शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

रस्ते विकास प्रकल्पाचा करार रद्द करा

By admin | Updated: November 18, 2014 23:34 IST

कृती समितीची आयुक्तांकडे मागणी : ‘आयआरबी’ने केले अनेकवेळा कराराचे उल्लंघन

कोल्हापूर : रस्ते विकास प्रकल्पाचा करारच संतापजनक आहे. ‘आयआरबी’ने अनेकवेळा कराराचे उल्लंघन केले आहे. आता अपूर्ण कामे करणार नसल्याचे ‘आयआरबी’ने लेखी पत्राद्वारे महापालिकेला कळविले आहे. त्याआधारे ‘आयआरबी’ला नोटीस पाठवून आठ दिवसांत करारच रद्द करा, अशी मागणी अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आज, मंगळवारी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे केली. कायदेशीर बाबी तपासून योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन आयुक्तांनी शिष्टमंडळास दिले.कृती समितीने सोमवारी शहरातील फुलेवाडी, टेंबलाईवाडी, उचगांव, सरनोबतवाडी आदी सहा नाके जप्त करण्याची विनंती महापौरांकडे केली होती. त्याच मुद्द्याच्या आधारे कृती समितीने आज आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली. ‘कराराप्रमाणे काम झाले पाहिजे,’ हा करारातील पहिला निकष आहे. कराराप्रमाणे अनेक कामे अपूर्ण आहेत पैकी यातील जुना वाशी नाका ते रंकाळा टॉवर हा रस्ता आहे. हा रस्ता करण्यास आयआरबीने असमर्थता दर्शविली आहे. हा कराराचा भंगच आहे. याआधारे महापालिका, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ व आयआरबी यांच्यात झालेला त्रिपक्षीय करार रद्द करा. कराराचे भंग झाल्याने आयआरबीला कायदेशीररित्या टोलची वसुलीही करता येणार नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी निवास साळोखे, सतीशचंद्र कांबळे, बजरंग शेलार, रमेश मोरे, दिलीप देसाई, बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.कामावर लक्ष द्या...शहरातील रस्तेबांधणीचा रेंगाळलेला १०८ कोटींचा नगरोत्थान प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला आहे. रस्त्यांचे काम दर्जेदार झालेच पाहिजे. रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत त्या-त्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे. रस्त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यास हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांची फंड व ग्रॅच्युईटीची रक्कम जप्तीची कारवाई करावी, अशी मागणीही कृती समितीने आयुक्त ांकडे केली.आयआरबीचा त्रिपक्षीय करार रद्द करावा, या मागणीसाठी अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने मंगळवारी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना निवेदन देऊन चर्चा केली.