शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

बसस्थानक स्थलांतर हाच पर्याय

By admin | Updated: August 7, 2015 22:56 IST

नागरिकांच्या प्रतिक्रिया : शहरातील वाहतुकीच्या कोंडीवर पर्याय, ...तरच क्रांती चौक मोकळा श्वास घेईल

जयसिंगपूर : शहराच्या वाहतूक कोंडीला केंद्रबिंदू ठरलेले बसस्थानक स्थलांतर हाच पर्याय पुढे आला आहे. बसस्थानक स्थलांतर झाल्यास वाहतूक सुरळीत होईल व नव्याने बसस्थानक सुसज्ज होईल. यासाठी आता उठाव होणे गरजेचे आहे. नगरपालिका कोणती भूमिका घेते, शिवाय सर्वपक्षीय ताकद या प्रश्नासाठी लागणार का, हाच प्रश्न खऱ्या अर्थाने चर्चेत आला आहे. शहरातील प्रमुख वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची गरज आणि बसस्थानकाचे स्थलांतर या प्रश्नावर ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर याप्रश्नी अनेक मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त करून बसस्थानक स्थलांतर गरजेचे असल्याचे आवर्जून सांगितले. पर्यायी जागा निर्माण करून कोणत्याही परिस्थितीत बसस्थानक स्थलांतर झाल्यास निश्चितच क्रांती चौक मोकळा श्वास घेऊ शकतो. शिवाय वाहतुकीला शिस्त लागणार आहे. (प्रतिनिधी)‘लोकमत’चे अभिनंदनजयसिंगपुरातील वाहतूक कोंडी व वाहतुकीला अडचणीचे ठरणारे बसस्थानक स्थलांतरचा विषय ‘लोकमत’ने प्रसिद्ध करून या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले. या विषयाचा पाठपुरावा करण्याची मागणी केली.शहरात पर्यायी जागा असेल तर बसस्थानकाचे स्थलांतर निश्चित करावे. प्रसंगी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे या प्रश्नाचा पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.- अ‍ॅड. संभाजीराजे नाईक, शिवसेनाक्रांती चौकातील वाहतूक कोंडीमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे पर्यायी जागा उपलब्ध करून बसस्थानक स्थलांतर होणे ही गरजेची बाब बनली असून यासाठी स्वाभिमानी पक्षाकडून निश्चित पाठपुरावा केला जाईल.- डॉ. महावीर अक्कोळेबसस्थानक स्थलांतर झाल्यास निश्चितच वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. लोकांना ये-जा करणे सोयीस्कर होणार असून यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरणार आहे. - डॉ. नलिनी पाटीलप्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेली जागा नव्या बसस्थानकासाठी सोयीस्कर आहे. सध्या या जागेत डुकरांचा उपद्रव वाढला असून दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात पसरली आहे. याठिकाणी बसस्थानक झाल्यास सुकर व सोयीस्कर होईल. - सुजित दानोळेझेले चित्रमंदिर, क्रांती चौक, नांदणी रस्ता ही तीन प्रमुख ठिकाणे वाहतुकीची कोंडी निर्माण होण्यास कारणीभूत आहेत. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता बसस्थानक स्थलांतर हा पर्याय ठरणार असून महाराष्ट्र शासनाच्या नावावर असलेली सुमारे साडेचार एकर जागा यासाठी उपयुक्त ठरेल. - अस्लम फरास, नगरसेवकशहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी सम-विषम प्रमाणात वाहतुकीचा आराखडा तयार केल्यानंतर काहीअंशी वाहतुकीला शिस्त लागली होती. मात्र, यामध्ये सातत्य राहिले नाही. बसस्थानकाचे स्थलांतर झाल्यास व वाहतूक आराखड्यानुसार नियोजन झाल्यास निश्चित जयसिंगपूर शहरातील वाहतुकीला शिस्त लागणार आहे.- नितीन पाटील, अध्यक्ष इंजिनिअर असोसिएशनसध्या असलेले बसस्थानक वाहतुकीच्या कोंडीस निमंत्रण देणारेच आहे. बसेस येण्याचे व जाण्याचे दोन मार्ग असल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. वाहतूक कोंडीची प्रमुख समस्या असणारे हे बसस्थानक स्थलांतर झाल्यास निश्चितच हा मार्ग वाहतुकीस सोयीस्कर ठरणार आहे.- संतोष डोके, सहा. पो. निरीक्षक