शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

जयसिंगपुरातील व्यवहार सकाळी ७ ते ११ सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:23 IST

जयसिंगपूर : लॉकडाऊनमुळे शहरातील व्यापाऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सणामुळे चांगल्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे पालिका ...

जयसिंगपूर : लॉकडाऊनमुळे शहरातील व्यापाऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सणामुळे चांगल्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे पालिका प्रशासनाने वेळेची मुदत वाढवून सकाळी सात ते अकरा या वेळेत व्यवसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी शहरातील व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी टिना गवळी यांच्याकडे केली.

शहरात सध्या सात ते साडेआठ ही वेळ व्यावसायिकांसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरातील प्रमुख व्यापाऱ्यांनी थेट मुख्याधिकारी गवळी यांची भेट घेतली. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुकान भाडे, कामगार पगार, वीज बिले भरताना आर्थिक कोंडी होत आहे. शिवाय, घरखर्च भागवितानाही नाकीनऊ येत आहे. अवघ्या तीन दिवसांवर ईद, अक्षय तृतीया सण तोंडावर आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसाय सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

यावेळी मुख्याधिकारी गवळी म्हणाल्या, शासनाने लॉकडाऊन केला आहे. यामध्ये बदल करू शकत नाही. मात्र, सभागृहापुढे प्रश्न ठेवून यातून मार्ग निघतो का यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी सुनील ताडे, युवराज शहा, अशोक पनपालिया, निर्मल पोरवाल यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते.

फोटो - ११०५२०२१-जेएवाय-०७

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे मुख्याधिकारी टिना गवळी यांच्याकडे व्यापाऱ्यांनी भेट घेऊन कैफियत मांडली.