शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जागा विक्रीचा परवाना रद्द

By admin | Updated: June 17, 2015 01:05 IST

वसंतदादा कारखाना : साखर आयुक्तांचा निर्णय; ऊस उत्पादकांची चिंता वाढली

सांगली : कोट्यवधी रुपयांची देणी भागविण्यासाठी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची २१ एकर जागा विकण्यास राज्य शासनाने परवानगी दिली होती. परंतु, तीनवेळा मुदतवाढ देऊनही जागा विक्रीस प्रतिसाद मिळाला नाही. तसेच जागा विक्रीच्या विरोधात सभासद न्यायालयात गेल्यामुळे साखर आयुक्तांनी जागा विक्रीचा परवाना रद्द केला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांची चिंता वाढली आहे. जिल्हा बँकेचीही यामुळे आर्थिक कोंडी झाली आहे.आशिया खंडातील सर्वांत मोठा साखर कारखाना म्हणून कधी काळी नावलौकिक मिळविलेला वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला आहे. गत गळीत हंगामातील गाळप केलेल्या उसाची १८ कोटी आणि २०१३-१४ वर्षातील १६ कोटींची देणी दिली नाहीत. कामगारांच्या पगाराची आणि फंडाची २० कोटींहून अधिक थकबाकी आहे. कामगार, शेतकऱ्यांच्या देण्यांसोबतच जिल्हा बँकेचेही ७८ कोटींचे कर्ज कारखान्यावर आहे. बँका व शेतकऱ्यांची थकीत देणी देण्यासाठी संचालक मंडळाने कारखान्याची २१ एकर जागा विक्री करण्याचा निर्णय घेतला होता.कारखान्याच्या उत्तर बाजूला सांगली-माधवनगर रस्त्यालगतच २१ एकर जागा आहे. त्यामुळे या जागेला चांगली किंमत मिळून कारखान्याची देणी भागतील, असा तर्कही काढण्यात आला होता. जागा विक्रीच्या प्रस्तावास साखर आयुक्तांनी परवानगीही दिली होती. कारखान्याच्या २१ एकर जागेवरील १०३ प्लॉटच्या खरेदीसाठी १२३ निविदा दाखल झाल्या होत्या. मात्र, त्यातील १०९ निविदाधारकांनी नियमानुसार बयाणा रकमेचे डीडी (डिमांड ड्राफ्ट) देण्याऐवजी धनादेश दिल्याने नियमांचा भंग झाला होता. त्या निविदा अपात्र ठरविण्यात आल्या होत्या. या सर्व गोंधळामुळे जागा विक्रीची प्रक्रिया अडचणीची ठरली होती. वारंवार निविदा काढूनही जागा विक्रीस प्रतिसाद मिळाला नाही. कारखान्याच्या एका सभासदानेही जागा विक्रीस स्थगिती मिळविण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या दोन्ही गोष्टींचा आधार घेऊन साखर आयुक्तांनी वसंतदादा कारखान्याच्या २१ एकर जागा विक्रीस दिलेला परवाना रद्द केला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक, कामगार आणि जिल्हा बँकेच्या थकबाकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (प्रतिनिधी)कारखान्यावर मालमत्ता जप्तीची टांगती तलवारगत गळीत हंगामातील गाळप केलेल्या उसाची १८ कोटी आणि २०१३-१४ सालातील १६ कोटींची देणी अद्यापही दिलेली नाहीत. तसेच एफआरपीनुसारही अनेक शेतकऱ्यांना बिले मिळाली नाहीत. या प्रकरणी वसंतदादा कारखान्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेची जप्ती व लिलावाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. कारण, गेल्यावर्षी थकबाकी वसुलीसाठी महसूल विभागाने मालमत्ता जप्तीची तिसरी व अंतिम नोटीस बजाविली होती. परंतु, जागा विक्रीस शासनाने परवानगी दिल्यामुळे जप्तीची कारवाई थांबली होती. सध्या शासनाने जागा विक्रीचा परवानाच रद्द केल्यामुळे मालमत्ता जप्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.जागा विक्रीची समिती बरखास्तजागा विक्री करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीचे अध्यक्ष अवर निबंधक सह. संस्था तथा जिल्हा बँकेचे तत्कालीन प्रशासक शैलेश कोतमिरे होते. तसेच समितीत पुणे साखर आयुक्त (प्रशासन) संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक योगीराज सुर्वे यांचा समावेश होता. जिल्हा बँकेवरील प्रशासक हटविल्यामुळे समितीचे अध्यक्षपद रद्द झाले होते. जिल्हा बँकेनेही पूर्वीची समिती बरखास्त करून जागा विक्रीसाठी नव्याने समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जागा विक्रीची समितीही बरखास्त केली आहे.वसंतदादा कारखान्याच्या जागा विक्रीस शासनाने स्थगिती दिली असून, समितीही बरखास्त केली आहे. जिल्हा बँकेच्या नूतन संचालक मंडळाने प्रशासक हटविल्यामुळे जागा विक्रीसाठी नव्याने प्रक्रिया सुरू करण्याची शासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार शासनाने हा निर्णय घेतला असेल. परंतु, ऊस उत्पादकांचे पैसे देण्याच्यादृष्टीने यापूर्वीही प्रयत्न केले आहेत. यापुढेही शेतकरी, कामगारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न असेल. - विशाल पाटील, अध्यक्ष, वसंतदादा साखर कारखाना, सांगली.वसंतदादा कारखाना सभासदांनी उभा केला असून, त्याला जिल्हा बँकेचे प्रथमपासून अर्थसाहाय्य आहे. परंतु, राज्य शासनाने जमीन विक्रीस परवानगी देताना जिल्हा बँकेला ५० टक्केच रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता. यातून बँकेची थकीत रक्कम मिळणार नव्हती. म्हणूनच जमीन विक्रीच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.- शिवाजीराव पाटील,सभासद (याचिकाकर्ते)