शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रस्ते विकास प्रकल्पाचा करार रद्द करा

By admin | Updated: November 18, 2014 23:34 IST

कृती समितीची आयुक्तांकडे मागणी : ‘आयआरबी’ने केले अनेकवेळा कराराचे उल्लंघन

कोल्हापूर : रस्ते विकास प्रकल्पाचा करारच संतापजनक आहे. ‘आयआरबी’ने अनेकवेळा कराराचे उल्लंघन केले आहे. आता अपूर्ण कामे करणार नसल्याचे ‘आयआरबी’ने लेखी पत्राद्वारे महापालिकेला कळविले आहे. त्याआधारे ‘आयआरबी’ला नोटीस पाठवून आठ दिवसांत करारच रद्द करा, अशी मागणी अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आज, मंगळवारी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे केली. कायदेशीर बाबी तपासून योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन आयुक्तांनी शिष्टमंडळास दिले.कृती समितीने सोमवारी शहरातील फुलेवाडी, टेंबलाईवाडी, उचगांव, सरनोबतवाडी आदी सहा नाके जप्त करण्याची विनंती महापौरांकडे केली होती. त्याच मुद्द्याच्या आधारे कृती समितीने आज आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली. ‘कराराप्रमाणे काम झाले पाहिजे,’ हा करारातील पहिला निकष आहे. कराराप्रमाणे अनेक कामे अपूर्ण आहेत पैकी यातील जुना वाशी नाका ते रंकाळा टॉवर हा रस्ता आहे. हा रस्ता करण्यास आयआरबीने असमर्थता दर्शविली आहे. हा कराराचा भंगच आहे. याआधारे महापालिका, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ व आयआरबी यांच्यात झालेला त्रिपक्षीय करार रद्द करा. कराराचे भंग झाल्याने आयआरबीला कायदेशीररित्या टोलची वसुलीही करता येणार नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी निवास साळोखे, सतीशचंद्र कांबळे, बजरंग शेलार, रमेश मोरे, दिलीप देसाई, बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.कामावर लक्ष द्या...शहरातील रस्तेबांधणीचा रेंगाळलेला १०८ कोटींचा नगरोत्थान प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला आहे. रस्त्यांचे काम दर्जेदार झालेच पाहिजे. रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत त्या-त्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे. रस्त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यास हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांची फंड व ग्रॅच्युईटीची रक्कम जप्तीची कारवाई करावी, अशी मागणीही कृती समितीने आयुक्त ांकडे केली.आयआरबीचा त्रिपक्षीय करार रद्द करावा, या मागणीसाठी अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने मंगळवारी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना निवेदन देऊन चर्चा केली.