शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बुरंबाळी ग्रामस्थ सातबाऱ्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:23 IST

धामोड : बुरंबाळी व नऊ नंबर (ता . राधानगरी ) येथील तुळशी धरणग्रस्तांची गेल्या ४० वर्षांपासून हक्काच्या घरासाठी परवड ...

धामोड : बुरंबाळी व नऊ नंबर (ता . राधानगरी ) येथील तुळशी धरणग्रस्तांची गेल्या ४० वर्षांपासून हक्काच्या घरासाठी परवड सुरू आहे. या गावातील धरणग्रस्तांनी आपल्याला हक्काचे घर व सातबारा मिळावा या मागणीसाठी शासन दरबारी अनेक हेलपाटे मारले. पण गेल्या ४४ वर्षांत त्यांना राहत्या घराचा हक्काचा सातबारा मिळालाच नाही. धरणग्रस्तांच्या या मागणीकडे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देऊन गावास भेट दिली व अधिकाऱ्यांची झाडाझडती करत संबंधित धरणग्रस्तांना एका दिवसात सातबारे देण्याचा आदेश दिले, पण या घटनेला आज दहा दिवस झाले तरीही सातबारे धरणग्रस्तांच्या हाती मिळालेले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अधिकारी वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याचे चित्र आहे. बुरंबाळी व ९ नंबर येथील तुळशी धरणग्रस्तांची घराची मागणी व संबंधित शेतीच्या सातबाराचा प्रश्न जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या समोर येताच त्यांनी तत्काळ या गावास भेट दिली व तेथील लोकांचा प्रश्न जाणून घेतले. त्यांनी संबंधित ४६ कुटुंबांना एका दिवसात त्यांच्या राहत्या घराचा सातबारा पत्रकी नोंदी करून अद्ययावत सातबारा देण्याचे आदेश दिले होते, पण जिल्हाधिकाऱ्यांनी गावास भेट देऊन दहा दिवस उलटले तरीही त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन संबंधित अधिकाऱ्यांकडून झालेले नाही. दुसरीकडे संबंधित धरणग्रस्त आजही या सातबाराच्या प्रतीक्षेत असून, सातबारा मिळेल अशी आशा बाळगून आहेत .

चौकट- जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या एक दिवसाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी त्यांचेच अधिकारी जर दहा दिवस लावत असतील, तर सर्वसामान्यांचे गाऱ्हाणे कोण ऐकून घेणार ? हा प्रश्न अनुत्तरितच आहे . त्यामुळे यातून 'सरकारी काम आणि सहा महिने थांब ' या म्हणीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.

चौकट : त्रुटी काढू नका तरीही....गेल्या ४६ वर्षांपासून हे शेतकरी स्वतःच्या हक्काच्या घरासाठी शासकीय यंत्रणेने बरोबर भांडत आहेत. धरणग्रस्तांची समस्या ऐकताच जिल्हाधिकारी देसाई यांनी संबंधित कागदपत्रे पाहून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जास्त त्रुटी न कढता एकाच दिवसात संबंधित धरणग्रस्त शेतकऱ्यांना सातबारे देण्याचे खडे बोल त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले होते. दस्तरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगूनही अधिकाऱ्यांनी सातबारे देण्यास चालढकल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.