शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

कासारी खोऱ्यात बीएसएनलची ब्राॅडबँड सुविधा बंद; लोकांची पायपीट : महासेवा केंद्राच्या कामावर मोठा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अणुस्कुरा : दक्षिण शाहूवाडी परिसरामध्ये एकमेव सुरू असलेल्या बीएसएनएल कंपनीने ब्रॉडबँड सुविधा बंद केल्यामुळे या दुर्गम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अणुस्कुरा : दक्षिण शाहूवाडी परिसरामध्ये एकमेव सुरू असलेल्या बीएसएनएल कंपनीने ब्रॉडबँड सुविधा बंद केल्यामुळे या दुर्गम भागातील ऑनलाईन कामकाज ठप्प झाले आहे. लोकांना विविध शासकीय कामांसाठी ३०-४० किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. खासदार धैर्यशील माने यांना दोन वेळा निवेदन देऊनही करतो, सांगतो यापलीकडे हा विषय गेलेला नाही.

या परिसरातील माळापुडे ते गजापूरदरम्यान फक्त बीएसएनएल नेटवर्क उपलब्ध असते; परंतु त्यातही सातत्य नसते. शेतनांगरट, रस्तादुरुस्ती यांमुळे सतत केबल तुटणे यासारखे प्रकार सुरू असतात. या दरम्यानच्या सर्व गावांना ऑनलाईन कामकाजासाठी करंजफेण या बाजारपेठेच्या ठिकाणी बीएसएनएलची ‘ब्रॉडबँड’ सुविधा उपलब्ध होती; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ही सर्व कनेक्शन बंद केली आहेत. जर गावात शंभर लँडलाईन नवीन कनेक्शन घेतली तरच ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा सुरू करण्यात येईल, अशी जाचक अट कंपनीने घातली आली आहे. त्यामुळे या ठिकाणची महाइसेवाकेंद्र तसेच खासगी नेटकॅफे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांचे अनेक प्रकारचे दाखले, वीजबिल भरणा, अनेक प्रकारचे रिचार्ज ही कामे थांबली आहेत. साधा ऑनलाईन अर्ज जरी भरावयाचा असेल तर दूर ३५ ते ४० किलोमीटर अंतरावर जावे लागते. अगोदरच कोरोना महामारीने त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांना यामुळे त्रास होत आहे.

खासदारांना निवेदन

आतापर्यंत दोन वेळा खासदार धैर्यशील माने यांना इंटरनेट सुविधांबाबत निवेदन दिले होते; पण याबाबत कोणताही मार्ग निघालेला नाही. तरी या परिसरातील ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा सुरू करावी, अशी मागणी करंजफेण व्यापारी असोसिएशनचे युवराज सुतार, बाजीराव गुरव, संजय पोवार यांच्यासह सर्व नागरिकांनी केली आहे.

मांजरे येथे टॉ‌‌वर उभा; पण...

मांजरे येथे बीएसएनएलने अनेक वर्षे रखडत पडलेला मोबाईल टॉ‌वर उभा केला आहे; परंतु अजून तो सुरूच झालेला नाही. त्यामुळे मांजरेपासून त्या पंचक्रोशीतील लोकांना मोबाईलची रेंज मिळत नाही. या परिसरातील लोक मोठ्या संख्येने मुंबईला आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी लोकांना माळावर, डोंगरावर जाऊन तास-तासभर थांबावे लागत आहे.