शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

विम्याच्या सुरक्षा कवचाने दु:खभार हलका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:25 IST

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषदेतर्फे राबविली जाणारी ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना’ जिल्ह्णातील ...

नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषदेतर्फे राबविली जाणारी ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना’ जिल्ह्णातील शालेय विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने सुरक्षा कवच ठरली आहे. गेल्या वर्षभरात अपघातात मृत्यू पावलेल्या १९ विद्यार्थ्यांच्या पालकांना १३ लाख ६१ हजाराची मदत मिळाली आहे. मुलांच्या अचानक जाण्याचे दु:ख घेऊन जगणाऱ्या पालकांना या योजनेने दिलेल्या मदतीच्या हातामुळे दु:खभार काहीसा हलका झाला आहे. दरम्यान, यावर्षी प्राप्त झालेल्या प्रस्तावातून ११ मंजूर झाले असून ८ लाख २५ हजार निधीची मागणी शासनाकडे अद्याप प्रलंबित आहे.राज्य शासनाकडून २००३ पासून ‘राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना’ या नावाने शालेय विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यूनंतर लाभ देणारी योजना सुरू आहे. २0१२ पासून ही ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ या नावाने विस्तारित करून त्यात पहिली ते १२ पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना समाविष्ट करुन घेण्यात आले.शालेय विद्यार्थ्यांचे रस्ते अपघातात, पाण्याने बुडून, विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. या मुलांचे अकाली जाणे त्यांच्या पालकांसाठी धक्कादायक असते. त्यांना आपल्या परीने मदत करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेची प्रचार प्रसिद्धी केल्याने याला चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे; तथापि तीन प्रतीत प्रस्ताव सादर करावयास सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे दिली जात नसल्याने प्रस्ताव अपूर्ण राहण्याचे प्रमाण जास्त आहे. शिवाय जखमी झाल्यानंतरही लाभाची रक्कम मिळते, पण त्यासाठी एकही प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे येत नसल्याने त्यांना एक रुपयाचा लाभ मिळालेला नाही.योजनेसाठी अत्यावश्यक कागदपत्रेप्रथम खबरी अहवाल, स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, सिव्हिल सर्जन यांनी प्रतिस्वाक्षरित केलेले मृत विद्यार्थ्याचा शवविच्छेदन अहवाल, मृत्यू दाखला, अपंगत्वाच्या कारणाबाबातचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रतिस्वाक्षरीसह. पालकांचे बँक पासबुक, आधार कार्ड, आदी कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. यापैकी एक जरी कागदपत्र प्रस्तावासह जोडले नाही तर प्रस्ताव अपूर्ण समजून लाभ मिळू शकत नाही.या योजनेत मिळणारा लाभ : मृत्यू आल्यास ७५ हजार, दोन अवयव निकामी होऊन कायमचे अपंगत्व आल्यास ५0 हजार आणि एक अवयव निकामी होऊन अपंगत्व आल्यास ३० हजारांची मदत मिळते.रक्कम थेट खात्यावर वर्गप्राथमिक शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणाºया या योजनेतून २0१८ या साली १९ प्रस्ताव मंजूर झाले. पाण्यात बुडूनचे ९, अपघाती ७, झोपाळ्यावरून पडून १, विजेचा धक्का लागून २ असे १९ जण मयत झाले होते. त्यांना ७५ हजारांप्रमाणे १३ लाख ६१ हजार रुपये या पालकांना देण्यात आले. यावर्षी ११ प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. २९ जानेवारीला झालेल्या बैठकीत ८ लाख २५ हजार रुपये निधी मागणी करणारा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. हा निधी आल्यानंतर थेट पालकांच्या खात्यावरच वर्ग होणार आहे.