शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

शेतकऱ्यांना मिळणार कालव्याचे पाणी

By admin | Updated: April 28, 2015 23:45 IST

अभियंत्यांचे आश्वासन : म्हाकवेसह सीमाभागाला दिलासा--लोकमतचा प्रभाव

म्हाकवे : काळम्मावाडी धरणाच्या निढोरी शाखेतून अंतर्गत उजव्या कालव्यातून सोडले जाणारे पाणी म्हाकवेसह हदनाळ, आप्पाचीवाडी आणि सीमाभागातील शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या शिष्टमंडळाला दिले. याबाबत ‘लोकमत’मधून सोमवारी (दि. २७) ‘म्हाकवेतील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून या प्रश्नाला वाचा फोडली होती.या कालव्यातून सोडले जाणारे पाणी म्हाकवेच्या २५ कि. मी. च्या पुढील आणि सीमाभागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. कालव्याची गळती, पोट कालव्याचे कमकुवत दरवाजे, सुरुवातीच्या गावातील शेतकऱ्यांचा आडमुठेपणा, कालव्यावर देखरेख करण्यासाठी अपुरे कर्मचारी, यामुळे हे पाणी म्हाकवेतील तसेच सीमाभागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही.याबाबत जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, कागल तालुकाप्रमुख अशोक पाटील, निवृत्ती पाटील, शामराव तिपे, शरद पाटील, आदींनी अभियंता पाटील यांची भेट घेऊन निवेदनही दिले. यावेळी पाटील यांनी शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी अडथळे दूर करण्याचे आश्वासन दिले. ‘लोकमत’चे आभारशेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा विषय असो, अथवा कालव्यामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचा विषय असो, ‘लोकमत’ने तो अत्यंत प्रभावीपणे मांडून त्याच्या यशस्वीतेपर्यंत पाठपुरावा केला जातो. याबाबत शेतकऱ्यांच्यावतीने शिवसेनेचे शाखाप्रमुख निवृत्ती पाटील यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.