शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

काजूबियांची आवक मंदावली; प्रक्रिया उद्योजक धास्तावले

By admin | Updated: April 13, 2015 00:09 IST

काजू उद्योगाची समस्या : अवकाळीमुळे मुळातच काजूचे उत्पादन पन्नास टक्क्यांपेक्षा घटले

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -एप्रिल महिन्याचा पहिला पंधरवडा संपत आला तरी अद्याप बाजारपेठेत स्थानिक काजूबियांची आवक समाधानकारक न झाल्याने चंदगड-आजरा तालुक्यांतील काजू बी उत्पादक धास्तावले असून, अनेकांना कच्च्या मालाअभावी यावर्षी काजू उद्योग बंद ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.प्रतिवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे स्थानिक काजूबियांची आवक सुरू होते. दरम्यान, कोकणातीलही कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असतो. यावर्षी अवकाळी व लांबलेला पाऊस, हवामानातील स्थित्यंतरे यामुळे मुळातच काजूचे उत्पादन पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घटले आहे.चंदगड, आजरा तालुक्यांत काजूचे असणारे प्रचंड उत्पादन लक्षात घेऊन या दोन तालुक्यांसह गडहिंग्लज तालुक्यातही सुशिक्षित बेरोजगार युवकांनी लहान-मोठे काजू बी प्रक्रिया उद्योग उभारले आहेत. गेल्यावर्षी काजूगराच्या होलसेल विक्रीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे काजू प्रक्रिया उद्योग कसेबसे सावरले होते. अनेक उद्योजकांनी साठा केलेला कच्चा माल प्रक्रिया न करताच बाहेरील उद्योजकांना विक्री करण्यास प्राधान्य दिले होते.यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. कच्चा मालच बाजारात पुरेसा उपलब्ध नसल्याने बी प्रक्रिया युनिट चालविण्याचा धोका निर्माण झाला आहे. मोठे उद्योजक इंडोनेशिया, आफ्रिका, ब्राझील आदी ठिकाणांहून येणाऱ्या आयात काजूबिया खरेदीस प्राधान्य देताना दिसत आहेत; पण लहान उद्योजकांची मात्र फरफट होताना दिसत आहे. एकंदर काजू बी उत्पादनात झालेली घट प्रक्रिया उद्योजकांच्या दृष्टीने चिंताजनक आहे.शेकडो कुटुंबीयांचे संसार अडचणीतकाजूबागांची राखण करणे, काजूबिया गोळा करणे, वाहतूक करणे, खरेदी-विक्री करणे यासह काजूप्रक्रिया उद्योगावर शेकडो कुटुंबीयांचे संसार अवलंबून आहेत. काजू प्रक्रिया उद्योग बंद झाल्यास शेकडो कुटुंबीय अडचणीत येणार आहेत.उद्योजकांनी घाबरू नये : पोवारकाजूबियांचे उत्पादन कमी झाले म्हणून स्थानिक तरुण उद्योजकांनी घाबरू नये. आयात काजूबिया मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यावर्षी स्थानिक व आयात मालाची सांगड घालूनच प्रक्रिया उद्योग चालू ठेवावेत, असे आवाहन ज्येष्ठ काजू बी प्रक्रिया उद्योजक महादेव पोवार यांनी केले आहे.उद्योजकांनी घाबरू नये : पोवारकाजूबियांचे उत्पादन कमी झाले म्हणून स्थानिक तरुण उद्योजकांनी घाबरू नये. आयात काजूबिया मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यावर्षी स्थानिक व आयात मालाची सांगड घालूनच प्रक्रिया उद्योग चालू ठेवावेत, असे आवाहन ज्येष्ठ काजू बी प्रक्रिया उद्योजक महादेव पोवार यांनी केले आहे.