शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

पत्रकारांच्या दिशेवरच केंद्राची सत्ता ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:19 IST

कोल्हापूर : आम्ही तीन राज्यांत हरलो म्हणून काय झाले, आमची मते जास्त आहेत, घाबरू नको, असे अंबाबाईच मला दृष्टांत ...

कोल्हापूर : आम्ही तीन राज्यांत हरलो म्हणून काय झाले, आमची मते जास्त आहेत, घाबरू नको, असे अंबाबाईच मला दृष्टांत देऊन सांगते. आम्ही काम करतोय; पण सद्य:स्थितीत पत्रकार कोणत्या दिशेने वातावरण नेतात, त्यावरच केंद्रात आमची सत्ता पुन्हा येणार, की नाही ते ठरणार आहे, अशी कबुली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. राज्यातही सरकार असेल, मी मंत्री असेन याचीही आता शाश्वती राहिली नाही, तरीही पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यास मी कटिबद्ध असेन, अशी ग्वाहीही पाटील यांनी दिली.पत्रकार दिनाचे औचित्य साधून रविवारी सायंकाळी कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या. ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार भारतकुमार राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अर्जुन टाकळकर, संदीप राजगोळकर, विजय केसरकर, अभिजित पाटील यांचा पुरस्काराने गौरव झाला. संपर्क अ‍ॅडव्हायजर्सचे सुधीर शिरोडकर व मोहन कुलकर्णी यांच्यासह महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक विजय जाधव, प्रा. शिवाजी जाधव, विजय टिपुगडे, मिलिंद यादव यांचा विशेष सन्मान झाला.भारतकुमार राऊत म्हणाले, पत्रकारितेला फुटीरतेचा शापच आहे. तालुक्यापासून देशपातळीवर वेगवेगळ्या संघटनांमध्ये पत्रकार विभागला गेल्याने त्यांची ताकदही क्षीण झाली आहे. शक्तीच विभागली गेल्याने त्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी जटील बनत चालल्याची खंत वाटते.प्रास्ताविक प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष समीर मुजावर, सचिव बाळासाहेब पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.पत्रकारांना कल्पनेपलीकडचे घर मिळेलपत्रकारांच्या घरासाठी आपण कायमच आग्रही असून, कल्पनेच्या पलीकडचे घर त्यांना लवकरच मिळेल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. साडेआठ लाखांतील घरासाठी केंद्र व राज्य सरकारकडून पाच लाखांचे अनुदान मिळवून देत, अवघ्या चार लाखांतील घर पत्रकारांसाठी उपलब्ध करून देणारी योजना तयार करण्यात आली आहे. ‘म्हाडा’च्या निम्म्या किमतीत अशी २00 घरे बांधणार असून, त्यापैकी ५0 घरे ही सैनिकासह नामवंत पत्रकारांसाठी राखीव ठेवली जाणार आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.