शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

‘पुनर्वसन’चा भोंगळ कारभार

By admin | Updated: March 4, 2016 21:35 IST

दोडामार्गातील प्रकार : आडनाव बदलून मोबदला डावलण्याची घटना

साटेली-भेडशी : तिलारी धरणग्रस्तांना वनटाईम सेटलमेंटची रक्कम देण्यासाठी सिंधुदुर्ग पुनर्वसन शाखेच्यावतीने दाखल्याची पडताळणी सुरू आहे. यामध्ये साटेली- भेडशी येथील संदेश चंद्रकांत पास्ते (रा. साटेली-भेडशी) या दाखला धारकाला नोटीस बजावत असताना त्याचे वडील नोकरीला लागले असल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘पास्ते’ आडनाव नामक दाखलाधारकाचे वडील ‘नाईक’ करण्याची किमया पुनर्वसन शाखेने करून दाखविली. याबाबत जोरदार चर्चा सुरू असून पुनर्वसन विभागाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.गेल्या तीस वर्षापासून तिलारी धरणग्रस्त आपल्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी झगडत आहेत. तिलारी धरण साकारावे, यासाठी एका नोकरीचे आमिष तत्कालीन सरकारने दाखविले होते. मोठ्या मनाने पिढीजात संपत्तीचा त्याग करत पाल, पाटये, आयनोडे, सरमळे, शिरंगे आदी गावांचे झरेबांबर, साटेली, बोडदे, सासोली आदी ठिकाणच्या माळरानावर पुनर्वसन करण्यात आले. तीस वर्षे झाली तरी संघर्ष न संपलेल्या धरणग्रस्तांतून काही वर्षापासून धरणग्रस्त संघर्षग्रस्त समिती स्थापन करून घरटी एक नोकरीऐवजी वनटाईम सेटलमेंटसाठी संघर्ष सुरू झाला. याचेच फलित म्हणून तत्कालीन आघाडी सरकारने नोकरीऐवजी एकरकमी पाच लाख अनुदान देण्याचे ठरविले. सत्तेवर आलेल्या सेना भाजप युती सरकारने याबाबतचा अध्यादेशही जारी केला. त्यानंतर धरणग्रस्तांचा वनटाईम सेटलमेंटचा प्रश्न सुटला असे वाटत असताना पुनर्वसन शाखेने आपणच दिलेल्या ९४७ दाखल्यांवर संशयाचे बोट ठेवले. त्यामुळे पुनर्पडताळणीत हा प्रश्न अडकला. ही पडताळणी करताना जिल्हा पुनर्वसन शाखेचा भोंगळ कारभार पुढे आला आहे. यामध्ये दाखलाधारक संदेश चंद्रकांत पास्ते याला नोटीस बजावताना त्यांचे वडील नोकरीला लागल्याचे म्हटले आहे. मात्र भलत्याचे नाव नोंदविल्याने पास्ते कुटुंबीयांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. संदेश पास्ते याला पत्र देताना त्यांच्या वडिलांचे नाव गोविंद अर्जुन नाईक असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पास्ते आणि नाईक असा वेगळा शोध पुनर्वसन खात्याने लावला आहे. या प्रकरणाने पास्ते कुटुंबीयांना पुनर्वसन खात्यात हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे या कुटुंबाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (वार्ताहर)पत्रामुळे मानसिक त्रास : संदेश पास्तेसंदेश चंद्रकांत पास्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या वडिलांना प्रकल्पग्रस्त दाखल्याद्वारे नोकरीमध्ये सामावून घेतलेले नाही. त्यामुळे जिल्हा पुनर्वसन खात्याने पत्रात नमूद केलेल्या गोविंद अर्जुन नाईक यांच्याशी आपला काहीही संबंध नाही. या पत्रामुळे माझ्यासह कुटुंबीयांना मानसिक व आर्थिक त्रास झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.