शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

बटालियनला दिलेली नंदवाळची जागा रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नंदवाळ (ता. करवीर) येथील गट क्रमांक ६३ मधील भारत बटालियनला दिलेल्या जागेचा आदेश ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : नंदवाळ (ता. करवीर) येथील गट क्रमांक ६३ मधील भारत बटालियनला दिलेल्या जागेचा आदेश रद्द करून प्रतिपंढरपूर असलेल्या ‘नंदापूर’च्या विकासासाठी ती द्यावी, अशी मागणी करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्याकडे केली. जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत, त्याचा विचार करून जागेचा आदेश रद्द करावा, अन्यथा उग्र आंदोलन उभे करू, असा इशाराही त्यांनी दिला.

नंदवाळ येथील ४६ हेक्टर जमीन भारत बटालियनला दिली आहे, याबाबत चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती, त्यानुसार संबंधित जागेचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागवला आहे. याबाबत ग्रामस्थांनी अप्पर जिल्हाधिकार पवार यांच्याकडे शुक्रवारी आपले म्हणणे सादर केले.

चंद्रदीप नरके म्हणाले, भारत बटालियनने हातकणंगलेसह इतर तालुक्यात जागा बघितल्या होत्या. मग नंदवाळ देवस्थान शेजारीलच जागा का देण्यात आली. आषाढी एकादशीला लाखो, तर दर एकादशीला हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. या जागेवर वाहनतळ, रिंगणसोहळा, भक्तनिवास, व्यापारी निवास, नगर उद्यान आदी गोष्टी करायच्या असताना ही जागा भारत बटालियनला देऊन काेणाला काय साध्य करायचे आहे.

करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या नंदापूरमध्ये कोणी चुकीच्या पध्दतीने काम करत असेल, तर खपवून घेणार नाही. प्रसंगी काम बंद पाडू, मात्र मागे हटणार नाही.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर म्हणाले, वारकरी संप्रदायाच्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे ही जागा ताब्यात घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. टोलप्रमाणे रस्त्यावरची लढाई करावी लागली, तरी बेहत्तर मात्र थांबणार नाही. भाजपचे तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील म्हणाले, वारकऱ्यांचा अवमान सहन करणार नाही. या जागेचा आदेश रद्द केला नाही, तर उग्र आंदोलन उभारू. यावेळी सरपंच अस्मिता कांबळे, उपसरपंच सागर गुरव, पोलीसपाटील विनायक उलपे, सचिन शिंदे, सागर पाटील, धनाजी उलपे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री वाकऱ्यांच्या भावनेचा आदर करतील

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे विठ्ठल भक्त असल्याने त्यांनी आपण पत्र दिल्यानंतर तातडीने अहवाल मागवला. त्यामुळे ते वारकऱ्यांच्या भावनेचा निश्चित आदर करतील. जिल्हाधिकाऱ्यांनीही ग्रामस्थांच्या भावनेचा आदर करून त्याप्रमाणे अहवाल सादर करावा, असे नरके यांनी सांगितले.