शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार दलितविरोधी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : केंद्रातील सरकार हे दलित अथवा मुस्लिमाविरोधी नसून ते त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहे. देशाचा विकास करायचा असेल तर गावचा विकास होणे गरजेचे आहे़. मोदी सरकारकडून देशाचा विकास करण्यासाठी स्वच्छ व पारदर्शी कारभार सुरू आहे. येणाºया निवडणुकीत स्वाभिमानी व शिवसेनेने आमच्यासोबत राहावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक व ...

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : केंद्रातील सरकार हे दलित अथवा मुस्लिमाविरोधी नसून ते त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहे. देशाचा विकास करायचा असेल तर गावचा विकास होणे गरजेचे आहे़. मोदी सरकारकडून देशाचा विकास करण्यासाठी स्वच्छ व पारदर्शी कारभार सुरू आहे. येणाºया निवडणुकीत स्वाभिमानी व शिवसेनेने आमच्यासोबत राहावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.हेरवाड (ता. शिरोळ) येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री आठवले बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रकाश आवाडे होते़ हेरवाड येथील महिला शौचालय बांधकामाकरिता पंधरा लाखांचा निधी जाहीर करून मंत्री आठवले पुढे म्हणाले, ग्रामपंचायतीने शासकीय योजना आपल्या गावात आणल्या पाहिजेत़ शासनाकडून घेतलेली कर्जे त्याच कामासाठी खर्च करून ते पैसे प्रामाणिकपणे परतफेड करा. केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडे २० लाखांपासून १५ कोटी रुपयेपर्यंतच्या योजना कार्यान्वित आहेत़ त्याचा लाभ सामान्यांनी घ्यावा़ सध्या देशामध्ये भाजप, सेना, आऱ पी़ आय़, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या युतीचे सरकार आहे़ २०१९ मध्ये होणाºया सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी आमच्यासोबत राहावे.प्रकाश आवाडे म्हणाले, अतुल चौगुले यांचे कार्य चांगले आहे़ ४ कोटी रुपयांची पेयजल योजना पूर्ण करून त्यांनी ग्रामस्थांना शुध्द पाणी देण्याचे समाधानकारक काम केले आहे.़ स्वागत अतुल चौगुले यांनी केले़यावेळी जि. प़ सदस्य बंडा माने, डॉ़ अशोकराव माने, विजय भोजे, राहुल आवाडे, राजवर्धन नाईक निंबाळकर, शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, डॉ़ संजय पाटील, मिनाज जमादार, सरपंच कल्पना मस्के, संगीता पाटील, राबिया विजापुरे, आर. बी. पाटील, मंगलराव माळगे, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, विवेक कांबळे, दीपक भोसले, संजय शिंदे, जयपाल कांबळे यांच्यासह आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते. जीवन कांबळे यांनी आभार मानले़मराठा आरक्षणासाठी कायदा करावामराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आऱ पी़ आय़ ची सर्वप्रथम मागणी आहे. याकरिता मराठ्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे़ मागील शासनाने १६ टक्के आरक्षण देऊ केलेले आहे़ त्यांना आमचा पाठिंबा आहे़ सध्या मुंबई उच्च न्यायालयात आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे़ मराठ्यांना आरक्षण मिळविण्याकरिता संसदेत कायदा करणे गरजेचे असल्याचे मंत्री आठवले यांनी विषद केले.