शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालिन स्थितीत प्रशासनाचे वळीवडेकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गांधीनगर : आपत्कालिन स्थितीत प्रशासन वळीवडेकडे का दुर्लक्ष करते, असा संतप्त प्रश्न सरपंच अनिल पंढरे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गांधीनगर : आपत्कालिन स्थितीत प्रशासन वळीवडेकडे का दुर्लक्ष करते, असा संतप्त प्रश्न सरपंच अनिल पंढरे यांनी करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांना केला. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा त्यांनी अन्य पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमोर पाढाच वाचला.

पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे वळीवडे, गांधीनगर, वसगडे, उचगाव या गावांतील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार शीतल मुळे-भामरे या करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांच्यासमवेत आल्या होत्या. त्यावेळी ग्रामस्थांनी भामरे-मुळे यांना धारेवर धरले. पंढरे म्हणाले की, आपत्कालिन स्थितीत नेहमीच प्रशासनाने वळीवडेला दुर्लक्षित केले आहे. वारंवार संपर्क साधूनही आपला संपर्क होत नव्हता. आपल्याला संदेश पाठवले; मात्र ते अद्यापही पाहिले गेले नाहीत. पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यासाठी आम्हाला बोट हवी होती. अखेर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व शेजारील गावांच्या सहकार्याने पूरग्रस्तांची व्यवस्था आम्ही केली, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या उदासिनतेबद्दल खंत व्यक्त केली. यावर गटविकास अधिकारी उगले यांनी स्थानिक पातळीवर मंडल अधिकारी, तलाठी असल्याचे सांगताच सरपंच पंढरे व पोलीस पाटील दीपक पासान्ना यांनी ते नेहमी वरिष्ठांकडे बोट दाखवतात. मग गावपातळीवर आम्ही करायचे तरी काय? असा प्रश्न विचारला. दरम्यान, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी गावातील पूरपरिस्थितीची पाहणी करत पूरग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांचा रोष कमी झाला.

फोटो ओळ:-

वळीवडे (ता. करवीर) येथील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांना पूरस्थितीमध्ये प्रशासनाने दुर्लक्ष का केले, असा प्रश्न सरपंच अनिल पंढरे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थांनी विचारला.