शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

डोंगर आला वाहून; शेती गेली मुजून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:09 IST

सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : सह्याद्री डोंगरकडांच्या रांगेचा वारसा लाभलेला पन्हाळा गडाच्या पायथ्यालगत असणाऱ्या कडांचा भूभाग अतिवृष्टीमुळे खचून ...

सरदार चौगुले

पोर्ले तर्फ ठाणे : सह्याद्री डोंगरकडांच्या रांगेचा वारसा लाभलेला पन्हाळा गडाच्या पायथ्यालगत असणाऱ्या कडांचा भूभाग अतिवृष्टीमुळे खचून वर्षानुवर्ष होणारे भूस्खलनाचे प्रमाण वाड्यावस्त्यांसाठी चिंताजनक बनत आहे. मंगळवारपेठ, बांधेवाडी, गुरुवारपेठ, मराठेवाडी, जांभळेवाडी या गावात भूस्खलनाची मालिका गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुसळधार पावसामुळे पन्हाळ्याच्या पश्चिम भागातील धामणी खोऱ्यातील डोंगराळ भागात मानवी हस्तक्षेपामुळे जमिनीच्या झालेल्या सपाटीकरणामुळे हरपवडे, आंबर्डे, पणुत्रे आदींसह आठ गावांत भूस्खलनामुळे शेती धोक्यात आली आहे. भूस्खलनामुळे डोंगरातील माती, शेकडो हेक्टर शेती वाहून गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या बुधवारपेठ, मंगळवारपेठ, नेबापूर, गुरुवारपेठ, आपटी, तुरूकवाडी, बांदेवाडी, वेखंडवाडी, मराठवाडी, म्हाळुंगे, खळेखोडवाडी आदी गावांना २००५ पासूनच्या अतिवृष्टीमुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. तांबड्या रंगाच्या मातीचा वाढता ढिसाळपणा आणि बेसुमारपणे झालेली वृक्षतोड याला कारणीभूत आहे. मराठवाडी येथे २००५ ला भूस्खलन झाले. त्यापासून आजूबाजूच्या परिसरात भूस्खलनाची मालिका सुरू झाली आहे. त्यानंतर प्रशासनाने भूस्खलनाचा धोका ओळखून सुरक्षेच्या दृष्टीने गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांना स्थलांतरित होण्यासाठी वारंवार सूचना केल्या; पण ग्रामस्थ गावे सोडून जाण्यास इच्छुक नाहीत.

पन्हाळा गडावरून पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य रितीने होत नसल्याने पाणी कडाच्या बाजून वाहत जाते.भूभागात पडलेल्या भेगांमधून पाणी शिरल्याने कडा कोळसळ्याचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत आहे.भूस्खलन होणाऱ्या गावातील लोकांना प्रशासनाने स्थलांतरीत होण्याचा प्रस्ताव देऊनही तेथील ग्रामस्थ स्थलांतरीतबाबत नकारात्मक आहे.त्यामुळे या गावांचे स्थलांतर प्रशासनासाठी कसोटीचे बनले आहे.वर्षानुवर्षे भूस्खलनाचे वाढते प्रमाण भूस्खलन प्रणव भागासाठी धोक्याचे असल्याने वेळेत या गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन झाले नाही तर भविष्यात मोठी हानी होऊ शकते.यंदा मंगळवारपेठेतील झालेल्या भूस्खलन अनुभव भयानवह आहे.

............

जमीनीचे सपाटीकरण भोवले

पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या धामणी खोऱ्याच्यी डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे.डोंगरातील झाडे तोडून नाले ओढे मुजवून त्या जमीनीचे सपाटीकरण केल्या भागातील माती वाहून आली आहे.अतिवृष्टीमुळे गोठे, तांदुळवाडी, आकुर्डे, पणूत्रे, आंबर्डे, हरपवडे, निवाचीवाडी, पणोरे गावांच्या वरील बाजूस असणाऱ्या डोंगराचे भूस्खलन झाले आहे.यामुळे डोंगर भागात असलेली अनेकांची शेतीसह झाडे दगड गोठे जमिनीत गाढले गेली.डोंगरावरील माती गावातील अनेकांच्या शेकडो हेक्टर शेत जमिनीत शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.

..........

पाईटर

१ यावर्षी बुधवारपेठ ते पन्हाळा दरम्यानचा म्हणजे मंगळवारपेठेच्या वरचा भागाचे भूस्खलन होऊन मुख्य रस्ता घसरून वाहतुक ठप्प झाली आहे.

२ बुधवारपेठेच्या वरचा म्हणजे पावनगडाची तटबंदी यावर्षी घसरून खाली आली आहे.

३ आपटी ते म्हाळूंगे दरम्यानच्या रस्त्यावर डोंगराचा भाग घसरून आला आहे.तर २०१९ च्या अतिवृष्टीतही या ठिकाणी भूस्खलन झाले होते.

४ मसाई पठार येथील दळवेवाडी ते कणेरीपैकी धनगरवाडा या दरम्यानच्या असणाऱ्या डोंगराला ठिकठिकाणी भूस्खलन झाल्याने डोंगरावरील माती घसरत आहे.या ठिकाणच्या रस्त्याला भेंगा पडून रस्ता उधसला आहे.त्यामुळेच भागात भविष्यात भूस्खलनाचा धोका वाढू शकतो.

०१ निवाचीवाडी

निवाचीवाडी (ता.पन्हाळा) येथील डोंगरीतील अतिवृष्टीमुळे भूस्खलनामुळे वाहून आलेली माती शेती पिकात पसरल्याने नुकसान झाले आहे.