शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

‘पेयजल’ची सीबीआय चौकशी करा

By admin | Updated: May 28, 2015 00:58 IST

करवीर पंचायत समिती सभा : अर्जुन पाटील यांची मागणी

कसबा बावडा : गेल्या पाच वर्षांत तालुक्यात झालेल्या एकूण ‘पेयजल’ योजनेपैकी निम्म्यांहून अधिक योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. कामाच्या निकृष्ट दर्जामुळे या योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे या पेयजल योजनेच्या कामाची ‘सीबीआय’ चौकशी करावी, अशी मागणी करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत अर्जुन पाटील यांनी केली. अध्यक्षस्थानी सभापती पूनम महेश जाधव होत्या. पेयजल योजनेत निकृष्ट दर्जाचे बांधकाम, निकृष्ट पाईपलाईन टाकल्यामुळे अवघ्या दीड ते दोन वर्षांतच या योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. या योजनेची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही अर्जुन पाटील यांनी केली. या कामाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी दिले. सचिन पाटील यांनी शाळेत बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप केला. या कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. राजेंद्र सूर्यवंशी यांनी सध्या ग्रामपंचायतीचा घरफाळा वसुली बंद आहे. ती क्षेत्रफळावर आधारित सुरू करावी, अशी मागणी केली. पाचगावमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाचगावचा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी स्मिता गवळी यांनी केली. दिलीप टिपुगडे यांनी करवीर पंचायतमध्ये आदी खर्च आणि नंतर मंजुरी, असा कारभार चालत असल्याचा आरोप केला. एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्या आदीच पैसे खर्च टाकण्याचा आरोप केला. मात्र, गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी तो फेटाळून लावला. तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून ४०० ते ४५० कृषीपंप जोडण्या प्रलंबित आहेत. वीज वितरणने या जोडण्या त्वरित जोडाव्यात, अशी मागणी राजेंद्र सूर्यवंशी व उपसभापती दत्तात्रय मुळीक यांनी केली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तालुक्यातील रस्त्यांचे डांबरीकरण व खड्डे मुजविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी जयसिंग काशीद व सरदार मिसाळ यांनी केली. भूजगोंडा पाटील यांनी आभार मानले. सभापती पूनम जाधव, उपसभापती दत्तात्रय मुळीक यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. सभेच्या प्रारंभी पाचगावच्या गायत्री दत्तात्रय सुर्वे हिची पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल व सतीश दत्तात्रय सुर्वे यांची पोलीस दलात नियुक्ती झाल्याबद्दल समितीच्यावतीने सत्कार झाला.