शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

पाणी धोरणासाठी केंद्र, राज्याकडे पाठपुरावा : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 20:42 IST

तासगाव/कवठेएकंद : धरणातील पाण्याला हजार, बाराशे रुपये आणि स्वत: तयार केलेल्या पाणी संस्थांच्या योजनांसाठी चार ते पाच हजार रुपये पाणीपट्टी अन्यायकारक आहे.

ठळक मुद्देकवठेएकंदला सिद्धराज पाणी संस्थेचा रौप्यमहोत्सव सिंचन योजनेच्या वीज बिल दरात सवलत दिली पाहिजे. कारखानदारी बंद पडल्यामुळे हजारो लोकांचे संसार अडचणीत येतात.

तासगाव/कवठेएकंद : धरणातील पाण्याला हजार, बाराशे रुपये आणि स्वत: तयार केलेल्या पाणी संस्थांच्या योजनांसाठी चार ते पाच हजार रुपये पाणीपट्टी अन्यायकारक आहे. पाणी मिळविण्याचे धोरण निश्चित करायला हवे. सिंचन योजनेच्या वीज बिल दरात सवलत दिली पाहिजे. स्व:कर्तृत्वावर उभारलेल्या पाणी योजनांची पाणीपट्टी शासनाच्या पाणी योजनेप्रमाणे आकारली येईल, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे एकत्रित मागणी करू, अशी ग्वाही माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी दिली.

कवठेएकंद (ता. तासगाव) येथे सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा योजनेच्या रौप्यमहोत्सवी समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आ. पतंगराव कदम अध्यक्षस्थानी होते. यावेळी खा. संजयकाका पाटील, आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील, आ. मोहनराव कदम, आ. धैर्यशील पाटील, माजी आमदार संपतराव पवार-पाटील,अरुण लाड प्रमुख उपस्थित होते.

पवार म्हणाले की, तासगावची सर्कस, तास गणेश द्राक्षे, स्वातंत्र्य लढ्यातील संघर्ष यात येथील लोकांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे. येथील माणूस लाचारीने हात न पसरता हिमतीने लढणारा आहे. दुष्काळी भाग, पाणीटंचाई अशा परिस्थितीतही कवठेएकंदच्या शेतकºयांनी एक वचनाने शेतीची पाणी योजना उभी केली. आता दुष्काळी परिस्थिती, शेतीसमोरील अडचणी यासाठी सगळेजण बसून काम करू. यासाठी खासदार संजयकाकांचीही साथ मिळेल. डोक्यावर कर्जाचा बोजा घेऊन ही पाणी योजना गेली पंचवीस वर्षे चांगली चालवली आहे. एकीकडे आम्ही शासनाने बांधलेल्या धरणातील पाणी हजार ते बाराशे रुपये पाणीपट्टी भरून वापरतो, तर दुसरीकडे स्वत: कर्ज काढून उभ्या केलेल्या पाणी संस्थेतून चार-पाच हजाराची पाणीपट्टी भरून पाणी मिळते. हे बदलायला हवे. वीज दरवाढ व पाणीपट्टी यासाठी सवलत दिली पाहिजे. बागायती शेतीतून शेतकरी संपन्न होण्यासाठी पाणी योजनांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यायला हवे. त्यासाठी जयंत पाटील, पतंगराव कदम आम्ही मिळून केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, खासदार संजयकाकाही त्यासाठी साथ देतील.आ. पतंगराव कदम म्हणाले की, पाणी योजना उभारणीच्या काळात आर. आर. पाटील यांनी सहकार्य केले. अडचणीच्या काळात भू-विकास बँकेच्या कर्जासाठी एकरकमी परतफेड योजना राबवून कर्जात व व्याजात मोठ्या सवलती दिल्या. धाडसी शेतकºयांनी योजना चांगल्याप्रकारे चालवली आहे. योजना उभारणीत एन. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. आपल्या खात्यात आपणच मुख्यमंत्री, अशा पध्दतीने त्यांनी जनतेची कामे केली. आज ‘पैसे मिळवा, इलेक्शन जिंका’ असे काम चालू आहे, पण हे तात्पुरते सुख आहे. सगळ्यांची कामे करा. सत्ता लोकांसाठी वापरा. महाराष्टÑातील शेती धोरणामध्ये पवार यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी आता आघाडीचे नेतृत्व करावे.ज्येष्ठ शेतकरी सुरेंद्र सकळे व जयसिंगराव पाटील यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. रामचंद्र थोरात यांनी स्वागत केले. प्रा. बाबूराव लगारे यांनी प्रास्ताविकात, योजना उभारणीसाठी ज्या पिढीने योगदान दिले, अडचणीच्या काळात योजना चालविली, अशी मंडळी वृध्दापकाळाकडे जात आहेत. नव्या पिढीला योगदानाची जाणीव व्हावी, यासाठी रौप्यमहोत्सवाचे आयोजन केले असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य डी. के. पाटील, पंचायत समिती सभापती माया एडके, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अविनाश पाटील, डॉ. बाबूराव गुरव, सरपंच राजश्री पावसे, उपसरपंच विजयमाला लंगडे, पंचायत समितीच्या सदस्या बेबीताई माळी उपस्थित होते. सूर्यकांत पाटील यांनी आभार मानले.कृतज्ञता सत्काराने गौरवपाणी योजनेचे संस्थापक डॉ. नरेंद्र खाडे व शंकरराव माळी यांचा सपत्नीक सत्कार करून रौप्यमहोत्सवानिमित्त चांदीचा जलकुंभ देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्यासह संचालक मंडळ व सेवकांचाही सत्कार करण्यात आला. योजना उभारणीच्या काळात योगदान देणाºया सभासद, शेतकºयांचा कृतज्ञता सत्कार स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.साखर कारखानदारी आॅक्सिजनवर : शरद पवारराज्यातील सहकार चळवळीला यशवंतराव चव्हाणांनी दिशा दिली. मात्र आज या गोष्टीची फार काळजी वाटते. आज काही ठराविक साखर कारखाने सोडले, तर बाकीचे कारखाने आॅक्सिजनवर आहेत. हे चित्र चांगले नसल्याची खंत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली. तासगाव कारखाना बंद पडला. सांगलीसारखा मोठा कारखाना आर्थिक अडचणीत आला. कारखानदारी बंद पडल्यामुळे हजारो लोकांचे संसार अडचणीत येतात. शेतकºयांंचे नुकसान होते. त्याची काळजी घेतली पाहिजे, असे भावूक मत यावेळी पवारांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :Politicsराजकारणwater transportजलवाहतूक