शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा; मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पूर्वनियोजनानुसार दहावी, बारावीच्या परीक्षांच्या कोऱ्या उत्तरपत्रिका आणि अन्य साहित्य गेल्या दहा दिवसांपूर्वीच परीक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पूर्वनियोजनानुसार दहावी, बारावीच्या परीक्षांच्या कोऱ्या उत्तरपत्रिका आणि अन्य साहित्य गेल्या दहा दिवसांपूर्वीच परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली असून बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागातील एकूण ३४११ केंद्रे असलेल्या शाळा प्रशासन आणि तेथील मुख्याध्यापकांना या कोऱ्या उत्तरपत्रिका आणि अन्य साहित्य सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्यानुसार बारावीची परीक्षा दि. २३ एप्रिल ते दि. २१ मे दरम्यान, तर दहावीची परीक्षा दि. २९ एप्रिल ते दि. २० मे या कालावधीत होणार होती. या परीक्षांसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण २,६१,९८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पूर्वनियोजनानुसार शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार विभागीय मंडळांनी गेल्या दहा दिवसांपूर्वी परीक्षा केंद्रांवर साहित्य पोहोचविले. दरवर्षी केवळ महिनाभर या कोऱ्या उत्तरपत्रिका, इतर साहित्य या केंद्र असलेल्या शाळांना सांभाळावे लागत होते. मात्र, यंदा हे साहित्य दीड ते दोन महिने सांभाळावे लागणार असल्याचे दिसते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमुळे बहुतांश शाळा बंद आहेत. शिक्षक, कर्मचारी शाळांमध्ये उपस्थित नाहीत. त्यामुळे या उत्तरपत्रिका, साहित्य सांभाळण्याचा धोका आहे. त्यामुळे एकप्रकारे या साहित्याचा शाळांवर बोजा पडला असून मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला आहे.

चौकट

हे साहित्य कस्टडीत...

कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅॅप, होलोक्रॉप्ट, स्टीकर, सिटिंग प्लॅॅन, विषय आणि माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य.

चौकट

परीक्षा कधी? पुढील प्रवेश कधी?

गेल्यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा वेळेत झाल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या परीक्षेचे निकाल जुलैमध्ये जाहीर झाले. त्यामुळे अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया लांबली. यंदाही कोरोना वाढू लागल्याने दहावीची परीक्षा रद्द झाली. बारावीची परीक्षा जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील प्रवेश परीक्षा कधी होणार, हा प्रश्नच आहे.

===Photopath===

210421\21kol_1_21042021_5.jpg

===Caption===

२१०४२०२१-कोल-ब्लँक ॲॅन्सरशीट डमी)