शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
5
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
6
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
7
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
8
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
9
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
10
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
11
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
12
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
13
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
14
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
15
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
16
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
17
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती
18
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
19
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
20
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला

‘जलाओ ऐसी शमा, के रोशनी औरों के काम आये

By admin | Updated: July 22, 2014 23:39 IST

कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी : पै-पै साठवून १२३ कुटुंबीयांच्या जीवनात प्रकाश’

एम. ए. पठाण ल्ल कोल्हापूर‘जिओ इस तरह की, जिंदगी औरों के काम आये। जलाओ ऐसी शमा के, रोशनी औरों के काम आये’ अशा विचारातून समाजातील गोरगरीब, विधवा, अनाथ व गरजू लोकांच्या जीवनात जगण्याची उमेद निर्माण करण्याचे काम कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी करीत आहे. गतवर्षी या कमिटीने प्रथमच सात लाख १९ हजार ३३५ रुपये जमा केले. अन् गरजंूना सात लाख सहा हजार ७२७ रुपये खर्च करण्यात आले. १२३ गरजूंंना याचा लाभ झाला.मुस्लिम बांधव रमजान महिन्यात आपली जकात, फितरा गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. यासाठी समाजातील काही व्यक्ती, समूह कार्यरत आहेत. उलमा-ए-करात यांच्या मार्गदर्शनानुसार समाजातील लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, हा उद्देश घेऊन काही तरुण नि:स्वार्थीपणे एकत्र आले आणि त्यातून गतवर्षी कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी अस्तित्वात आली. मुस्लिम समाजातील बांधवांकडून दिलेली जकात, फितरा, सदका, आदी दिल्यानंतर ती गरजूंच्या हाती पडेल. त्याचा चांगला विनियोग होईल. त्याची दुआ मिळेल, हा उद्देश असतो. या उद्देशाला या विचाराने एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम या कमिटीच्या माध्यमातून होत आहे.गरीब, विधवांच्या घरी प्रत्येक महिन्याला काही ठराविक धान्य पोहोचविण्याचे काम होत आहे. अनाथ मुलीच्या लग्नातील खर्च, जे गरीब रुग्णालयात उपचार घेत आहेत त्याचा औषधोपचारांचा खर्च, शस्त्रक्रियांचा खर्च, आदी मदत करण्याचे काम कमिटी करत आहे.कमिटीकडे गतवर्षी एकूण सात लाख १९ हजार ३३५ रुपये जमा झाले होते. यामध्ये जकात ३ लाख ५५ हजार ७२१ रुपये, इमदाद १ लाख ४८ हजार १७३ रुपये, सदका १ लाख ८६ हजार २३९ रुपये, फितरा २०० रुपये, फिदिया ३५०० रुपये, कफ्फारा १ लाख ५०० रुपये, बकरी ईदच्या बकऱ्यांच्या चमड्यांपासून १९ हजार ६३० रुपये, इतर ४,३७२ रुपये असे एकूण सात लाख १९ हजार ३३५ रुपये जमा झाले होते. समाजबांधवांनी गतवर्षी या कमिटीवर विश्वास दाखवत आपली जकात, फितरा, सदका, आदी जमा केला. हे समाजातील अनाथ मुले, विधवा, गरजू आई-वडिलांच्या वाईटवेळी उपयोगी पडले. त्यामुळे त्यांच्याकडून मिळणारी दुआ ही लाख मोलाची ठरणार आहे. समाजातील अशा अनेक प्रसंगातील गरजंूना मदत करण्यासाठी याहीवर्षी कमिटी निरपेक्ष, नि:स्वार्थी भावनेने जोमाने कामास लागली आहे. मुस्लिम बांधवांनी आपली जकात या कमिटीकडे अधिक जमा करण्याची गरज आहे. जेणेकरून समाजातील अधिक गरजवंतांना याचा लाभ होईल.कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीचे सदस्य याही वर्षी जोमाने कार्यरत असून यावर्षी सर्वसाधारण १५ लाखाहून अधिक रक्कम जमा होईल असा विश्वास कमिटीच्या सदस्यांनी व्यक्त केला.