शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ संचालकांचे पद रद्द करा

By admin | Updated: May 23, 2015 00:28 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक : राजू शेट्टी यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जयसिंगपूर : ज्या संचालकांवर वसुलीची जबाबदारी निश्चित झाली होती तेच संचालक जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत पुन्हा निवडून आले आहेत. बॅँकेतील ठेवींची संख्या कमी होत असून, बँक आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे, याची दखल घेऊन ज्या संचालकांवर वसुलीची जबाबदारी निश्चित ‘त्या’ संचालकांचे पद रद्द करावे, अशी मागणी खा. राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.जिल्हा बॅँक ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाते. सहकार विभागाने बॅँकेतील आर्थिक घोटाळ्यांमुळे सहकार अधिनियम ८८ खाली चौकशीनंतर यापूर्वीच्या संचालक मंडळावर वसुलीची जबाबदारी निश्चित करून बॅँकेवर प्रशासक नेमला होता. यापूर्वीच्या संचालक मंडळाने आपल्या निकटवर्तीयांना बेहिशेबी कर्जे देणे, मोक्याच्या जागा आर्थिक वाटाघाटी करून लिलावात काढणे, बॅँकेच्या फर्निचरमध्ये व इतर खरेदी-विक्रीमध्ये ढपला पाडणे, कागल शाखेतील २ कोटी शिलकीचा हिशेब न लागणे, २० गुंठे जमिनीवर ३२ लाख कर्ज देणे, अशा अनेक प्ररणातून जिल्हा बॅँक अडचणीत आली होती. बॅँकेच्या प्रशासकीय काळामध्ये बॅँकेमध्ये ठेवींचा ओघ वाढला होता. प्रशासकांनी बॅँक पूर्वपदावर आणली होती. परंतु नुकत्याच पंचवार्षिक निवडणुका झाल्या. निवडणूक जाहीर झाल्यावर एप्रिलमध्ये ठेवी २८८९ कोटी होत्या, आजअखेर या ठेवींचा आकडा ३८० कोटीने कमी झाला आहे. याचाच अर्थ ज्या संचालकांवर वसुलीची जबाबदारी निश्चित केली होती त्यांच्यावरील लोकांचा विश्वास कमी झाला आहे. (प्रतिनिधी)...तर बॅँकेला पुन्हा अडचणी येतीलतेच ते संचालक पुन्हा निवडून आल्याने त्यांच्यावरील विश्वास कमी झाला आहे. यामुळे बॅँकही आर्थिक अडचणीत येऊ शकते व आरबीआयच्या धोरणानुसार पुन्हा बॅँकेला अडचणी निर्माण होऊ शकतात. यासाठी जिल्हा बॅँकेमध्ये सहकार विभागाने ज्या संचालकांवर जबाबदारी निश्चित केली आहे व ते निवडून आले आहेत, त्या संचालकांना पदावरून कमी करण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष व खा. राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.