शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार दलितविरोधी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : केंद्रातील सरकार हे दलित अथवा मुस्लिमाविरोधी नसून ते त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहे. देशाचा विकास करायचा असेल तर गावचा विकास होणे गरजेचे आहे़. मोदी सरकारकडून देशाचा विकास करण्यासाठी स्वच्छ व पारदर्शी कारभार सुरू आहे. येणाºया निवडणुकीत स्वाभिमानी व शिवसेनेने आमच्यासोबत राहावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक व ...

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : केंद्रातील सरकार हे दलित अथवा मुस्लिमाविरोधी नसून ते त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहे. देशाचा विकास करायचा असेल तर गावचा विकास होणे गरजेचे आहे़. मोदी सरकारकडून देशाचा विकास करण्यासाठी स्वच्छ व पारदर्शी कारभार सुरू आहे. येणाºया निवडणुकीत स्वाभिमानी व शिवसेनेने आमच्यासोबत राहावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.हेरवाड (ता. शिरोळ) येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री आठवले बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रकाश आवाडे होते़ हेरवाड येथील महिला शौचालय बांधकामाकरिता पंधरा लाखांचा निधी जाहीर करून मंत्री आठवले पुढे म्हणाले, ग्रामपंचायतीने शासकीय योजना आपल्या गावात आणल्या पाहिजेत़ शासनाकडून घेतलेली कर्जे त्याच कामासाठी खर्च करून ते पैसे प्रामाणिकपणे परतफेड करा. केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडे २० लाखांपासून १५ कोटी रुपयेपर्यंतच्या योजना कार्यान्वित आहेत़ त्याचा लाभ सामान्यांनी घ्यावा़ सध्या देशामध्ये भाजप, सेना, आऱ पी़ आय़, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या युतीचे सरकार आहे़ २०१९ मध्ये होणाºया सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी आमच्यासोबत राहावे.प्रकाश आवाडे म्हणाले, अतुल चौगुले यांचे कार्य चांगले आहे़ ४ कोटी रुपयांची पेयजल योजना पूर्ण करून त्यांनी ग्रामस्थांना शुध्द पाणी देण्याचे समाधानकारक काम केले आहे.़ स्वागत अतुल चौगुले यांनी केले़यावेळी जि. प़ सदस्य बंडा माने, डॉ़ अशोकराव माने, विजय भोजे, राहुल आवाडे, राजवर्धन नाईक निंबाळकर, शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, डॉ़ संजय पाटील, मिनाज जमादार, सरपंच कल्पना मस्के, संगीता पाटील, राबिया विजापुरे, आर. बी. पाटील, मंगलराव माळगे, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, विवेक कांबळे, दीपक भोसले, संजय शिंदे, जयपाल कांबळे यांच्यासह आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते. जीवन कांबळे यांनी आभार मानले़मराठा आरक्षणासाठी कायदा करावामराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आऱ पी़ आय़ ची सर्वप्रथम मागणी आहे. याकरिता मराठ्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे़ मागील शासनाने १६ टक्के आरक्षण देऊ केलेले आहे़ त्यांना आमचा पाठिंबा आहे़ सध्या मुंबई उच्च न्यायालयात आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे़ मराठ्यांना आरक्षण मिळविण्याकरिता संसदेत कायदा करणे गरजेचे असल्याचे मंत्री आठवले यांनी विषद केले.