शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
4
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
5
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
6
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
7
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
8
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
9
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
10
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
11
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
12
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
13
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
14
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
15
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
16
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
17
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

टंचाईतील प्रस्ताव उलट तपासणीच्या ‘कचाट्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 00:12 IST

प्रांताधिकाऱ्यांवर जबाबदारी : फायलींचा उलटा प्रवास सुरू; उपाययोजना लालफितीत

भीगमोंडा देसाई --- कोल्हापूर --जिल्ह्याच्या पाणीटंचाई आराखड्यातील उपाययोजनांच्या प्रस्तावांची उलटतपासणी सुरू झाली आहे. उलट तपासणीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून प्रांताधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे प्रस्तावाच्या फायलींचा प्रवास जिल्हा पातळीवरून तालुका, गाव असा उलटा सुरू झाला आहे. परिणामी, आराखड्यातील उपाययोजनांचे प्रस्ताव लालफितीतच ‘घिरट्या’ घालत असल्याने प्रत्यक्ष कामांना गती आलेली नाही. यामुळे टंचाईग्रस्त लोक तहानलेलेच राहिले आहेत. दरवर्षी आॅक्टोबर ते जानेवारी आणि जानेवारी ते जून अशा दोन टप्प्यांत टंचाई आराखडा तयार केला जातो. संभाव्य पाणीटंचाई गृहीत धरून पहिल्यांदा ग्रामपंचायतीकडून आराखडा तयार करून प्रत्येक पंचायत समितीकडे पाठविला जातो. तालुक्याचा आराखडा संबंधित आमदारांच्या सहीने जिल्हा परिषदेकडे येतो. जिल्हा परिषद अहवाल एकत्र करून संपूर्ण जिल्ह्याचा आराखडा तयार करते. त्यानुसार यंदाही आॅक्टोबर ते जूनपर्यंतचा २१९ गावे, ४०२ वाड्या-वस्त्यांसाठी ६२१ उपाययोजना करण्याचे नियोजन असलेला सुमारे ५ कोटी ४४ लाख ५१ हजार रुपयांचा आराखडा दोन महिन्यांपूर्वीच तयार केला आहे. गाव, तालुका पातळीवरून आलेल्या टंचाई आराखड्यातील उपाययोजनांवर महसूल प्रशासनाने अविश्वास दाखविला आहे. टंचाई नसतानाही काही कामे घुसडली जातात, असे प्र्रकार शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार प्रांताधिकाऱ्यांतर्फे उलट तपासणी केली जात आहे. टंचाई निर्माण झाल्यानंतर संबंधित गावास प्रांताधिकारी भेट देणार असून, त्यांना टंचाईची जाणीव झाल्यानंतर नव्याने प्रस्ताव तयार केला जाणार आहे. अशाप्रकारे तयार केलेला प्रस्ताव प्रांताधिकारी थेट जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणे शक्य आहे. मात्र, असे न करता प्रांताधिकारी पुन्हा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे प्रस्ताव पाठवत आहेत. पाणीपुरवठा प्रशासन तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवत आहे. प्रस्तावाच्या फायलींचा असा लांबचा प्रवास सध्या आहे. त्यामुळे अद्याप शासनाकडून टंचाई आराखड्यातील एकाही कामास दमडीचीही मदत मिळालेली नाही. प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही जूनअखेरपर्यंत संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार टंचाई घोषित करण्यासाठी प्रांताधिकारी यांच्याकडे प्रस्ताव जात आहेत. पडताळणी करून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येत आहेत.- एस. एस. शिंदे, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा)प्रांताधिकारी करणारटंचाई घोषित पूर्वी ग्रामपंचायत टंचाई घोषित करून उपाययोजनेचा प्रस्ताव तयार करत होती. आता टंचाई घोषित करण्याचे अधिकार प्रांतांना दिले आहेत. प्रांतांना वाटले तर टंचाई; अन्यथा गावाला टंचाई जाणवली नाही, असा याचा अप्रत्यक्षरीत्या अर्थ निघत आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त ग्रामस्थांना उपाययोजनांच्या निधीसाठी प्रांतांकडे चकरा मारायला लागणार आहेत. कागदावरील उपाययोजनाआराखड्यातील संभाव्य पाणीटंचाईची गावे तालुकानिहाय व कंसात उपाययोजना अशा - आजरा : २१ (३२), भुदरगड : २८ (८८), चंदगड : २४ (४३), गडहिंग्लज : ४४ (९२), गगनबावडा : ४ (०), हातकणंगले : १६(४३), करवीर : ९ (६), कागल : ४ (६०), पन्हाळा : ४३ (२७), राधानगरी : ९ (२७), शाहूवाडी : १२ (१९), शिरोळ : ५ (१५).