शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

मोळी टाकली... कोयते अद्याप थंडच

By admin | Updated: October 25, 2015 01:09 IST

साखर हंगामाची कोंडी : ‘दालमिया’ सुरू

 कोल्हापूर : जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी मुहूर्तावर ऊसमोळीचे पूजन केले; पण अद्याप कारखान्यांची चाके मात्र स्थिरच आहेत. ‘एकरकमी एफआरपी’च्या मुद्द्यामुळे यंदाच्या हंगामात तिढा निर्माण झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ७ नोव्हेंबरच्या ऊस परिषदेमध्ये आंदोलनाची दिशा ठरणार आहे. त्यानंतरच हंगाम सुरू करण्याबाबत कारखानदारांमध्ये चर्चा होऊ शकते. गतवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बहुतांश साखर कारखाने सुरू झाले होते. त्यामुळे मार्चच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यातच हंगाम संपले होते. यंदा दुष्काळाचा फटका ऊस पिकाला बसला आहे. डिसेंबरनंतर पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याने उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. यासाठी गळीत हंगाम लवकर सुरू करावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे; पण साखर कारखानदारांची सावध भूमिका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद पाहता हंगाम लवकर सुरू होण्याची शक्यता फारच धूसर आहे. आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील ‘दालमिया’ या खासगी साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरू केला आहे. ‘दालमिया’ने कागल, करवीर, पन्हाळा, गगनबावडा, आदी ठिकाणी ऊसतोड सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या नजरा इतर कारखान्यांकडे लागल्या आहेत. रिकव्हरीसाठी मखलाशी एकरकमी ‘एफआरपी’चा मुद्दा पुढे करीत साखर कारखानदारांनी हंगाम सुरू करण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. ‘एफआरपी’साठी पैशांची उपलब्धता हा मुद्दा जरी खरा असला, तरी आॅक्टोबर महिन्यात कारखाने सुरू केल्यास ‘रिकव्हरी’ला फटका बसणार आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यातच हंगाम सुरू करण्याची मखलाशी आहे. ऊस परिषदेला उशिरा का? खासदार राजू शेट्टी यांनी आॅक्टोबरमध्ये ऊस परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणे अपेक्षित आहे; पण मुळात नोव्हेंबर महिन्यात ऊस परिषद घ्यायची; त्यानंतर कारखानदारांशी चर्चा सुरू म्हणजे उसावर कोयता पडायला डिसेंबर उजाडतो.