शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

निर्भयपणे मतदान करता येणार

By admin | Updated: July 19, 2015 00:39 IST

जे. एस. सहारिया: जिल्ह्यात ११५ संवेदनशील मतदान केंद्रे; मते विकत घेणाऱ्यांवरही प्रशासनाची करडी नजर

सातारा : राज्यातील १५ हजार ग्रामपंचायतींच्या २०१५ मध्ये निवडणुका होत आहेत. त्यातील ९ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणूक २५ जुलै व ४ आॅगस्ट पर्यंत होणार आहेत. सातारा जिल्ह्यातील ७२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका याच कालावधीत होत आहेत. मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यातील २ हजार ४८० मतदान केंद्रांपैकी ११५ संवेदनशील मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात माहिती देताना राज्याचे निवडणूक आयुक्त सहारिया म्हणाले, ‘७२६ पैकी १५ गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी नामनिर्देशपत्र भरण्यास सुरुवात केली आहे. २० जुलै हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यावेळी उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरताना कोणती येणारे अडचण तेथेच सोडविली जाणार आहे. त्यासाठी निवडणूक अयोगाने वेगळी व्यवस्था केली आहे. आजअखेर जिल्ह्यतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. पुण्यातील भारती भोसले, उत्तमराव पाटील, पी. एम. कडुसकर, श्रीपती मोरे या चार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ४६० निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकूण १४ हजार ४०४ एकूण कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मतमोजणी २७ जुलै व ४आॅगस्टला होणाऱ्या ग्रामपंचायतीची मतमोजणी ६ आॅगस्टला होईल. दरम्यान ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सहारिया साताऱ्यात आले होते. येथील नियोजन भवनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अप्पर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, सर्व तहसीलदार तसेच विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अमिष दाखवून मते विकत घेणाऱ्यांवरही प्रशासनाची करडी नजर असल्याचे यावेळी या बैठकीत सांगण्यात आले. (प्रतिनिधी)