शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

बीएसएनएलची लँडलाईन सेवा रविवारी विनामोबदला

By admin | Updated: September 10, 2016 00:37 IST

ग्राहकांत समाधान : देशात कुठेही बोलण्याची संधी : रविवारी रीडिंगलाच ‘सुटी’

दत्तात्रय पाटील ल्ल म्हाकवे‘माणसं जोडणारी माणसं’ हे ब्रीद घेऊन वाटचाल सुरू असणाऱ्या भारत संचार निगम (बीएसएनएल) या दूरध्वनी कंपनीने घरगुती फोन (लॅँडलाईन) आता प्रत्येक रविवारी पूर्णत: विनाचार्जेबल केला आहे. तसेच गेल्या वर्षभरापूर्वी दररोज रात्री नऊ ते सकाळी सात वाजेपर्यंत चार्जेबल मीटरला सुटी देण्यात आली होती, तसेच या सुटीबरोबरच आता प्रत्येक रविवारी मीटरला २४ तास सुटीच राहणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांतून समाधानाचे वातावरण आहे. ही योजना ग्रामीण व शहरी दोन्हीसाठी लागू आहे.बीएसएनएल ही कंपनी शासनाशी संलग्न आहे. सध्या मोबाईल, सोशल मीडिया आणि विज्ञानाच्या युगात बीएसएनएलची लॅँडलाईन (घरगुती) दूरध्वनी सेवा नामशेष होण्याच्या मार्गावरच आली आहे. त्यामुळे या कंपनीनेही ‘ब्रॉड ब्रॅँड’च्या माध्यमातून नेट सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये मोबाईल कंपन्यांनी अगदी कमीत कमी दरात हॅँडसेट उपलब्ध करून दिले, तर खासगी कंपन्यांनी गावोगावी टॉवर उभे करून भ्रमणध्वनीचे जाळेच विणले. त्यामुळे ग्रामीण भागातही मोबाईलचे आकर्षण निर्माण झाले. विशेष म्हणजे वापरण्यास सुलभ, कुठेही सोबत घेऊन जाता येऊ शकतो, तसेच कमी दरात मोबाईल सेवा मिळाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड मजुरांसह बहुतांशी महिलाही मोबाईलचा सर्रास वापर करू लागल्या. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी कोपऱ्या-कोपऱ्यांवर दिसणारे ‘कॉईन बॉक्स’ गायब झाले, तर आता घरगुती वापरात असणारे लॅँडलाईन फोनही घरातून गायब होतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे बीएसएनएल कंपनीने १ मे २०१५ पासून दररोज सायंकाळी ९ ते सकाळी ७ या वेळेत देशातील कोणत्याही लॅँडलाईन अथवा कोणत्याही कंपनीच्या मोबाईलवर विनामूल्य बोलण्याची संधी दिली आहे, तर आता त्यापुढे आणखी एक पाऊल टाकत रविवारी दिवसभर देशात कुठेही आणि कितीही विनामूल्य बोलण्याची संधी उपलब्ध करून ‘माणसाशी माणसं जोडण्याचे’ सत्कर्मच केले आहे.दरम्यान, या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे प्रत्येक शनिवारी सायंकाळी नऊ वाजल्यापासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत कंपनीच्या चार्जेबल मीटरला सुटी मिळणार आहे.वाटीतील ताटात नको...!बीएसएनएलने अनेक ग्राहकाभिमुख योजना अमलात आणल्या आहेत. मात्र, प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणीनंतर स्थिर आकार, कॉलदर, विविध करात वाढ केल्याचेही दिसून येते. त्यामुळे रविवारी विनामोबदला कॉलिंगचा लाभ देताना मासिक दर आकारणीत वाढ होण्याचीही शक्यता आहे. कारण यापूर्वी ग्रामीण भागासाठी मासिक ५५ रुपये आकार होता; तो मासिक ९५ रु., १२० रु. आणि आता १६० रु. अशी वाढ केली आहे, तर शहरीसाठी मासिक २४० रु. इतका आकार आणि १४ टक्के सेवाकर, स्वच्छ भारत, कृषी कल्याण, आदी करही आकारले जात आहेत. त्यामुळे सध्या दिल्या जाणाऱ्या योजनेनंतर मासिक आकारात वाढ होऊ नये, अन्यथा ‘वाटीतील ताटात’ या ग्रामीण उक्तीप्रमाणेच अवस्था होईल, असेही जाणकारांतून बोलले जात आहे.