शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

आपत्कालिन स्थितीत प्रशासनाचे वळीवडेकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गांधीनगर : आपत्कालिन स्थितीत प्रशासन वळीवडेकडे का दुर्लक्ष करते, असा संतप्त प्रश्न सरपंच अनिल पंढरे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गांधीनगर : आपत्कालिन स्थितीत प्रशासन वळीवडेकडे का दुर्लक्ष करते, असा संतप्त प्रश्न सरपंच अनिल पंढरे यांनी करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांना केला. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा त्यांनी अन्य पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमोर पाढाच वाचला.

पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे वळीवडे, गांधीनगर, वसगडे, उचगाव या गावांतील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार शीतल मुळे-भामरे या करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांच्यासमवेत आल्या होत्या. त्यावेळी ग्रामस्थांनी भामरे-मुळे यांना धारेवर धरले. पंढरे म्हणाले की, आपत्कालिन स्थितीत नेहमीच प्रशासनाने वळीवडेला दुर्लक्षित केले आहे. वारंवार संपर्क साधूनही आपला संपर्क होत नव्हता. आपल्याला संदेश पाठवले; मात्र ते अद्यापही पाहिले गेले नाहीत. पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यासाठी आम्हाला बोट हवी होती. अखेर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व शेजारील गावांच्या सहकार्याने पूरग्रस्तांची व्यवस्था आम्ही केली, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या उदासिनतेबद्दल खंत व्यक्त केली. यावर गटविकास अधिकारी उगले यांनी स्थानिक पातळीवर मंडल अधिकारी, तलाठी असल्याचे सांगताच सरपंच पंढरे व पोलीस पाटील दीपक पासान्ना यांनी ते नेहमी वरिष्ठांकडे बोट दाखवतात. मग गावपातळीवर आम्ही करायचे तरी काय? असा प्रश्न विचारला. दरम्यान, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी गावातील पूरपरिस्थितीची पाहणी करत पूरग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांचा रोष कमी झाला.

फोटो ओळ:-

वळीवडे (ता. करवीर) येथील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांना पूरस्थितीमध्ये प्रशासनाने दुर्लक्ष का केले, असा प्रश्न सरपंच अनिल पंढरे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थांनी विचारला.