शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कणेरी मठावर ६५ एकरांत साकारतेय शाहूनगरी

By admin | Updated: January 9, 2015 00:07 IST

भारतीय संस्कृती उत्सव : इतिहासाची मांडणी अन् भविष्याचा वेध;‘गावांचा विकास आणि स्वावलंबी परिवार’ हा उद्देश

कोल्हापूर : भारताच्या महानतेचे दर्शन येथील सांस्कृतिक परंपरांमधून प्रतिबिंबित होते. ही परंपरा ‘गावांचा विकास आणि स्वावलंबी परिवार’ या उद्देशातून, कणेरीमठामधील तब्बल ६५ एकर जागेत साकारत असलेल्या शाहूनगरीत उत्सवाच्या रूपाने मांडली जात आहे. अवकाश, निसर्गाचा अभ्यास मांडणाऱ्या ज्ञानी ऋषींपासून सुरू होत असलेल्या या उत्सवात विज्ञान, आरोग्य, पर्यावरण, स्त्री-शक्तीचा जागर आणि शेतीतील विविध प्रयोग, महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय या सगळ्या बलस्थानांचा इतिहास आणि भविष्याचा वेध घेतला जाणार आहे. देशाचे उज्ज्वल भवितव्य आणि गावांचा विकास या विधायक उद्देशातून देशातील स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या आणि ‘भारत विकास संगम’ नावाची संस्था आकाराला आली. कणेरीतील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेतून ‘भारतीय संस्कृती उत्सव’ आकाराला आला. शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि संस्कृती या पाच मूलभूत गोष्टींना आधारभूत धरून उत्सवाची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. उत्सवाला १२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी दानशूरांचे हात पुढे येताहेत. देणगीप्रमाणेच श्रमदानाची या उत्सवासाठी मोठी गरज असून, त्यात रोज किमान शंभर लोक योगदान देत आहेत. उत्सवाला अजून दहा-बारा दिवस शिल्लक असूनही येथील तयारी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. या उत्सवात देखावे, प्रदर्शनाबरोबरच विविध विषयांवर चर्चा, परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात विविध क्षेत्रांतील देशपातळीवरील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. देणगीपासून श्रमदानापर्यंत... कोल्हापूरच्या नावलौकिकात आणि पर्यटनवृद्धीसाठी चालना देणाऱ्या या उत्सवासाठी लहान मुलांनी जमा केलेल्या खाऊच्या पैशांपासून ते नगरसेवक, शासकीय कर्मचाऱ्यांचे मानधनही देणगी स्वरूपात मिळत आहे. ६५ एकरांच्या जागेत साकारण्यात येत असलेल्या या उत्सवासाठी शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, एनएसएसचे विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिक आपल्या परीने श्रमदान करीत आहेत. आजच मध्य प्रदेशमधून ४० आदिवासी कार्यक्रमस्थळी दाखल झाले. उत्सवकाळात दिवसाकाठी लाखभर लोक उपस्थित राहणार असून, त्यांच्या जेवणाच्या सोयीसाठी नागरिक धान्य, तेलाचे डबे, नारळ अशा रूपांत मदत करीत आहेत. आसपासच्या प्रत्येक गावांतून चपात्यांचे संकलन केले जाणार आहे. लखपती शेती... गो प्रदर्शन शेतीत उत्पन्न नाही, अशी ओरड केली जात असताना या ठिकाणी मात्र लखपती शेतीचे स्वप्न वास्तवात उतरले आहे. सेंद्रिय शेतीची पद्धत अवलंबून अवघ्या एक एकराच्या जागेत उसापासून बायोगॅस, टेरेस गार्डन, दारातच फळभाज्यांची लागवड, विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, तुरी, भाज्या, फुलझाडे, केळी, पपई, भुईमूग, सोयाबीन, लसूण, मुळा... अशी अनेक उत्पादने घेत कुटुंबाची गरज भागून महिन्याला लाखाचे उत्पन्न मिळवून देणारी ही ‘लखपती शेती’ या उत्सवात येणाऱ्या शेतकऱ्यांसह नागरिकांची आकर्षण असणार आहे. याशिवाय उत्सवांतर्गत २१ ते २३ तारखेदरम्यान गार्इंचे प्रदर्शन व विक्रीही आयोजित करण्यात आली आहे.ऋषिपरंपरा... योगज्याकाळी विज्ञान शून्यावस्थेत होते, त्यावेळी भारतातील ज्ञानी ऋषींनी अवकाश मंडल, निसर्ग, स्थापत्याबद्दल यशस्वी संशोधन सिद्ध केले. ही परंपरा, गुरुकुल पद्धती, समुद्रमंथन हा सगळा देखावा या ठिकाणी नागरिकांना पाहायला मिळेल. ‘आरोग्य’ या विषयावर एक स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. ज्यात पंचकर्म ते योग, प्राणायाम यांचा समावेश आहे. शाहू कलादालनया उत्सवाच्या परिसराला ‘शाहूनगरी’ असे नाव देण्यात आले असून, प्रवेशद्वारातच गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलवर शाहू महाराज चहा घेत असल्याची घटना मांडण्यात आली आहे. शिवाय छत्रपती शाहू कलादालनात शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग चित्रांच्या माध्यमातून रेखाटले आहेत. तसेच जुने कोल्हापूर, या शहराला लाभलेली चित्र-शिल्प परंपरा, चित्रपटसृष्टी, भारतातील विविध कलाकृती, संगीत-नाट्य-नृत्य कलांच्या संपन्नतेच्या श्रेष्ठत्वाची प्रचिती येते.