शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

निर्भयपणे मतदान करता येणार

By admin | Updated: July 19, 2015 00:39 IST

जे. एस. सहारिया: जिल्ह्यात ११५ संवेदनशील मतदान केंद्रे; मते विकत घेणाऱ्यांवरही प्रशासनाची करडी नजर

सातारा : राज्यातील १५ हजार ग्रामपंचायतींच्या २०१५ मध्ये निवडणुका होत आहेत. त्यातील ९ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणूक २५ जुलै व ४ आॅगस्ट पर्यंत होणार आहेत. सातारा जिल्ह्यातील ७२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका याच कालावधीत होत आहेत. मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यातील २ हजार ४८० मतदान केंद्रांपैकी ११५ संवेदनशील मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात माहिती देताना राज्याचे निवडणूक आयुक्त सहारिया म्हणाले, ‘७२६ पैकी १५ गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी नामनिर्देशपत्र भरण्यास सुरुवात केली आहे. २० जुलै हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यावेळी उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरताना कोणती येणारे अडचण तेथेच सोडविली जाणार आहे. त्यासाठी निवडणूक अयोगाने वेगळी व्यवस्था केली आहे. आजअखेर जिल्ह्यतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. पुण्यातील भारती भोसले, उत्तमराव पाटील, पी. एम. कडुसकर, श्रीपती मोरे या चार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ४६० निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकूण १४ हजार ४०४ एकूण कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मतमोजणी २७ जुलै व ४आॅगस्टला होणाऱ्या ग्रामपंचायतीची मतमोजणी ६ आॅगस्टला होईल. दरम्यान ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सहारिया साताऱ्यात आले होते. येथील नियोजन भवनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अप्पर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, सर्व तहसीलदार तसेच विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अमिष दाखवून मते विकत घेणाऱ्यांवरही प्रशासनाची करडी नजर असल्याचे यावेळी या बैठकीत सांगण्यात आले. (प्रतिनिधी)