शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावडा मार्गाचे लवकरच काँक्रिटीकरण

By admin | Updated: October 2, 2016 00:50 IST

सर्वेक्षणाला चार दिवसांत प्रारंभ : कोल्हापूर-तळेरे ९९ कि.मी.चे रुंदीकरण

तानाजी पोवार, कोल्हापूर : कोल्हापूर ते तळेरे या गगनबावडामार्गे कोकणाला जोडणाऱ्या राज्य महामार्गाच्या रुंदीकरण प्रकल्पाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला. या सुमारे ९९ किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे सर्र्वेक्षण करण्याचे काम मुंबईतील एईकॉन कंपनीला देण्यात आले आहे. येत्या चार दिवसांत या कंपनीमार्फत मार्गाच्या सर्वेक्षणचे काम सुरू करण्यात येणार आहे. हा मार्ग मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार असून, तो संपूर्णपणे सिमेंट-काँक्रीटचा करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्याच्या कामाला पुष्टी मिळणार आहे. हे सर्वेक्षण सहा महिन्यांत पूर्ण करून पाठोपाठ कामालाही प्रारंभ करण्यात येणार आहे. कोल्हापूरमार्गे कोकणात गोव्याकडे जाण्यासाठी आंबोली, राधानगरी आणि गगनबावडा या तीन मार्गांवरून वाहतूक होते; पण कोकणात अथवा गोव्याकडे जाण्यासाठी कोल्हापूर-गगनबावडा-तळेरे या मार्गाचा अवलंब वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात होतो; तसेच तो सोयीचाही मागला जातो. त्यामुळे कोल्हापूर ते गगनबावडामार्गे तळेरेपर्यंत व मुंबई ते गोवा राज्य महामार्गापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. या मार्गावरील वाहतुकीचा भार पाहता, या मार्गाचे रुंदीकरण करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. वाहतुकीचे वाढते प्रमाण पाहता रस्ता अपुरा पडत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या मार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या अडचणी लक्षात घेता, आहे त्याच मार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. या रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी सल्लागार म्हणून मुंबईच्या एईकॉन कंपनीची निवड केली आहे. या कंपनीमार्फत येत्या चार दिवसांत सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. दुर्घटना टाळण्यासाठी... कोपार्डेपासून कोकणापर्यंत नेहमीच मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे रस्त्यांची खडी उखडून रस्ते खराब होतात. त्यामुळे वाहने घसरून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. यामुळे रस्त्याचा दर्जा सुस्थितीत राहावा, पावसाचाही त्याच्यावर परिणाम होऊ नये म्हणून तळेरेपर्यंतचा सर्व रस्ता हा काँक्रीटचा होणार आहे. भूसंपादनात अडचण नाही सध्याचा रस्ता हा साडेपाच मीटर रुंदीचा आहे. त्याचे रुंदीकरण करताना तो सुमारे १० मीटर रुंद होणार आहे. रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यात विशेष अडचणी येणार नाही. या रस्त्याच्या दोन्हीही बाजूंना मोठ्या प्रमाणात जागा सोडून विकास झालेला आहे. काही मोजक्याच ठिकाणी असणाऱ्या अडचणी तडजोडीने सोडविता येणार आहेत. मार्गावर पूल नाही संपूर्ण मार्गावर कोठेही पूल असणार नाहीत. काही ठिकाणी पाणी रस्त्याखालून जाण्यासाठी मोरीची लहान-मोठी कामे असणार आहेत. रस्ता दहा मीटर रुंद होणार कोल्हापूर-गगनबावडा-तळेरे हा ९९ किलोमीटरचा रस्ता बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. तेथून पुढे हा रस्ता मुंबई ते गोवा मार्गाला जोडण्यात येणार आहे. सध्या हा मार्ग अवघा ५.५ मीटर रुंद असून, त्याचे सुमारे १० मीटरपर्यंत रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे अवजड वाहनांनाही तो वाहतुकीस सोयीस्कर होईल. यांचेही रुंदीकरण वेंगुर्ला ते मठ, बोर्डी, अंबोली, चंदगडमार्गे बेळगाव या मार्गाचेही रुंदीकरण दहा मीटरपर्यंत करण्यात येणार आहे. याशिवाय रेड्डी, सावंतवाडी, अंबोली, आजरा, गडहिंग्लजमार्गे संकेश्वर या मार्गांचेही रुंदीकरणाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे.