शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

जयसिंगपुरातील व्यवहार सकाळी ७ ते ११ सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:23 IST

जयसिंगपूर : लॉकडाऊनमुळे शहरातील व्यापाऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सणामुळे चांगल्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे पालिका ...

जयसिंगपूर : लॉकडाऊनमुळे शहरातील व्यापाऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सणामुळे चांगल्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे पालिका प्रशासनाने वेळेची मुदत वाढवून सकाळी सात ते अकरा या वेळेत व्यवसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी शहरातील व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी टिना गवळी यांच्याकडे केली.

शहरात सध्या सात ते साडेआठ ही वेळ व्यावसायिकांसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरातील प्रमुख व्यापाऱ्यांनी थेट मुख्याधिकारी गवळी यांची भेट घेतली. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुकान भाडे, कामगार पगार, वीज बिले भरताना आर्थिक कोंडी होत आहे. शिवाय, घरखर्च भागवितानाही नाकीनऊ येत आहे. अवघ्या तीन दिवसांवर ईद, अक्षय तृतीया सण तोंडावर आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसाय सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

यावेळी मुख्याधिकारी गवळी म्हणाल्या, शासनाने लॉकडाऊन केला आहे. यामध्ये बदल करू शकत नाही. मात्र, सभागृहापुढे प्रश्न ठेवून यातून मार्ग निघतो का यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी सुनील ताडे, युवराज शहा, अशोक पनपालिया, निर्मल पोरवाल यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते.

फोटो - ११०५२०२१-जेएवाय-०७

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे मुख्याधिकारी टिना गवळी यांच्याकडे व्यापाऱ्यांनी भेट घेऊन कैफियत मांडली.