शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

बुरंबाळी ग्रामस्थ सातबाऱ्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:23 IST

धामोड : बुरंबाळी व नऊ नंबर (ता . राधानगरी ) येथील तुळशी धरणग्रस्तांची गेल्या ४० वर्षांपासून हक्काच्या घरासाठी परवड ...

धामोड : बुरंबाळी व नऊ नंबर (ता . राधानगरी ) येथील तुळशी धरणग्रस्तांची गेल्या ४० वर्षांपासून हक्काच्या घरासाठी परवड सुरू आहे. या गावातील धरणग्रस्तांनी आपल्याला हक्काचे घर व सातबारा मिळावा या मागणीसाठी शासन दरबारी अनेक हेलपाटे मारले. पण गेल्या ४४ वर्षांत त्यांना राहत्या घराचा हक्काचा सातबारा मिळालाच नाही. धरणग्रस्तांच्या या मागणीकडे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देऊन गावास भेट दिली व अधिकाऱ्यांची झाडाझडती करत संबंधित धरणग्रस्तांना एका दिवसात सातबारे देण्याचा आदेश दिले, पण या घटनेला आज दहा दिवस झाले तरीही सातबारे धरणग्रस्तांच्या हाती मिळालेले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अधिकारी वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याचे चित्र आहे. बुरंबाळी व ९ नंबर येथील तुळशी धरणग्रस्तांची घराची मागणी व संबंधित शेतीच्या सातबाराचा प्रश्न जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या समोर येताच त्यांनी तत्काळ या गावास भेट दिली व तेथील लोकांचा प्रश्न जाणून घेतले. त्यांनी संबंधित ४६ कुटुंबांना एका दिवसात त्यांच्या राहत्या घराचा सातबारा पत्रकी नोंदी करून अद्ययावत सातबारा देण्याचे आदेश दिले होते, पण जिल्हाधिकाऱ्यांनी गावास भेट देऊन दहा दिवस उलटले तरीही त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन संबंधित अधिकाऱ्यांकडून झालेले नाही. दुसरीकडे संबंधित धरणग्रस्त आजही या सातबाराच्या प्रतीक्षेत असून, सातबारा मिळेल अशी आशा बाळगून आहेत .

चौकट- जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या एक दिवसाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी त्यांचेच अधिकारी जर दहा दिवस लावत असतील, तर सर्वसामान्यांचे गाऱ्हाणे कोण ऐकून घेणार ? हा प्रश्न अनुत्तरितच आहे . त्यामुळे यातून 'सरकारी काम आणि सहा महिने थांब ' या म्हणीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.

चौकट : त्रुटी काढू नका तरीही....गेल्या ४६ वर्षांपासून हे शेतकरी स्वतःच्या हक्काच्या घरासाठी शासकीय यंत्रणेने बरोबर भांडत आहेत. धरणग्रस्तांची समस्या ऐकताच जिल्हाधिकारी देसाई यांनी संबंधित कागदपत्रे पाहून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जास्त त्रुटी न कढता एकाच दिवसात संबंधित धरणग्रस्त शेतकऱ्यांना सातबारे देण्याचे खडे बोल त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले होते. दस्तरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगूनही अधिकाऱ्यांनी सातबारे देण्यास चालढकल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.