शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘गडहिंग्लज’साठी पडेल ती किंमत मोजणार

By admin | Updated: March 19, 2016 00:27 IST

हसन मुश्रीफ : गडहिंग्लज कारखाना निवडणुकीसाठी शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारास प्रारंंभ

गडहिंग्लज : गडहिंग्लज साखर कारखाना लवकरात लवकर कर्जमुक्त करून शेतकऱ्यांच्या मालकीचा करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. त्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याची आपली तयारी आहे, अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिली.माद्याळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील श्री सोमलिंग मंदिरात शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. वेळेवर व चांगला ऊस मिळण्यासाठी दर्जेदार बियाणे आणि ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करा, असा सल्लाही मुश्रीफ यांनी दिला. मुश्रीफ म्हणाले, कारखान्याला ऊर्जितावस्था येण्यासाठी गाळप क्षमता वाढवून विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. संचालक मंडळाची तयारी असेल तर विस्तारीकरणाचा खर्च कंपनी करेल किंवा कंपनीचे पैसे भागविण्याची कारखान्याची तयारी असेल तर कंपनी परत जाईल.शिंदे म्हणाले, प्रत्येक सभासदाला कारखान्याची निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शिंदे नको म्हणणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीचा सभासदच समाचार घेतील.उदय जोशी म्हणाले, एका बाजूला तालुक्याच्या विकासासाठी ४० वर्षे झटलेली माणसं आणि दुसऱ्या बाजूला निवडणुकीपुरती येणारी मंडळी यापैकी योग्य पर्याय सभासद नक्कीच निवडतील.संग्रामसिंह नलवडे म्हणाले, भूतकाळापेक्षा वर्तमानकाळाबाबत चिंतन करून भविष्यासाठी ठोस काम करण्याची गरज आहे. कारखाना वाचविण्यासाठी शेतकरी आघाडी हाच एकमेव पर्याय आहे. बी. एन. पाटील यांचेही भाषण झाले.यावेळी सभापती मीना पाटील, नगराध्यक्ष राजेश बोरगावे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, युवराज पाटील, भैया माने, संतोष पाटील, रामाप्पा करिगार, बाळेश नाईक, बी. टी. पाटील, प्रा. स्वाती कोरी, शिवप्रसाद तेली, आदींसह राष्ट्रवादी व जनता दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते.महाबळेश्वर चौगुले यांनी प्रास्ताविक केले. सोमनाथ घेज्जी यांनी सूत्रसंचालन केले. राजेश पाटील यांनी उमेदवारांचा परिचय करून दिला. मनोज बोरगल्ली यांनी आभार मानले. यावेळी सभासद उपस्थित होते. (प्रतिनिधी)गैरव्यवस्थापनामुळे तोटा नव्हे!गडहिंग्लज कारखान्यातील तोटा गैरव्यवस्थापनामुळे नव्हे तर गाळप क्षमता वाढ, विस्तारीकरणाअभावी झाल्याचे ब्रीस्क् कंपनीच्या तीन वर्षांच्या अनुभवातून स्पष्ट झाले आहे. तीन वर्षांत कंपनीलाही १९ कोटींचा तोटा झाला असून, सुमारे ४० कोटींची कर्जे भागविली आहेत, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.