शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासन ऊसदर स्थिरता निधी स्थापन करणार; अभ्यासासाठी समिती : साखर दरातील चढ-उतारावर उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:11 IST

कोल्हापूर : बाजारातील साखरेचे दर अनिश्चित, मात्र शेतकऱ्यांना देय असणारी एफआरपी मात्र चौदा दिवसांत कायद्याने देणे बंधनकारक, अशा ...

कोल्हापूर : बाजारातील साखरेचे दर अनिश्चित, मात्र शेतकऱ्यांना देय असणारी एफआरपी मात्र चौदा दिवसांत कायद्याने देणे बंधनकारक, अशा कोंडीत सापडलेल्या देशभरातील साखर उद्योगाला या आर्थिक अस्थिरतेतून बाहेर काढण्यासाठी कायमस्वरुपी ऊसदर स्थिरता निधी उभा करता येईल का, असा विचार केंद्र शासनाच्या पातळीवर गांभीर्याने सुरू झाला आहे. त्यासाठी या उद्योगाशी संबंधित पाच प्रमुख मंत्र्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली असून, तिची बैठकही झाली आहे.

सी रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार साखर व उपपदार्थांपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून ७० टक्के शेतकऱ्याला व ३० टक्के कारखान्यांस असे सूत्र निश्चित झाले. परंतु मागील तीन-चार हंगामात साखरेचे दरच कमी राहिल्याने ७० टक्के रकमेतून एफआरपीही भागू शकली नाही. म्हणून ती देण्यासाठी केंद्र शासनाला कारखान्यांना कर्जे देण्याची पाळी आली. हे टाळण्यासाठी स्थिरता निधी व एफआरपी टप्प्याटप्याने देता येईल का, असाही विचार सुरू झाला आहे.

बाजारातील साखरेचा दर हा महागाई निर्देशांकाशी जोडलेला असल्याने साखर वाढली की निर्देशांक उसळी घेतो व त्यातून मध्यमवर्गीयांची नाराजी वाढते, म्हणून साखरेचा दर केंद्र सरकार वाढू देत नाही. त्याचा फटका देशभरातील साखर उद्योगाला बसतो. साखरेला चांगला दर मिळाल्याशिवाय उसाची एफआरपी देता येत नाही. अशा स्थितीतून मार्ग म्हणून केंद्र शासनाने साखरेचा कारखान्यांकडील खरेदी दर ३१ रुपये केला; परंतु तरीही त्यातून प्रश्र्न सुटलेला नाही. हा दर किमान ३८ रुपये करावा, अशी मागणी आहे परंतु केंद्राची त्यास तयारी नाही. मग सध्या मिळत असलेल्या दरातून कारखान्यांना उसाची एकरकमी एफआरपी देणे शक्य नाही. त्यामुळे जेव्हा अशी स्थिती निर्माण होईल, तेव्हा एफआरपी देण्यासाठी कमी पडत असलेली रक्कम या स्थिरता निधीतून देता यावी, असाहा विचार आहे.

निधी कसा उभा करणार..

हा निधी कसा उभा करणार, यासंबंधी केंद्र शासनाने अजून काही विचार केलेला नाही. पूर्वी जीएसटीच्या अगोदर प्रतिक्विंटल ८५ रुपये अबकारी कर घेतला जात होता. त्यातील २४ रुपये साखर विकास निधीत व उर्वरित ६१ रुपये केंद्र शासनाला करापोटी मिळत होते. आता ५ टक्के जीएसटी लागू झाल्यापासून ही वसुली बंद झाली. याशिवाय आणखी ५ टक्के अधिभार लावून त्यातून जमा होणाऱ्या रकमेतून हा निधी उभा करता येऊ शकतो.

समितीत कोण..

स्थिरता निधीबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र शासनाने स्थापन केलेल्या समितीत कृषी, अन्न व प्रक्रिया उद्योग, वाणिज्य, वित्त आणि पेट्रोलियम मंत्री यांचा समावेश आहे. त्याशिवाय नीती आयोगाचा व प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी असतील.

उताऱ्यानुसार दर

दूध उद्योगात शेतकऱ्यांना दुधाच्या फॅटप्रमाणे बिल दिले जाते. तशा पध्दतीने उसाची एफआरपीही संबंधित शेतकऱ्याने कारखान्यास पुरविलेल्या उसाचा उतारा पाहून त्यानुसार देता येईल का, असाही विचार सुरू झाला आहे. परंतु त्यात अडचणीच जास्त दिसतात. आता हंगामाची सरासरी काढून त्यानुसार उतारा निश्चित केला जातो. सुरुवातीचे दोन महिने उतारा कमी असतो व शेवटच्या महिन्यात तो वाढतो.

साखर विकास निधी

यापूर्वी केंद्र शासनाच्या साखर विकास निधीतून मुख्यत: ऊस विकास योजना, विस्तारीकरण, आधुनिकीकरण, डिस्टिलरी प्रकल्प यासाठी कारखान्यांना भरीव मदत मिळत असे. अलिकडील काही वर्षांत निर्यात अनुदानही याच निधीतून दिले गेले. याच धर्तीवर नवा ऊसदर स्थिरता निधी असू शकेल.