शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जाचक नियम, अटी रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:25 IST

जयसिंगपूर : जाचक नियम व अटी त्वरित रद्द करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री ...

जयसिंगपूर : जाचक नियम व अटी त्वरित रद्द करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. शहरी व ग्रामीण, असा भेदभाव करू नका; अन्यथा जनतेच्या मनात सरकारच्या विरोधात रोष निर्माण होईल, असा इशाराही यावेळी शेट्टी यांनी यावेळी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर होते.

यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले.

चालू वर्षीच्या अतिवृष्टी व महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतपिकाचे नुकसान, घरांची पडझड व व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून, सध्या या नुकसानीचे शासनाकडून पंचनामे सुरू आहेत. मात्र, या पंचनाम्यात अधिकारी अनेक निकष व जाचक अटी सांगून पंचनामे करू लागले आहेत. मुळातच यावर्षीच्या महापुराने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून, एका दिवसात पाणीपातळी वाढून गावामध्ये व शहरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना प्रापंचिक व दुकानांतून साहित्य बाहेर काढणे अशक्य झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाच्या सूचनेनुसार अनेक गावे स्थलांतरित झाली आहेत. ग्रामीण भागातील लोकांना स्थलांतरित होत असताना जनावरे, प्रापंचिक साहित्य, तसेच जीवनाश्यक वस्तू सोबत घेऊन वाहतूक करताना प्रति कुटुंबास १५ ते २० हजार रुपये खर्च करावा लागला आहे, तसेच आजही अनेक कुटुंबांतील मालमत्ता वडिलोपार्जित असून, त्याचे वाटणीपत्र न झाल्याने स्वतंत्र प्राॅपर्टी कार्ड निघत नाही. मात्र, अशी अनेक कुटुंबे आहेत की, जे वडिलार्जित मालमत्ता असून, विभक्त राहिले आहेत. यामुळे अशा कुटुंबांचे पंचनामे करून विभक्त रेशन कार्ड या नियमांवर त्यांना नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. शहरामधील अपार्टमेंटमध्ये पाणी आल्यास संपूर्ण अपार्टमेंटला पूरग्रस्त घोषित केले आहे. शहरातील लोकांचे शासनाच्या खर्चाने स्थलांतर केले आहे. शहरी व ग्रामीण, असा भेदभाव केल्यास ग्रामीण भागातील जनतेच्या मनात रोष निर्माण होईल. शेतीतील विद्युत मोटारी महापुरात वाहून गेल्या आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतजमिनी खचल्या आहेत. तुषार सिंचन, ठिबक सिंचन वाहून गेले आहेत. शेटनेट, ग्रीन हाउस, पॉलिहाउस नष्ट झाल्या आहेत. दोन वर्षे कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. त्यात महापुराने शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे. २०१९ च्या महापुरातील निकषानुसार पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे, तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतलेले नाही, त्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या नियमाच्या चौपट रक्कम आर्थिक मदत म्हणून देण्यात यावी.

कर्नाटक राज्यात कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या बाजूस कमानी पिलर उभे करण्यासंदर्भात कर्नाटक सरकारलाही योग्य सूचना करण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.