शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅँडल मार्च’ने मृत शेतकऱ्यांना आदरांजली

By admin | Updated: June 9, 2017 00:09 IST

‘कॅँडल मार्च’ने मृत शेतकऱ्यांना आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसलेल्या मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत झालेल्या सहा शेतकऱ्यांसह सोलापूर जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला किसान सभेच्यावतीने गुरुवारी सायंकाळी शहरातून ‘कॅँडल मार्च’ काढून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली.बिंदू चौकातील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ‘एआयएस’च्या आरती रेडेकर यांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलित करून पोलिसांच्या गोळीबारात मृत पावलेल्या शेतकऱ्यांना व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना काही काळ स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर ‘भाकप’चे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे, आॅल इंडिया यूथ फेडरेशनचे राष्ट्रीय सदस्य गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली कॅँडल मार्चला सुरुवात झाली. यावेळी ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’...‘शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणाऱ्या फडणवीस सरकारचा निषेध असो’, ‘स्वामिनाथन आयोगाची ताबडतोब अंमलबजावणी करा’, ‘धनाजी जाधव अमर रहे’... ‘सर्व हुतात्मा शेतकरी अमर रहे’... ‘शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे’... ‘किसान सभेचा विजय असो’... अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवाजी रोडवरून छत्रपती शिवाजी चौक येथे आल्यानंतर कॅँडल मार्चचा समारोप करण्यात आला.यावेळी सतीशचंद्र कांबळे, गिरीश फोंडे, कॉ. अनिल चव्हाण, आशा कुकडे यांची भाषणे झाली. यावेळी विकास जाधव, प्रशांत आंबी, सुनीता अमृतसागर, स्नेहल कांबळे, सीमा पाटील, किशोर आलासे, सुंदर देसाई, शक्ती कांबळे, कृष्णा पानसे, सुनील कोळी, निवास मोरे, आदी सहभागी झाले होते.