शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

मराठा आरक्षणप्रश्नी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:39 IST

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत ठराव करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन द्यावे, अन्यथा दि. ४ सप्टेंबरला मुंबईत धडक मोर्चा काढणारच, असा निर्धार बैठकीत करण्यात आला.‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे’ या मागणीसाठी दि. ४ सप्टेंबरला मुंबईत धडक मोर्चा काढण्याच्या नियोजनासाठी मंगळवार पेठेतील तालीम संस्था, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी सायंकाळी ...

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत ठराव करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन द्यावे, अन्यथा दि. ४ सप्टेंबरला मुंबईत धडक मोर्चा काढणारच, असा निर्धार बैठकीत करण्यात आला.‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे’ या मागणीसाठी दि. ४ सप्टेंबरला मुंबईत धडक मोर्चा काढण्याच्या नियोजनासाठी मंगळवार पेठेतील तालीम संस्था, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी सायंकाळी मंगळवार पेठेतील दत्ताजीराव काशीद सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी बाबासाहेब पाटील-लबेकर हे होते. यावेळी वसंतराव मुळीक, चंद्रकांत जाधव, संभाजीराव जगदाळे हेही प्रमुख उपस्थित होते.मुंबईला ४ सप्टेंबरला काढण्यात येणाºया मोर्चाच्या नियोजनासाठी समिती स्थापन करून त्यांनी नियोजनाचा रोज आढावा घ्यावा, या मोर्चात जास्तीत जास्त लोकसहभाग असावा, अशा सूचना उद्योगपती चंद्रकांत जाधव यांनी मांडल्या.वसंतराव मुळीक यांनी शासनाने धास्ती घेण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर जास्तीत जास्त संख्येने उतरावे, अशी सूचना केली. उद्या, बुधवारी मुंबईतील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षण प्रश्नासाठी राज्य शासनाने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याचे आश्वासन द्यावे, अन्यथा दि.४ सप्टेंबरला मोर्चा निघणारच, असा निर्धार केला.संभाजीराव जगदाळे, बाबासाहेब पोवार-लबेकर, मनोज शिंदे, दीपक गौड, माणिक मंडलिक, किशोर डवंग, राजू भोसले, संग्राम देवणे, किसन कल्याणकर, आदींनी सूचना मांडल्या. यावेळी राजू पाटील, रवींद्र मुळीक, किसनराव काशीद, रमेश माने, काका चरापले, रमेश मोरे, तालीम संस्था, मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांची उद्याभेट होण्याची शक्यतामराठा आरक्षणावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी जिल्ह्णातील सर्वपक्षीय खासदार-आमदार यांना तारीख व वेळ द्यावी, अशी विनंती खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यांनी तारीख व वेळ कळवितो, असे सांगितले आहे. त्यानुसार उद्या, बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी ही भेट होण्याची शक्यता आहे.