शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीचा बोजा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:22 IST

कोल्हापूर: लॉकडाऊनच्या कठीण काळातही कष्टाच्या जोरावर स्वत:सह अर्थव्यवस्थेलाही तारलेल्या शेतकऱ्यांना इंधर दरवाढीने मोठ्या खाईत लोटले आहे. इंधन दरातील वाढीने ...

कोल्हापूर: लॉकडाऊनच्या कठीण काळातही कष्टाच्या जोरावर स्वत:सह अर्थव्यवस्थेलाही तारलेल्या शेतकऱ्यांना इंधर दरवाढीने मोठ्या खाईत लोटले आहे. इंधन दरातील वाढीने मालवाहतूक वाढली. परिणामी या दरवाढीचा बोजा अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांच्या मानेवर येऊन पडला असून खते, बियाण्यांसह कृषी अवजारांच्याही किमती सरासरी १० ते २० टक्क्यापर्यंत वाढल्या आहेत.

लॉकडाऊनने विस्कटलेली घडी शेतकऱ्यांमुळे बऱ्यापैकी पुन्हा बसू लागली होती. निसर्गाचीही साथ मिळाल्याने शेतीची घोडदौड सुरू असतानाच सातत्याने वाढत गेलेल्या पेट्रोल-डिझेलच्या वाढीने मोठा ब्रेक लावल्याने शेतीचे गणितच पुरते विस्कटून गेले आहे. पेट्रोल, डिझेलमधील वाढ ही गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ ते ४० टक्के असल्याने त्याचा थेट परिणाम कृषी उद्याेगावर झाला आहे. मालवाहतुकीच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ केल्याचा सरळ-सरळ फटका या कृषी व्यवसायाला बसला आहे.

कृषी अवजाराच्या किमतीत या महिन्याभरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रॉ मटेरिअल, कास्टिंगमध्ये वाढ झाली. तांबे व लोखंडातही वाढ झाल्याने यापासून तयार होणाऱ्या अवजारांची किंमतही वाढली आहे. मोटारीसाठी लागणाऱ्या वाइंडिंगपासून ते साध्या विळ्यापर्यंत सर्वच अवजारांच्या किमतींत वाढ दिसत आहे. मशागतीसाठी ट्रॅक्टर, छोटा पॉवर टिलरसह कापणी, कोळपणीसाठीच्या छोट्या अवजारांची मागणी वाढली होती. आता दरात एकदम वाढ दिसत असल्याने शेतकरी व विक्रेत्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत.

खते, बी-बियाण्यांच्या दरात ७ ते १० टक्के वाढ दिसत आहे. बियाणे बऱ्यापैकी बाहेरील जिल्हा आणि राज्यातून कोल्हापुरात आणले जाते. स्थानिक बियाण्यांचा वापर खूपच कमी आहे. रासायनिक खतांच्या किमतींत अजून वाढ दिसत नसली तरी कीटकनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या किमती बऱ्यापैकी चढल्या आहेत.

चौकट ०१

बियाण्यांच्या किमती निदान सरकारी कंपनी असलेल्या ‘महाबीज’ने तरी वाढवू नयेत, अशी विनंती राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या महाबीज संचालकांकडे केली आहे; पण वाहतूक खर्चाचा बोजा कसा पेलायचा याला पर्याय द्या, अशी विचारणा त्यांच्याकडून झाली आहे.

प्रतिक्रिया ०१

कृषी अवजारांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या धातूंच्या किमतीत वाढ झाल्याचा थेट परिणाम अवजारांच्या किमतीवर झाला आहे. कंपनीकडूनच वाढीव दराने येत असल्याने आम्हीही त्याचप्रमाणे दराची आकारणी करीत आहोत. शेतकरी याबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत; पण आमचा नाइलाज आहे.

भरत तेंडुलकर, अवजारे विक्रेते, लक्ष्मीपुरी

प्रतिक्रिया ०२

खते, बी-बियाण्यांसाठी बाहेरील राज्ये व जिल्ह्यांवरच आपल्याला अवलंबून राहावे लागते. साहजिकच अंतर वाढेल तसा इंधनाचा खर्चही वाढतो. हा खर्च वाढला तर मालवाहतुकीत वाढ होते आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम बियाण्यांच्या किमती वाढण्यात झाला आहे.

अनिल श्रीश्रीमाळ, बियाणे, औषधे विक्रेते, शाहूपुरी