शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योगाला गुंडगिरीची कीड

By admin | Updated: November 11, 2014 23:25 IST

विकास खुंटल्याची भीती : पाच वर्षांत नवीन उद्योगाची उभारणी नाही

राजाराम पाटील - इचलकरंजी -वस्त्रनगरीचा विकास झाला, आधुनिक यंत्रे वस्त्रोद्योगात आली आणि त्याबरोबर कापड उत्पादनातही वाढ झाली. परिणामी, येथील वस्त्रोद्योगाची रोजची उलाढाल १५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. अशा वस्त्रोद्योगाला मात्र, गुंडगिरीची कीड पोखरू लागल्याने उद्योजक-व्यावसायिकांतून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. वस्त्रोद्योगाला सर्व सुविधा असतानाही गेल्या पाच वर्षांत येथे एकाही बड्या उद्योगाची उभारणी झाली नाही. त्यामुळे येथील विकास खुंटण्याची भीती आहे.एकविसाव्या शतकाच्या पदार्पणावेळी जागतिक स्पर्धेचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खुल्या आर्थिक धोरणाचे वारे जोरदारपणे वाहू लागले. अशा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वस्त्रोद्योगात अत्याधुनिकता आणून कापड उत्पादनवाढीसाठी तांत्रिक उन्नयन निधी (टफ्स) योजनेची अंमलबजावणी केली. तर राज्य शासनानेही २३ कलमी पॅकेज, वीज दराची सवलत, औद्योगिक वसाहतींची डी प्लस योजना, आदी सवलती व सुविधा दिल्याने सन २००४ पासून यंत्रमागांची आणि आॅटोलूमची संख्या वाढत गेली. सध्या इचलकरंजी व परिसरात सव्वालाख यंत्रमाग व २५ हजार आॅटोलूम आहेत. या मागांवर दररोज ७५ लाख मीटर कापडाची निर्मिती होते. यंत्रमाग उद्योगाबरोबर सूतगिरण्या, सायझिंग, प्रोसेसिंग, गारमेंट असे उद्योगधंदे येथे आहेत. त्यामुळे इचलकरंजीत दररोज १५० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचे उद्योजक-व्यावसायिकांचे म्हणणे आहे.वस्त्रोद्योगात दररोज सूत व कापडविक्रीची आर्थिक उलाढाल होते. त्याचबरोबर आॅटोलूम कारखान्यांकडे मेंडींग आणि वहिफणी-नॉटींगचा ठेका मिळावा, यासाठी कारखानदाराला धमकाविले जाते. पार्वती औद्योगिक वसाहत, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेटसह तारदाळ, यड्राव, शहापूर, कोरोची, आभार फाटा, गणेशनगर परिसर अशा परिसरांतील कारखानदारांना संरक्षण (?) देण्याच्या गोंडस नावाखाली मासिक हप्ता मागणीचे प्रकार वाढले आहेत. हप्ता किंवा ठेका न मिळाल्यास कारखान्यात घुसून कामगारांना मारहाण करणे, रात्रीच्यावेळी कारखान्यावर दगडफेक, सुताची बिमे कापून नुकसान करणे, असे दहशतीचे प्रकार केले जातात.दहशतीच्या कारणांमुळे आणि स्थानिक गुंडगिरीला वैतागून बॉम्बे रेयॉनसारख्या बड्या कंपनीने लक्ष्मी औद्योगिक वसाहत व खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असलेल्या त्यांच्या औद्योगिक कारखान्यांचा गाशा गुंडाळला. तसेच अशाच कारणातून सीईटीपीवरसुद्धा दगडफेकीचे प्रकार झाले. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत इचलकरंजीत एकही नवीन उद्योग उभा राहिला नाही. त्यामुळे येथील वस्त्रोद्योगाचा विकास खुंटण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधींनी स्थानिक गुंडगिरीच्या विरोधात मोहीम उघडून उद्योजक-व्यावसायिकांना अभय द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. (क्रमश:)पोलिसांचा वचक नसल्याने गुंडांचे वर्चस्वशहरात गावभाग, शिवाजीनगर व शहापूर असे तीन पोलीस ठाणे आहेत. वाहतूक पोलिसांची शाखा स्वतंत्र असून, पोलीस उपअधीक्षक व अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचेही कार्यालय आहे. अशाप्रकारे सातत्याने सुमारे २७५ पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत असतानाही फाळकूटदादांचे वर्चस्व शहरात नेहमी आहे. तरीही त्यांच्यावर वचक ठेवण्यास पोलीस कमी का पडतात, याचेच आश्चर्य नागरिकांना वाटत आहे.कणखरपणा नसल्याचा फायदा फाळकूटदादांनाआॅटोलूमच्या उद्योगात नवीन काही उद्योजक आहेत. फॅशनेबल राहणी आणि नवीन गाड्यांचा शौक करणाऱ्या या मंडळींकडे कष्टाचा अभाव आहे. तशी कणखर वृत्ती नसल्याने धमक्यांना हे ‘नवउद्योजक’ सहजासहजी बळी पडतात आणि फाळकूटदादांचे फावते. त्याचा परिणाम अन्य उद्योजकांवर होऊ लागला आहे.यंत्रमागांना ११० वर्षांची परंपराइचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला ११० वर्षांची परंपरा आहे. सन १९०४ मध्ये तत्कालीन जहागीरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी विकेंद्रीत क्षेत्रातील पहिला यंत्रमाग येथे स्थापित केला. स्वातंत्र्योत्तर काळात येथील यंत्रमाग व्यवसायाला चालना मिळाली. सन १९६० नंतर यंत्रमागांची संख्या वाढत गेली.