शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

कासारी खोऱ्यात बीएसएनलची ब्राॅडबँड सुविधा बंद; लोकांची पायपीट : महासेवा केंद्राच्या कामावर मोठा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अणुस्कुरा : दक्षिण शाहूवाडी परिसरामध्ये एकमेव सुरू असलेल्या बीएसएनएल कंपनीने ब्रॉडबँड सुविधा बंद केल्यामुळे या दुर्गम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अणुस्कुरा : दक्षिण शाहूवाडी परिसरामध्ये एकमेव सुरू असलेल्या बीएसएनएल कंपनीने ब्रॉडबँड सुविधा बंद केल्यामुळे या दुर्गम भागातील ऑनलाईन कामकाज ठप्प झाले आहे. लोकांना विविध शासकीय कामांसाठी ३०-४० किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. खासदार धैर्यशील माने यांना दोन वेळा निवेदन देऊनही करतो, सांगतो यापलीकडे हा विषय गेलेला नाही.

या परिसरातील माळापुडे ते गजापूरदरम्यान फक्त बीएसएनएल नेटवर्क उपलब्ध असते; परंतु त्यातही सातत्य नसते. शेतनांगरट, रस्तादुरुस्ती यांमुळे सतत केबल तुटणे यासारखे प्रकार सुरू असतात. या दरम्यानच्या सर्व गावांना ऑनलाईन कामकाजासाठी करंजफेण या बाजारपेठेच्या ठिकाणी बीएसएनएलची ‘ब्रॉडबँड’ सुविधा उपलब्ध होती; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ही सर्व कनेक्शन बंद केली आहेत. जर गावात शंभर लँडलाईन नवीन कनेक्शन घेतली तरच ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा सुरू करण्यात येईल, अशी जाचक अट कंपनीने घातली आली आहे. त्यामुळे या ठिकाणची महाइसेवाकेंद्र तसेच खासगी नेटकॅफे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांचे अनेक प्रकारचे दाखले, वीजबिल भरणा, अनेक प्रकारचे रिचार्ज ही कामे थांबली आहेत. साधा ऑनलाईन अर्ज जरी भरावयाचा असेल तर दूर ३५ ते ४० किलोमीटर अंतरावर जावे लागते. अगोदरच कोरोना महामारीने त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांना यामुळे त्रास होत आहे.

खासदारांना निवेदन

आतापर्यंत दोन वेळा खासदार धैर्यशील माने यांना इंटरनेट सुविधांबाबत निवेदन दिले होते; पण याबाबत कोणताही मार्ग निघालेला नाही. तरी या परिसरातील ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा सुरू करावी, अशी मागणी करंजफेण व्यापारी असोसिएशनचे युवराज सुतार, बाजीराव गुरव, संजय पोवार यांच्यासह सर्व नागरिकांनी केली आहे.

मांजरे येथे टॉ‌‌वर उभा; पण...

मांजरे येथे बीएसएनएलने अनेक वर्षे रखडत पडलेला मोबाईल टॉ‌वर उभा केला आहे; परंतु अजून तो सुरूच झालेला नाही. त्यामुळे मांजरेपासून त्या पंचक्रोशीतील लोकांना मोबाईलची रेंज मिळत नाही. या परिसरातील लोक मोठ्या संख्येने मुंबईला आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी लोकांना माळावर, डोंगरावर जाऊन तास-तासभर थांबावे लागत आहे.