शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘जलाओ ऐसी शमा, के रोशनी औरों के काम आये

By admin | Updated: July 22, 2014 23:39 IST

कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी : पै-पै साठवून १२३ कुटुंबीयांच्या जीवनात प्रकाश’

एम. ए. पठाण ल्ल कोल्हापूर‘जिओ इस तरह की, जिंदगी औरों के काम आये। जलाओ ऐसी शमा के, रोशनी औरों के काम आये’ अशा विचारातून समाजातील गोरगरीब, विधवा, अनाथ व गरजू लोकांच्या जीवनात जगण्याची उमेद निर्माण करण्याचे काम कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी करीत आहे. गतवर्षी या कमिटीने प्रथमच सात लाख १९ हजार ३३५ रुपये जमा केले. अन् गरजंूना सात लाख सहा हजार ७२७ रुपये खर्च करण्यात आले. १२३ गरजूंंना याचा लाभ झाला.मुस्लिम बांधव रमजान महिन्यात आपली जकात, फितरा गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. यासाठी समाजातील काही व्यक्ती, समूह कार्यरत आहेत. उलमा-ए-करात यांच्या मार्गदर्शनानुसार समाजातील लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, हा उद्देश घेऊन काही तरुण नि:स्वार्थीपणे एकत्र आले आणि त्यातून गतवर्षी कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी अस्तित्वात आली. मुस्लिम समाजातील बांधवांकडून दिलेली जकात, फितरा, सदका, आदी दिल्यानंतर ती गरजूंच्या हाती पडेल. त्याचा चांगला विनियोग होईल. त्याची दुआ मिळेल, हा उद्देश असतो. या उद्देशाला या विचाराने एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम या कमिटीच्या माध्यमातून होत आहे.गरीब, विधवांच्या घरी प्रत्येक महिन्याला काही ठराविक धान्य पोहोचविण्याचे काम होत आहे. अनाथ मुलीच्या लग्नातील खर्च, जे गरीब रुग्णालयात उपचार घेत आहेत त्याचा औषधोपचारांचा खर्च, शस्त्रक्रियांचा खर्च, आदी मदत करण्याचे काम कमिटी करत आहे.कमिटीकडे गतवर्षी एकूण सात लाख १९ हजार ३३५ रुपये जमा झाले होते. यामध्ये जकात ३ लाख ५५ हजार ७२१ रुपये, इमदाद १ लाख ४८ हजार १७३ रुपये, सदका १ लाख ८६ हजार २३९ रुपये, फितरा २०० रुपये, फिदिया ३५०० रुपये, कफ्फारा १ लाख ५०० रुपये, बकरी ईदच्या बकऱ्यांच्या चमड्यांपासून १९ हजार ६३० रुपये, इतर ४,३७२ रुपये असे एकूण सात लाख १९ हजार ३३५ रुपये जमा झाले होते. समाजबांधवांनी गतवर्षी या कमिटीवर विश्वास दाखवत आपली जकात, फितरा, सदका, आदी जमा केला. हे समाजातील अनाथ मुले, विधवा, गरजू आई-वडिलांच्या वाईटवेळी उपयोगी पडले. त्यामुळे त्यांच्याकडून मिळणारी दुआ ही लाख मोलाची ठरणार आहे. समाजातील अशा अनेक प्रसंगातील गरजंूना मदत करण्यासाठी याहीवर्षी कमिटी निरपेक्ष, नि:स्वार्थी भावनेने जोमाने कामास लागली आहे. मुस्लिम बांधवांनी आपली जकात या कमिटीकडे अधिक जमा करण्याची गरज आहे. जेणेकरून समाजातील अधिक गरजवंतांना याचा लाभ होईल.कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीचे सदस्य याही वर्षी जोमाने कार्यरत असून यावर्षी सर्वसाधारण १५ लाखाहून अधिक रक्कम जमा होईल असा विश्वास कमिटीच्या सदस्यांनी व्यक्त केला.