शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

शेतकऱ्यांना मिळणार कालव्याचे पाणी

By admin | Updated: April 28, 2015 23:45 IST

अभियंत्यांचे आश्वासन : म्हाकवेसह सीमाभागाला दिलासा--लोकमतचा प्रभाव

म्हाकवे : काळम्मावाडी धरणाच्या निढोरी शाखेतून अंतर्गत उजव्या कालव्यातून सोडले जाणारे पाणी म्हाकवेसह हदनाळ, आप्पाचीवाडी आणि सीमाभागातील शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या शिष्टमंडळाला दिले. याबाबत ‘लोकमत’मधून सोमवारी (दि. २७) ‘म्हाकवेतील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून या प्रश्नाला वाचा फोडली होती.या कालव्यातून सोडले जाणारे पाणी म्हाकवेच्या २५ कि. मी. च्या पुढील आणि सीमाभागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. कालव्याची गळती, पोट कालव्याचे कमकुवत दरवाजे, सुरुवातीच्या गावातील शेतकऱ्यांचा आडमुठेपणा, कालव्यावर देखरेख करण्यासाठी अपुरे कर्मचारी, यामुळे हे पाणी म्हाकवेतील तसेच सीमाभागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही.याबाबत जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, कागल तालुकाप्रमुख अशोक पाटील, निवृत्ती पाटील, शामराव तिपे, शरद पाटील, आदींनी अभियंता पाटील यांची भेट घेऊन निवेदनही दिले. यावेळी पाटील यांनी शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी अडथळे दूर करण्याचे आश्वासन दिले. ‘लोकमत’चे आभारशेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा विषय असो, अथवा कालव्यामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचा विषय असो, ‘लोकमत’ने तो अत्यंत प्रभावीपणे मांडून त्याच्या यशस्वीतेपर्यंत पाठपुरावा केला जातो. याबाबत शेतकऱ्यांच्यावतीने शिवसेनेचे शाखाप्रमुख निवृत्ती पाटील यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.