आवक जास्त होत आहे. त्यामुळे ही साखर गोदामात ठेवण्याचा खर्च व बँकांच्या कर्जाचे व्याज केंद्र सरकारने द्यावे.३) केंद्र सरकारने आग्रह केला म्हणून साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प उभारले; परंतु पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेले असताना इथेनॉलचे दर मात्र सरकारने वाढविलेले नाहीत. त्याचा फायदा पेट्रोलियम कंपन्यांना होत आहे. इथेनॉलची किंमत वाढवून द्यावी.४) उत्पादीत साखरेपैकी ६५ टक्के साखर खाद्य उद्योगासाठी वापरली जाते. साखर स्वस्त झाली म्हणून शीतपेयांच्या किमती कमी होत नाहीत. त्याचा फायदा कंपन्यांना होतो. म्हणून या साखरेवर केंद्राने सेस बसवावा व त्यातील पैशांचा ऊसदर स्थिरता निधी तयार करावा. ऊस बिलासाठीच ही रक्कम वापरण्याचे बंधन घालावे.शेट्टी यांनी बोलविलेल्या बैठकीस जाणारएकेकाळचे टोकाचे राजकीय विरोधक असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याशी पवार यांनीही जुळवून घेतल्याचे दिसून आले. शेट्टी यांच्या सोबतीचा अनुभव कसा आहे, अशी विचारणा केल्यावर पवार यांनी शेतकºयांच्या भल्यासाठी जे काम करतात त्यांच्यासोबत जाण्यास मला गैर वाटत नाही. त्यांनी शेतकºयांच्या प्रश्नांवर दिल्लीत उद्या, बुधवारी जी बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला मी जाणार आहे. कारखानदार व आपण मिळून राज्य सरकारला वठणीवर आणूया, असे शेट्टी म्हणत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर पवार यांनी हसत हसत ‘हा शेट्टी यांच्या राजकारणातला गुणात्मक बदल आहे,’ अशी टिप्पणी केली.