शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

विवाह जुळवणाऱ्या एजंटच्या आडून फसवणुकीचा धंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:22 IST

कोपार्डे : विवाह जुळविण्यासाठी ग्रामीण भागात अनेक एजंट कार्यरत झाले असून, विवाहोत्सुक तरुण- तरुणी व त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक लूट ...

कोपार्डे : विवाह जुळविण्यासाठी ग्रामीण भागात अनेक एजंट कार्यरत झाले असून, विवाहोत्सुक तरुण- तरुणी व त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक लूट राजरोस केली जात आहे. या एजंटांकडून विवाहोत्सुकांची माहिती दिल्याबद्दल आणि असे विवाह जुळून आल्यानंतर मागितला जाणारा मेहनताना पाच हजारांपासून ५० हजार रुपयांपर्यंत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पन्हाळा तालुक्यातील बोरगाव येथील एका महिलेला गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एजंटमुळे आपला प्राण गमवावा लागल्याने एजंटांचा सुळसुळाट चव्हाट्यावर आला आहे.

सध्या विवाहोत्सुक तरुणांना मुली मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मुलींच्या व तिच्या आई- वडिलांच्या अपेक्षा वाढल्याने मोठी शेती असली तरी नोकरीची अपेक्षा मुलीच्या नातेवाइकांकडून बाळगली जात आहे. विशेषतः मराठा समाजातील मुलांना शासकीय नोकरीमध्ये फारच कमी संधी मिळत असल्याने नोकरी नसल्याच्या कारणाने विवाह जुळून येणे मोठी तारेवरची कसरत झाली आहे. याचाच फायदा उठवणारे अनेक एजंट ग्रामीण भागात कार्यरत झाले आहेत. या एजंटकडून मुलाचे अथवा मुलीचे स्थळ सुचवण्यासाठी हजारो रुपयांची मागणी केली जात आहे. चांगले स्थळ मिळावे म्हणून उपवर तरुण व नातेवाईक या एजंटांच्या मागणीला बळी पडत आहेत. लग्न ठरल्यानंतर पाच हजारांपासून पन्नास हजारांपर्यंत एजंटकडून मागणी केली जात आहे.

अलीकडेच पन्हाळा तालुक्यातील सधन कुटुंब असलेल्या छबूताई केरबा पाटील या महिलेचा अशा लग्न ठरवणाऱ्या एजंटने खून केल्याने हा विषय ग्रामीण भागात चर्चेला येऊ लागला आहे. छबूताई पाटील यांची दोन मुले खाजगी संस्थेत चांगल्या पगारावर नोकरीत आहेत. याशिवाय चांगली जमीनही आहे. पती केरबा पाटील हे अंथरुणाला खिळून असल्याने त्यांच्या डोळ्यादेखत आपल्या मुलांचा विवाह करण्यासाठी छबूताई धडपडत होत्या. प्रकाश कुंभार या एजंटने छबूताई यांची ही अगतिकता ओळखून त्याचा गैरफायदा उठविण्याचा प्रयत्न केला. अत्यंत कष्टाळू असलेल्या छबूताई यांना मुली पाहण्यासाठी बोलावून या एजंटने त्यांच्याकडे असलेल्या सोन्याच्या हव्यासापोटी त्यांचा गळा दाबून त्यांना ठार मारले. यामुळे हे कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. या कुटुंबाला दोन वेळच्या जेवणासाठी घरात महिला नसल्याने घरात चांगली परिस्थिती असतानासुद्धा अडचण निर्माण झाली आहे.