शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

हृदयाला बळकटी देणारा निवडुंग मृत्यूपंथाला

By admin | Updated: September 26, 2014 23:33 IST

जीवनदायीकडे डोळेझाक : संवर्धनाकडे सर्वांचेच होतेय कित्येक वर्षांपासून दुर्लक्ष

श्रीकांत चाळके - खेड -विज्ञानाने सर्वदूर शोध लावल्यानंतर काही वनस्पती आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. कडुनिंबासारख्या वनस्पती अनेक शारीरिक कमजोरीवर गुणकारी आहेत. मात्र, हृदय कमजोर झाल्यास त्याला बळकटी आणून धडधड बंद करणारा आणि आयुर्वेदाने ‘जीवनदायी’ संबोधलेला निवडुंग दुर्मीळ झाला आहे़ निवडुंगचे संवर्धन करण्यात शासन पातळीवर उदासीनता दिसून येत असल्याने बहुगुणी असलेला हा निवडुंग मृत्युपंथाला लागला आहे.सिमेंटच्या वाढलेल्या जंगलात रासायनिक फवारे मारलेले आणि पावडर टाकून अकाली कृत्रिम पक्व केलेली फळे खाण्याची वेळ आली आहे़ अशा काळात आयुर्वेदाने वाखाणलेली नागाची फणी आकाराचे अथवा पंचकोनी निवडुंग डोंगरदऱ्यातून भुईसपाट होत चालले आहे. हृदयाची दुर्बलता निवडुंगाच्या रसाने दूर होते, असे आयुर्वेदात म्हटले आहे. कोकणातील डोंगर दऱ्यामध्ये निवडुंग नजरेला पडत असत. येथील निवडुंगांना फळे येत नव्हती. या निवडुंगाचा कुंपणासाठी चांगला वापर होत असे. कोकणात बांधावर कुंपणातील दिसणारा निवडुंग तसेच दोन दशके कोकणात फळविरहीत आढळणारा निवडुंग आज दुर्मीळ झाला आहे.मराठवाडा विभागात डोंगर दऱ्यातून पूर्वी मुबलक प्रमाणात या फळरहीत निवडुंगाचे दर्शन होत होते़ याच निवडुंगाच्या फळांचा उपयोग शरीरातील धोकादायक आजारांवर होत आहे. अशा बहुगुणी आणि दीर्घकालीन उपयोगी असलेले हे निवडुंग नष्ट होऊ लागले आहे. बंंजारा समाज व आदिवासी लोक निवडुंगाची बोंडं आवडीने खातात, असे येथील भरणे व खेड परिसरातील आयुर्वेदाचार्य सांगतात.निवडुंग उष्ण कटिबंंध आणि ओसाड जंगलदऱ्यातून आढळते. डोंगरदऱ्यांतील शेतीला कुंपण म्हणूनही याचा वापर होतो़ पूर्वी आदिवासी लोक द्रोण, पत्रावळी तसेच विडी तयार करण्यासाठी पळसाची पाने तोडण्यासाठी जात असत तेव्हा निवडुंगाची पिकलेली फळे खावून ते या रानमेव्याचा आस्वाद घेत.निवडुंगाच्या रस सेवनाने भूक वाढते. कफ विकारावरही गुणकारी आहे. सतत होणारा मूत्र विकार तसेच दाह, हृदयविकारावर या फळाचां रस गुणकारी आहे, असे बहुउपयोगी असलेले निवडुंग आता दुर्मीळ होऊ लागल्याने काही पर्यावरणवाद्यांनीही चिंता व्यक्त केली आहे़ (प्रतिनिधी)असा आहे निवडुंग...निवडुंगात ४१ टक्के शर्करा, साडेसहा टक्के मांसजन्य घटक, ३० टक्के साखर असते व उर्वरित भाग चोथा असतो़ शिशिर ऋतूत झाडांना फळे येतात. फळापासून सरबत केले जाते तर काही ठिकाणी फळे भाजून खाल्ली जातात. कफ व दम्यासाठी हे गुणकारी आहे. आयुर्वेदाने जीवनदायी म्हणून उल्लेख केलेले हे निवडुंग आता मृत्युपंथाला लागले आहे़