शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
3
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
4
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
5
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
6
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
7
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
8
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
9
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
10
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
11
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
12
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
13
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
14
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
15
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
16
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
17
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
18
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
19
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
20
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!

मोळी टाकली... कोयते अद्याप थंडच

By admin | Updated: October 25, 2015 01:09 IST

साखर हंगामाची कोंडी : ‘दालमिया’ सुरू

 कोल्हापूर : जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी मुहूर्तावर ऊसमोळीचे पूजन केले; पण अद्याप कारखान्यांची चाके मात्र स्थिरच आहेत. ‘एकरकमी एफआरपी’च्या मुद्द्यामुळे यंदाच्या हंगामात तिढा निर्माण झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ७ नोव्हेंबरच्या ऊस परिषदेमध्ये आंदोलनाची दिशा ठरणार आहे. त्यानंतरच हंगाम सुरू करण्याबाबत कारखानदारांमध्ये चर्चा होऊ शकते. गतवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बहुतांश साखर कारखाने सुरू झाले होते. त्यामुळे मार्चच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यातच हंगाम संपले होते. यंदा दुष्काळाचा फटका ऊस पिकाला बसला आहे. डिसेंबरनंतर पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याने उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. यासाठी गळीत हंगाम लवकर सुरू करावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे; पण साखर कारखानदारांची सावध भूमिका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद पाहता हंगाम लवकर सुरू होण्याची शक्यता फारच धूसर आहे. आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील ‘दालमिया’ या खासगी साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरू केला आहे. ‘दालमिया’ने कागल, करवीर, पन्हाळा, गगनबावडा, आदी ठिकाणी ऊसतोड सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या नजरा इतर कारखान्यांकडे लागल्या आहेत. रिकव्हरीसाठी मखलाशी एकरकमी ‘एफआरपी’चा मुद्दा पुढे करीत साखर कारखानदारांनी हंगाम सुरू करण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. ‘एफआरपी’साठी पैशांची उपलब्धता हा मुद्दा जरी खरा असला, तरी आॅक्टोबर महिन्यात कारखाने सुरू केल्यास ‘रिकव्हरी’ला फटका बसणार आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यातच हंगाम सुरू करण्याची मखलाशी आहे. ऊस परिषदेला उशिरा का? खासदार राजू शेट्टी यांनी आॅक्टोबरमध्ये ऊस परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणे अपेक्षित आहे; पण मुळात नोव्हेंबर महिन्यात ऊस परिषद घ्यायची; त्यानंतर कारखानदारांशी चर्चा सुरू म्हणजे उसावर कोयता पडायला डिसेंबर उजाडतो.