शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामासाठी युरियाचा दीड लाख टनाचा बफर स्टॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:25 IST

कोल्हापूर : खरीप हंगामात युरियाची मागणी वाढते आणि त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने राज्य शासनाने युरियाचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय ...

कोल्हापूर : खरीप हंगामात युरियाची मागणी वाढते आणि त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने राज्य शासनाने युरियाचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल दीड लाख टन युरियाचा स्टॉक होणार असल्याने जून, जूलैमध्ये शेतकऱ्यांना मागणीनुसार उपलब्धता होऊ शकते.

राज्यात जून पासून खरीपाचा हंगाम सुरू होत असल्याने ऑगस्टपर्यंत युरियाची मागणी वाढते. पाऊस, अतिवृष्टी, रेल्वे वाहतूक, खत कारखाने कार्यान्वित नसणे आदी कारणामुळे खताच्या उपलब्धतेवर परिणाम होतो. त्यात काेरोनाचा संसर्ग वाढत असल्याने खत कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती कमी आहे. त्याचा परिणामही खतांच्या उत्पादनावर होणार आहे. एप्रिल, मे महिन्यात युरियाची मागणी कमी असते. या काळातच युरियाचा बफर स्टॉक केला तर खरिपासाठी तो उपयुक्त होऊ शकतो. यासाठी राज्य शासनाने दीड लाख टनाचा स्टॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून हा स्टॉक केला जाणार असून त्यासाठी प्रतिटन १,८१५ रुपये खर्च अपेक्षित आहे.