शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
4
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
5
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
6
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
7
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
8
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
9
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
10
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
11
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
12
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
13
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
14
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
15
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
16
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
17
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
18
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
19
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
20
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक

मोळी टाकली... कोयते अद्याप थंडच

By admin | Updated: October 25, 2015 01:09 IST

साखर हंगामाची कोंडी : ‘दालमिया’ सुरू

 कोल्हापूर : जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी मुहूर्तावर ऊसमोळीचे पूजन केले; पण अद्याप कारखान्यांची चाके मात्र स्थिरच आहेत. ‘एकरकमी एफआरपी’च्या मुद्द्यामुळे यंदाच्या हंगामात तिढा निर्माण झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ७ नोव्हेंबरच्या ऊस परिषदेमध्ये आंदोलनाची दिशा ठरणार आहे. त्यानंतरच हंगाम सुरू करण्याबाबत कारखानदारांमध्ये चर्चा होऊ शकते. गतवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बहुतांश साखर कारखाने सुरू झाले होते. त्यामुळे मार्चच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यातच हंगाम संपले होते. यंदा दुष्काळाचा फटका ऊस पिकाला बसला आहे. डिसेंबरनंतर पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याने उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. यासाठी गळीत हंगाम लवकर सुरू करावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे; पण साखर कारखानदारांची सावध भूमिका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद पाहता हंगाम लवकर सुरू होण्याची शक्यता फारच धूसर आहे. आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील ‘दालमिया’ या खासगी साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरू केला आहे. ‘दालमिया’ने कागल, करवीर, पन्हाळा, गगनबावडा, आदी ठिकाणी ऊसतोड सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या नजरा इतर कारखान्यांकडे लागल्या आहेत. रिकव्हरीसाठी मखलाशी एकरकमी ‘एफआरपी’चा मुद्दा पुढे करीत साखर कारखानदारांनी हंगाम सुरू करण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. ‘एफआरपी’साठी पैशांची उपलब्धता हा मुद्दा जरी खरा असला, तरी आॅक्टोबर महिन्यात कारखाने सुरू केल्यास ‘रिकव्हरी’ला फटका बसणार आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यातच हंगाम सुरू करण्याची मखलाशी आहे. ऊस परिषदेला उशिरा का? खासदार राजू शेट्टी यांनी आॅक्टोबरमध्ये ऊस परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणे अपेक्षित आहे; पण मुळात नोव्हेंबर महिन्यात ऊस परिषद घ्यायची; त्यानंतर कारखानदारांशी चर्चा सुरू म्हणजे उसावर कोयता पडायला डिसेंबर उजाडतो.