शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरीत रमजानमध्ये बंधुभाव, समतेची प्रचिती

By admin | Updated: July 12, 2015 22:47 IST

धार्मिक विधीची लगबग : गगनबावड्यातही सामाजिक ऐक्याचे दर्शन --महिना रमजानचा सामाजिक सलोख्याचा !

अतुल आंबी- इचलकरंजी --शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी आवश्यक असलेले मुख्य चौकांमधील सिग्नल दुरुस्त करण्याचे काम नगरपालिकेने सुरू केले आहे. पंधरा दिवसांत शहरातील तीन ठिकाणी सिग्नल सुरू करण्यात येणार आहेत. दरम्यान, पार्किंग व्यवस्थेत सुरळीतपणा आणण्यासाठी ट्रॅव्हलर्स व मोठे सुताचे ट्रक शहराबाहेरील चौकात थांबवून रात्रीच्या वेळेत ट्रान्स्पोर्टचे काम केल्यास वाहतुकीचा व पार्किंगचा प्रश्न निकालात निघण्यास मदत होणार आहे. नगरपालिकेचे अधिकारी व वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे याबाबतचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.शहरातील वाहतूक व पार्किंग व्यवस्था अस्ताव्यस्त असल्यामुळे वाहनधारकांबरोबरच पादचाऱ्यांनाही नेहमीच कसरत करीत रस्त्यांवरून मार्गक्रमण करावे लागते. शहरातील मुख्य चौकांमध्ये असलेले सिग्नलही गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. नगरपालिका अंदाजपत्रकात वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक तरतूद केली जात नाही. अशा अवस्थेत वाहतूक शाखेचा कारभार सुरू आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी म्हणून साधारण दोन वर्षांपूर्वी पुणे येथील एका कंपनीमार्फत शहरात असलेले जुने सिग्नलचे दिवे काढून त्याठिकाणी नवीन एलईडी सिग्नल बसविण्यात आले. चाचणी म्हणून काही दिवस सिग्नलचा वापर सुरू करण्यात आला. मात्र, यावेळी सिग्नल चालविण्यासाठी वापरण्यात आलेली वीज थेट महावितरणच्या खांबावरून घेण्यात आली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर महावितरणने नगरपालिकेला ताकीद देत बेकायदेशीर जोडणी बंद केली आणि सिग्नल सुरू करण्याचे काम पुन्हा रखडले.याबाबत विविध सामाजिक संस्था, संघटनांनीही नगरपालिका व वाहतूक शाखेत सिग्नल सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. त्यानंतर नगरपालिकेने शुक्रवारपासून शहरातील सिग्नल व्यवस्था सुरू करण्याचे काम नव्याने सुरू केले आहे. यामध्ये येत्या पंधरा दिवसांत प्रांत कार्यालय, जनता चौक व राजवाडा चौक येथील सिग्नल सुरू करण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांनी सांगितले.तसेच मुख्य मार्गावर उभारणाऱ्या मोठ्या ट्रॅव्हलर्स, तसेच लहान-मोठ्या रस्त्यांवर असलेल्या गोदामांसमोर कापडाच्या गाठी व सुताची बाचकी उतरविण्यासाठी व भरण्यासाठी तासन्तास उभारलेले मोठे ट्रक यांचाही प्रश्न गंभीर बनला आहे.मोठ्या वाहनांचे नियोजन गरजेचेशाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला शहरातील गोविंदराव हायस्कूल, राजवाडा, पोटफाडी चौक, शिवाजीनगर, डीकेएएससी महाविद्यालय, डेक्कन चौक याठिकाणी दोन-दोन तास या मोठ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे अशा मोठ्या वाहनांना शहराबाहेरील चौकात थांबवून रात्री नऊ ते पहाटे सहापर्यंत माल भरण्याचे व उतरविण्याचे नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. त्याचप्रमाणे मुख्य मार्गावर मोठ्या ट्रॅव्हलर्स प्रवाशांचे साहित्य व प्रवासी बसण्यासाठी तासन्तास थांबविल्या जातात. त्यामुळेही वाहतुकीची कोंडी होते. त्यांनाही अन्य ठिकाणी पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.