शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

हृदयाला बळकटी देणारा निवडुंग मृत्यूपंथाला

By admin | Updated: September 26, 2014 23:33 IST

जीवनदायीकडे डोळेझाक : संवर्धनाकडे सर्वांचेच होतेय कित्येक वर्षांपासून दुर्लक्ष

श्रीकांत चाळके - खेड -विज्ञानाने सर्वदूर शोध लावल्यानंतर काही वनस्पती आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. कडुनिंबासारख्या वनस्पती अनेक शारीरिक कमजोरीवर गुणकारी आहेत. मात्र, हृदय कमजोर झाल्यास त्याला बळकटी आणून धडधड बंद करणारा आणि आयुर्वेदाने ‘जीवनदायी’ संबोधलेला निवडुंग दुर्मीळ झाला आहे़ निवडुंगचे संवर्धन करण्यात शासन पातळीवर उदासीनता दिसून येत असल्याने बहुगुणी असलेला हा निवडुंग मृत्युपंथाला लागला आहे.सिमेंटच्या वाढलेल्या जंगलात रासायनिक फवारे मारलेले आणि पावडर टाकून अकाली कृत्रिम पक्व केलेली फळे खाण्याची वेळ आली आहे़ अशा काळात आयुर्वेदाने वाखाणलेली नागाची फणी आकाराचे अथवा पंचकोनी निवडुंग डोंगरदऱ्यातून भुईसपाट होत चालले आहे. हृदयाची दुर्बलता निवडुंगाच्या रसाने दूर होते, असे आयुर्वेदात म्हटले आहे. कोकणातील डोंगर दऱ्यामध्ये निवडुंग नजरेला पडत असत. येथील निवडुंगांना फळे येत नव्हती. या निवडुंगाचा कुंपणासाठी चांगला वापर होत असे. कोकणात बांधावर कुंपणातील दिसणारा निवडुंग तसेच दोन दशके कोकणात फळविरहीत आढळणारा निवडुंग आज दुर्मीळ झाला आहे.मराठवाडा विभागात डोंगर दऱ्यातून पूर्वी मुबलक प्रमाणात या फळरहीत निवडुंगाचे दर्शन होत होते़ याच निवडुंगाच्या फळांचा उपयोग शरीरातील धोकादायक आजारांवर होत आहे. अशा बहुगुणी आणि दीर्घकालीन उपयोगी असलेले हे निवडुंग नष्ट होऊ लागले आहे. बंंजारा समाज व आदिवासी लोक निवडुंगाची बोंडं आवडीने खातात, असे येथील भरणे व खेड परिसरातील आयुर्वेदाचार्य सांगतात.निवडुंग उष्ण कटिबंंध आणि ओसाड जंगलदऱ्यातून आढळते. डोंगरदऱ्यांतील शेतीला कुंपण म्हणूनही याचा वापर होतो़ पूर्वी आदिवासी लोक द्रोण, पत्रावळी तसेच विडी तयार करण्यासाठी पळसाची पाने तोडण्यासाठी जात असत तेव्हा निवडुंगाची पिकलेली फळे खावून ते या रानमेव्याचा आस्वाद घेत.निवडुंगाच्या रस सेवनाने भूक वाढते. कफ विकारावरही गुणकारी आहे. सतत होणारा मूत्र विकार तसेच दाह, हृदयविकारावर या फळाचां रस गुणकारी आहे, असे बहुउपयोगी असलेले निवडुंग आता दुर्मीळ होऊ लागल्याने काही पर्यावरणवाद्यांनीही चिंता व्यक्त केली आहे़ (प्रतिनिधी)असा आहे निवडुंग...निवडुंगात ४१ टक्के शर्करा, साडेसहा टक्के मांसजन्य घटक, ३० टक्के साखर असते व उर्वरित भाग चोथा असतो़ शिशिर ऋतूत झाडांना फळे येतात. फळापासून सरबत केले जाते तर काही ठिकाणी फळे भाजून खाल्ली जातात. कफ व दम्यासाठी हे गुणकारी आहे. आयुर्वेदाने जीवनदायी म्हणून उल्लेख केलेले हे निवडुंग आता मृत्युपंथाला लागले आहे़