शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
6
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
7
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
8
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
9
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
10
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
11
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
12
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
13
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
14
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
15
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
16
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
17
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
18
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
19
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
20
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

राधानगरीत रमजानमध्ये बंधुभाव, समतेची प्रचिती

By admin | Updated: July 12, 2015 22:47 IST

धार्मिक विधीची लगबग : गगनबावड्यातही सामाजिक ऐक्याचे दर्शन --महिना रमजानचा सामाजिक सलोख्याचा !

अतुल आंबी- इचलकरंजी --शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी आवश्यक असलेले मुख्य चौकांमधील सिग्नल दुरुस्त करण्याचे काम नगरपालिकेने सुरू केले आहे. पंधरा दिवसांत शहरातील तीन ठिकाणी सिग्नल सुरू करण्यात येणार आहेत. दरम्यान, पार्किंग व्यवस्थेत सुरळीतपणा आणण्यासाठी ट्रॅव्हलर्स व मोठे सुताचे ट्रक शहराबाहेरील चौकात थांबवून रात्रीच्या वेळेत ट्रान्स्पोर्टचे काम केल्यास वाहतुकीचा व पार्किंगचा प्रश्न निकालात निघण्यास मदत होणार आहे. नगरपालिकेचे अधिकारी व वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे याबाबतचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.शहरातील वाहतूक व पार्किंग व्यवस्था अस्ताव्यस्त असल्यामुळे वाहनधारकांबरोबरच पादचाऱ्यांनाही नेहमीच कसरत करीत रस्त्यांवरून मार्गक्रमण करावे लागते. शहरातील मुख्य चौकांमध्ये असलेले सिग्नलही गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. नगरपालिका अंदाजपत्रकात वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक तरतूद केली जात नाही. अशा अवस्थेत वाहतूक शाखेचा कारभार सुरू आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी म्हणून साधारण दोन वर्षांपूर्वी पुणे येथील एका कंपनीमार्फत शहरात असलेले जुने सिग्नलचे दिवे काढून त्याठिकाणी नवीन एलईडी सिग्नल बसविण्यात आले. चाचणी म्हणून काही दिवस सिग्नलचा वापर सुरू करण्यात आला. मात्र, यावेळी सिग्नल चालविण्यासाठी वापरण्यात आलेली वीज थेट महावितरणच्या खांबावरून घेण्यात आली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर महावितरणने नगरपालिकेला ताकीद देत बेकायदेशीर जोडणी बंद केली आणि सिग्नल सुरू करण्याचे काम पुन्हा रखडले.याबाबत विविध सामाजिक संस्था, संघटनांनीही नगरपालिका व वाहतूक शाखेत सिग्नल सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. त्यानंतर नगरपालिकेने शुक्रवारपासून शहरातील सिग्नल व्यवस्था सुरू करण्याचे काम नव्याने सुरू केले आहे. यामध्ये येत्या पंधरा दिवसांत प्रांत कार्यालय, जनता चौक व राजवाडा चौक येथील सिग्नल सुरू करण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांनी सांगितले.तसेच मुख्य मार्गावर उभारणाऱ्या मोठ्या ट्रॅव्हलर्स, तसेच लहान-मोठ्या रस्त्यांवर असलेल्या गोदामांसमोर कापडाच्या गाठी व सुताची बाचकी उतरविण्यासाठी व भरण्यासाठी तासन्तास उभारलेले मोठे ट्रक यांचाही प्रश्न गंभीर बनला आहे.मोठ्या वाहनांचे नियोजन गरजेचेशाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला शहरातील गोविंदराव हायस्कूल, राजवाडा, पोटफाडी चौक, शिवाजीनगर, डीकेएएससी महाविद्यालय, डेक्कन चौक याठिकाणी दोन-दोन तास या मोठ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे अशा मोठ्या वाहनांना शहराबाहेरील चौकात थांबवून रात्री नऊ ते पहाटे सहापर्यंत माल भरण्याचे व उतरविण्याचे नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. त्याचप्रमाणे मुख्य मार्गावर मोठ्या ट्रॅव्हलर्स प्रवाशांचे साहित्य व प्रवासी बसण्यासाठी तासन्तास थांबविल्या जातात. त्यामुळेही वाहतुकीची कोंडी होते. त्यांनाही अन्य ठिकाणी पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.