शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

केंद्र ‘एफआरपी’चे तुकडे करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उसाची एफआरपी तीन टप्प्यांत द्यावी, अशी शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे केली असली तरी केंद्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : उसाची एफआरपी तीन टप्प्यांत द्यावी, अशी शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे केली असली तरी केंद्र सरकार एफआरपीचे तुकडे करु देणार नाही. याबाबत आपण केंद्र सरकारशी चर्चा करुन आल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. सोलापुरात ५ ऑक्टोबरला ‘जागर एफआरपीचा एल्गार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा’ हा पहिला मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

खोत म्हणाले, एकरकमी एफआरपी देण्यात अडचणी असल्याने तीन टप्प्यांत देण्यास परवानगी द्यावी, या साखर कारखानदारांच्या मागणीनुसार निती आयोगाने केंद्राकडे शिफारस केली होती. केंद्र सरकारने याबाबत राज्यांकडून मते मागवली होती. यावर तीन टप्प्यांत एफआरपी देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केली होती. एरव्ही गळा काढणारे ‘स्वाभिमानी’चे नेत्यांची आता बोलती का बंद झाली. उसाच्या भावासाठी इंदापूरला तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या दारात जाऊन आंदोलन केले, मग एफआरपीच्या तुकड्याची शिफारस करणाऱ्या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या दारात बसणार का? देवेंद्र फडणवीस सरकारने कर्जमाफी केली नाही म्हणून सरकारमधून बाहेर पडला, मग हिंमत असेल तर एफआरपीच्या मुद्यावरून आघाडी सरकारमधून बाहेर पडा, असे उघड आव्हानच माजी खासदार राजू शेट्टी यांना दिले. साखरेच्या किमान दरातील वाढीबाबत पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्र्यांना भेटणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

अजित पवार यांचे अभिनंदन

सैन्यभरतीबाबत आंदोलन केले, त्यानंतर तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १ डिसेंबरला होणाऱ्या भरतीसाठी आतापासून तयारी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. मात्र मंत्र्यांनी घेतलेले सगळेच निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मान्य करतात, असे नाही, असा टोलाही खोत यांनी लगावला.