शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

इंधन दरवाढीचा बोजा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:22 IST

कोल्हापूर: लॉकडाऊनच्या कठीण काळातही कष्टाच्या जोरावर स्वत:सह अर्थव्यवस्थेलाही तारलेल्या शेतकऱ्यांना इंधर दरवाढीने मोठ्या खाईत लोटले आहे. इंधन दरातील वाढीने ...

कोल्हापूर: लॉकडाऊनच्या कठीण काळातही कष्टाच्या जोरावर स्वत:सह अर्थव्यवस्थेलाही तारलेल्या शेतकऱ्यांना इंधर दरवाढीने मोठ्या खाईत लोटले आहे. इंधन दरातील वाढीने मालवाहतूक वाढली. परिणामी या दरवाढीचा बोजा अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांच्या मानेवर येऊन पडला असून खते, बियाण्यांसह कृषी अवजारांच्याही किमती सरासरी १० ते २० टक्क्यापर्यंत वाढल्या आहेत.

लॉकडाऊनने विस्कटलेली घडी शेतकऱ्यांमुळे बऱ्यापैकी पुन्हा बसू लागली होती. निसर्गाचीही साथ मिळाल्याने शेतीची घोडदौड सुरू असतानाच सातत्याने वाढत गेलेल्या पेट्रोल-डिझेलच्या वाढीने मोठा ब्रेक लावल्याने शेतीचे गणितच पुरते विस्कटून गेले आहे. पेट्रोल, डिझेलमधील वाढ ही गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ ते ४० टक्के असल्याने त्याचा थेट परिणाम कृषी उद्याेगावर झाला आहे. मालवाहतुकीच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ केल्याचा सरळ-सरळ फटका या कृषी व्यवसायाला बसला आहे.

कृषी अवजाराच्या किमतीत या महिन्याभरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रॉ मटेरिअल, कास्टिंगमध्ये वाढ झाली. तांबे व लोखंडातही वाढ झाल्याने यापासून तयार होणाऱ्या अवजारांची किंमतही वाढली आहे. मोटारीसाठी लागणाऱ्या वाइंडिंगपासून ते साध्या विळ्यापर्यंत सर्वच अवजारांच्या किमतींत वाढ दिसत आहे. मशागतीसाठी ट्रॅक्टर, छोटा पॉवर टिलरसह कापणी, कोळपणीसाठीच्या छोट्या अवजारांची मागणी वाढली होती. आता दरात एकदम वाढ दिसत असल्याने शेतकरी व विक्रेत्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत.

खते, बी-बियाण्यांच्या दरात ७ ते १० टक्के वाढ दिसत आहे. बियाणे बऱ्यापैकी बाहेरील जिल्हा आणि राज्यातून कोल्हापुरात आणले जाते. स्थानिक बियाण्यांचा वापर खूपच कमी आहे. रासायनिक खतांच्या किमतींत अजून वाढ दिसत नसली तरी कीटकनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या किमती बऱ्यापैकी चढल्या आहेत.

चौकट ०१

बियाण्यांच्या किमती निदान सरकारी कंपनी असलेल्या ‘महाबीज’ने तरी वाढवू नयेत, अशी विनंती राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या महाबीज संचालकांकडे केली आहे; पण वाहतूक खर्चाचा बोजा कसा पेलायचा याला पर्याय द्या, अशी विचारणा त्यांच्याकडून झाली आहे.

प्रतिक्रिया ०१

कृषी अवजारांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या धातूंच्या किमतीत वाढ झाल्याचा थेट परिणाम अवजारांच्या किमतीवर झाला आहे. कंपनीकडूनच वाढीव दराने येत असल्याने आम्हीही त्याचप्रमाणे दराची आकारणी करीत आहोत. शेतकरी याबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत; पण आमचा नाइलाज आहे.

भरत तेंडुलकर, अवजारे विक्रेते, लक्ष्मीपुरी

प्रतिक्रिया ०२

खते, बी-बियाण्यांसाठी बाहेरील राज्ये व जिल्ह्यांवरच आपल्याला अवलंबून राहावे लागते. साहजिकच अंतर वाढेल तसा इंधनाचा खर्चही वाढतो. हा खर्च वाढला तर मालवाहतुकीत वाढ होते आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम बियाण्यांच्या किमती वाढण्यात झाला आहे.

अनिल श्रीश्रीमाळ, बियाणे, औषधे विक्रेते, शाहूपुरी