शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गगनबावडा मार्गाचे लवकरच काँक्रिटीकरण

By admin | Updated: October 2, 2016 00:50 IST

सर्वेक्षणाला चार दिवसांत प्रारंभ : कोल्हापूर-तळेरे ९९ कि.मी.चे रुंदीकरण

तानाजी पोवार, कोल्हापूर : कोल्हापूर ते तळेरे या गगनबावडामार्गे कोकणाला जोडणाऱ्या राज्य महामार्गाच्या रुंदीकरण प्रकल्पाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला. या सुमारे ९९ किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे सर्र्वेक्षण करण्याचे काम मुंबईतील एईकॉन कंपनीला देण्यात आले आहे. येत्या चार दिवसांत या कंपनीमार्फत मार्गाच्या सर्वेक्षणचे काम सुरू करण्यात येणार आहे. हा मार्ग मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार असून, तो संपूर्णपणे सिमेंट-काँक्रीटचा करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्याच्या कामाला पुष्टी मिळणार आहे. हे सर्वेक्षण सहा महिन्यांत पूर्ण करून पाठोपाठ कामालाही प्रारंभ करण्यात येणार आहे. कोल्हापूरमार्गे कोकणात गोव्याकडे जाण्यासाठी आंबोली, राधानगरी आणि गगनबावडा या तीन मार्गांवरून वाहतूक होते; पण कोकणात अथवा गोव्याकडे जाण्यासाठी कोल्हापूर-गगनबावडा-तळेरे या मार्गाचा अवलंब वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात होतो; तसेच तो सोयीचाही मागला जातो. त्यामुळे कोल्हापूर ते गगनबावडामार्गे तळेरेपर्यंत व मुंबई ते गोवा राज्य महामार्गापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. या मार्गावरील वाहतुकीचा भार पाहता, या मार्गाचे रुंदीकरण करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. वाहतुकीचे वाढते प्रमाण पाहता रस्ता अपुरा पडत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या मार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या अडचणी लक्षात घेता, आहे त्याच मार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. या रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी सल्लागार म्हणून मुंबईच्या एईकॉन कंपनीची निवड केली आहे. या कंपनीमार्फत येत्या चार दिवसांत सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. दुर्घटना टाळण्यासाठी... कोपार्डेपासून कोकणापर्यंत नेहमीच मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे रस्त्यांची खडी उखडून रस्ते खराब होतात. त्यामुळे वाहने घसरून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. यामुळे रस्त्याचा दर्जा सुस्थितीत राहावा, पावसाचाही त्याच्यावर परिणाम होऊ नये म्हणून तळेरेपर्यंतचा सर्व रस्ता हा काँक्रीटचा होणार आहे. भूसंपादनात अडचण नाही सध्याचा रस्ता हा साडेपाच मीटर रुंदीचा आहे. त्याचे रुंदीकरण करताना तो सुमारे १० मीटर रुंद होणार आहे. रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यात विशेष अडचणी येणार नाही. या रस्त्याच्या दोन्हीही बाजूंना मोठ्या प्रमाणात जागा सोडून विकास झालेला आहे. काही मोजक्याच ठिकाणी असणाऱ्या अडचणी तडजोडीने सोडविता येणार आहेत. मार्गावर पूल नाही संपूर्ण मार्गावर कोठेही पूल असणार नाहीत. काही ठिकाणी पाणी रस्त्याखालून जाण्यासाठी मोरीची लहान-मोठी कामे असणार आहेत. रस्ता दहा मीटर रुंद होणार कोल्हापूर-गगनबावडा-तळेरे हा ९९ किलोमीटरचा रस्ता बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. तेथून पुढे हा रस्ता मुंबई ते गोवा मार्गाला जोडण्यात येणार आहे. सध्या हा मार्ग अवघा ५.५ मीटर रुंद असून, त्याचे सुमारे १० मीटरपर्यंत रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे अवजड वाहनांनाही तो वाहतुकीस सोयीस्कर होईल. यांचेही रुंदीकरण वेंगुर्ला ते मठ, बोर्डी, अंबोली, चंदगडमार्गे बेळगाव या मार्गाचेही रुंदीकरण दहा मीटरपर्यंत करण्यात येणार आहे. याशिवाय रेड्डी, सावंतवाडी, अंबोली, आजरा, गडहिंग्लजमार्गे संकेश्वर या मार्गांचेही रुंदीकरणाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे.